शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

२० कोटी परत जाणार

By admin | Updated: March 29, 2015 01:41 IST

गोंदिया जिल्ह्यातील विविध पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांकडे शासनाकडून मिळालेले २० कोटी रुपये पडलेले आहेत.

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील विविध पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांकडे शासनाकडून मिळालेले २० कोटी रुपये पडलेले आहेत. ही रक्कम शासनाने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला खर्च करण्यासाठी दिली होती. मात्र शिक्षण विभागाने ही राशी विविध पंचायत समित्यांना पाठविली असताना ती पूर्ण खर्च झाली नाही. त्यामुळे शिल्लक रक्कम शासनाला परत जाण्याची दाट शक्यता आहे.मागील वर्षीपासून ही रक्कम पंचायत समित्यांकडे पडली आहे. शासन वेळोवेळी पत्रव्यवहार करून रक्कम परत मागत आहे. परंतु याकडे कुणीही लक्ष देत नाहीत. मागील अनेक वर्षापासून शाळांना सादील खर्चासाठी रक्कम दिली नाही. या मुद्याला घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ही रक्कम जवळ-जवळ २८ कोटी रूपये सांगितली जाते. परंतु सध्या आठ कोटी रूपये शासनाला परत गेले असून उर्वरीत रक्कम कधी परत जाईल या संदर्भात काहीच सांगितले जात नाही. जेव्हापर्यंत ही रक्कम परत जाणार नाही तेव्हापर्यंत जिल्ह्यातील शाळा सादिलवार राशीपासून वंचित राहणार आहेत. राशी परत न गेल्याचा त्रास शाळांना होत आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे. (तालुका प्रतिनिधी)मंगळवारपासून उपोषणजिल्ह्याच्या शाळांना सादिलवार राशी उपलब्ध करवून देण्यासाठी, शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याला देण्याची तारीख निश्चित करावी, जानेवारीच्या वेतनापासून वंचित आमगांव तालुक्याच्या शिक्षकांना त्वरीत वेतन देणे, अर्जित रजा, प्रसूति रजा व वैद्यकीय प्रतिपूर्ति बिल ३० मार्च पर्यनत द्या, प्रसूति रजेला आगाऊ मंजूरी देवून नियमित वेतन काढणे, एमटीसी प्रकरणात गोरेगाव तालुक्याच्या १९२ कर्मचाऱ्यांचे थांबविण्यात आलेली वेतन वाढ निश्चित करणे, इतर मागण्यांना घेऊन ३१ मार्च रोजी जि.प. शिक्षण विभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने दिला आहे. मागील २ वर्षापासून शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सुटत नाही. देवरी तालुक्याच्या ११ शाळा, तिरोडा तालुक्याच्या २ शाळा, आमगाव तालुक्याच्या सर्व शिक्षकांचे वेतन आतापर्यनत झाले नाही. फेब्रुवारी महिन्यात अनुदान उपलब्ध न झाल्यामुळे वेतन झाले नाही. शिक्षकांनी अधिक संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, जिल्हा महासचिव एस.यू. वंजारी, सुधीर वाजपेई, यू.पी. पारधी, नागसेन भालेराव, नूतन बांगरे, आनंद पुंजे, पी.के. पटले यांनी केले आहे.