शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

परतीच्या पावसाने १९ हजार हेक्टरमधील धानपीक बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे १९ हजार ३८७ हेक्टरमधील धानपिकाचे ३३ टक्के पेक्षा ...

ठळक मुद्दे३३ हजार शेतकऱ्यांना फटका : ३३ टक्केच्यावर नुकसान, पंचनामे पूर्ण, अहवाल शासनाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे १९ हजार ३८७ हेक्टरमधील धानपिकाचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. परिणामी याचा फटका जिल्ह्यातील ३२ हजार ७९८ शेतकऱ्यांना बसला असून या संबंधिचा अहवाल कृषी व महसूल विभागाने शासनाकडे पाठविल्याची माहिती आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून आता शासनाकडून नुकसान भरपाईसाठी कोणता निकष लावला जातो याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.खरीप हंगामात जिल्ह्यात यंदा १ लाख ९६ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली. सुरूवातीला पाऊस लांबल्याने पेरण्या आणि परिणामी रोवण्या खोळंबल्या होत्या. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस झाल्याने आणि पावसाने सरासरी गाठल्याने धानपिकांना संजीवनी मिळाली. धानपिकाला अनुकुल वातावरण मिळाल्याने धानपिकाची चांगली वाढ झाली. त्यामुळे यंदा खरीपातील धानाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने ५० लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज व्यक्त करीत नियोजन केले होते. मात्र ऐन हलके धान निघण्याच्या मार्गावर असताना आॅक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस जोरदार बरसल्याने धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास १० हजार हेक्टरमधील धानाची कापणी पूर्ण झाली होती. कापणी केलेला धान बांध्यामध्ये पडून होता. दरम्यान परतीच्या पाऊस जोरदार बरसल्याने धानाच्या कडपा ओल्या होऊन काही प्रमाणात धानाला अंकुर फुटले तर मोठ्या प्रमाणात धान पाखड झाला. काही शेतकºयांना तर केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण झाले आहे.त्यामुळे शेतकºयांच्या तोंडचा घास परतीच्या पावसाने हिरावून नेल्याने शेतकºयांना पुन्हा अस्मानी संकटाला तोंड देण्याची वेळ आली. परतीच्या पावसाने धान पिकांचे नुकसान झाल्याची शेतकºयांची ओरड वाढल्यानंतर शासनाने नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी आणि महसूल विभागाला दिले. त्यानंतर कृषी आणि महसूल विभागाने संयुक्तपणे सर्वेक्षण केले.यात १९ हजार ३८७ हेक्टरमधील धान पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले असून यामुळे ३२ हजार ७९८ शेतकरी बाधीत झाल्याचा अहवाल कृषी विभागाने शासनाकडे बुधवारी पाठविल्याची माहिती आहे.पीक विमा कंपनीची माहिती गुलदस्त्यातजिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ७० हजारावर शेतकºयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढला. परतीच्या पावसामुळे धानपिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक विमाधारक शेतकºयांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक विमा कंपनीकडे अर्ज केले. मात्र या अर्जांची माहिती देण्यास आणि किती शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र ठरु शकतील याची माहिती पीक विमा कंपनीने गुलदस्त्यात ठेवल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.नुकसानीकडे लागले लक्षराज्यात सध्या राष्टÑपती राजवट लागू असल्याने परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासंदर्भात निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्यानंतरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कृषी आणि महसूल विभागाने युध्द पातळीवर नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर केला असला तरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.नुकसानीचा निकष काय?पीक विमा कंपनीच्या धोरणानुसार ३३ टक्केपेक्षा अधिक धानपिकांचे नुकसान झाले असल्यास असे शेतकरी नुकसान भरपाई पात्र ठरतात. मात्र ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला नाही त्या शेतकºयांना नुकसान भरपाई देतांना शासन नेमका कोणता निकष लावते, हेक्टरी किती रुपये नुकसान भरपाई जाहीर करते याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :agricultureशेती