शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

३१५१ गावकारभाऱ्यांचा रिझल्ट आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:26 IST

गोंदिया : जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींच्या १३८२ जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यासाठी एकूण ३१५१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ग्रामपंचायतीसाठी ...

गोंदिया : जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींच्या १३८२ जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यासाठी एकूण ३१५१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ग्रामपंचायतीसाठी ७९.८३ टक्के मतदान झाले. सोमवारी (दि.१८) मतमोजणी होणार असून ३१५१ गावकारभाऱ्यांचा रिझल्ट लागणार आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते आणि कोणासाठी विजयाचा सुपर मंडे ठरतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील मुदत पूर्ण झालेल्या एकूण १८९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पण, आठ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली, तर ३११ सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे १३८२ जागांसाठी शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यासाठी एकूण ७९.८३ टक्के मतदान झाले. यात एक लाख २६ हजार १४४ महिला आणि एक लाख २५ हजार ६०४ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८० टक्के मतदान झाल्याने मतदारांमध्येसुद्धा या निवडणुकीबाबत उत्साह दिसून आला. निवडणूक रिंगणात जरी ३१५१ उमेदवार असले, तरी प्रत्यक्षात १३८२ जागा आहेत. त्यामुळे विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडते आणि कुणाला गावाच्या विकासाचा गाडा पुढे खेचण्याची संधी मिळते, याकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

.......

सकाळी १० वाजतापासून होणार मतमोजणीला सुरुवात

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजतापासून प्रत्येक तालुकास्तरावर सुरुवात होणार आहे. गोंदिया येथे जिल्हा क्रीडासंकुल परिसरात मतमोजणी होणार असून यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३७ ग्रामपंचायतींची निवडणूक ही गोंदिया तालुक्यात होती. त्यामुळे याच तालुक्याच्या मतमोजणीला थोडा वेळ लागणार आहे. मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

.........

सरपंचासाठी करावी लागेल प्रतीक्षा

राज्य निवडणूक आयोगाने यंदा निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले नाही. त्यामुळे या निवडणुकीत फारशी चुरस दिसून आली नाही. मात्र, खर्चाला निश्चितच लगाम लागला. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर गावकऱ्यांना मात्र आपल्या गावचा सरपंच कोण होणार, यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

....

नजरा आरक्षणाकडे

सरपंचपदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने अद्यापही जाहीर केला नाही. मात्र, येत्या आठवडाभरात ते जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांच्याच नजरा याकडे लागल्या आहेत.

......

चाचणी परीक्षेवरून कळणार कल

जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यकाळ पाच महिन्यांपूर्वीच संपला आहे. त्यामुळे यासाठीसुद्धा लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्याने याच्या निकालावरून मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे आहे, याचेसुद्धा चित्र स्पष्ट होणार आहे.