शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘क्राईमवर कंट्रोल’साठी जामिनालाच लगाम

By admin | Updated: July 30, 2015 01:36 IST

गुन्हा केल्यावर पोलिसांनी एखाद्याला अटक करून न्यायालयात हजर केल्यावर लगेच तो आरोपी जामिनावर सुटका करून घेतो.

रामनगर पोलिसांचा प्रयोग : तीन गुन्ह्यातील आरोपींना नाकारला जामीन गोंदिया : गुन्हा केल्यावर पोलिसांनी एखाद्याला अटक करून न्यायालयात हजर केल्यावर लगेच तो आरोपी जामिनावर सुटका करून घेतो. यानंतर तो आरोपी पुन्हा दुसरा गुन्हा करण्याची तयारी करतो. यामुळे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असते. या वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी अटक केलेल्या आरोपीला जामीनच मिळू द्यायचा नाही, असा संकल्प रामनगर येथील नवनियुक्त ठाणेदार बाळासाहेब पवार यांनी केला आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तीन गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळू नये यासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्न करून तशी बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडली. यामुळए तीन प्रकरणातील दहा आरोपींना जामीन मिळालाच नाही. रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ मध्ये उदय भालेकर उर्फ रंजीत देवेंद्र पुरी रा. मुंबई, श्रवणकुमार जयेशराम यादव (३५) रा. मुंबई ठाणे व संगीता सरोजकुमार सायंना (३५) रा. पालघर ठाणे या तिघांना जामीन मिळू दिला नाही. या तिघांनी इंडियन एअरलाईन्स मुंबईचे ५६ लाखांचे बनावट धनादेश तयार करून ते पैसे खात्यातून वटविले. त्यांनी जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात १८ जुलै रोजी अर्ज केला. मात्र पोलीस निरीक्षक पवार यांनी त्यांचा जामीन मंजूर होऊ नये यासाठी न्यायालयाला सादर केलेल्या कागदपत्रात आरोपी बाहेर आल्यास पुन्हा गुन्हा कसे करू शकतात हे न्यायालयाला पटवून दिले. त्यामुळे त्या आरोपींचा जामीन न्यायालयाने नामंजूर केला. दुसऱ्या एका गुन्ह्यात कलम ३६४ अ, ३८५, १२० ब, ५०६, ३४ अंतर्गत अटकेत असलेले आरोपी गोकूल मनिराम मंडलवार (२५), राजा बबलू सागर (२५)विजय कृष्णा चौधरी (३०) रा.बालाघाट, मोहम्मद सर्फराज रजा उर्फ जमीलभाई अब्दुल करीम कुरेशी (३६) रा. रामनगर, निशा उर्फ पिंकी उर्फ सिमा राणा चमनलाल मरठे (१९) रा.गोंदिया व गीता उर्फ पूजा गोकुल मंडलवार (२३) रा.बालाघाट या सहा जणांना जामीन मंजूर होऊ नये, ते समाजासाठी कसे घातक आहेत हे पोलीस निरीक्षक पवार यांनी न्यायालयासमोर मांडले. परिणामी त्यांचाही जामीन रद्द झाला. रामनगरातील एका मुलीला प्रेमात अडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवेगावबांध येथील रोहीत रमेश बागळे (१९) यालाही जामीन मंजूर होऊ दिला नाही. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी त्यांना आरोपींचा जामीन रद्द करून त्यांना तुरूंगातच ठेवल्यास समाजात वावरणाऱ्या इतर गुन्हेगारांमध्ये धसका बसून ते गुन्हे करण्यास घाबरतील या कारणाने त्यांचे जामीन कसे रद्द करता येईल, याकडेच त्यांनी आधी लक्ष केंद्रीत केले आहे. हा प्रयोग जिल्ह्यात अनोखा ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)न मारता गुन्हे नियंत्रणातएखाद्या आरोपीने गुन्हा केला तरी त्याला मारू नका असे मानवाधिकार सांगत असल्याने आरोपींना न मारताही गुन्हे नियंत्रणात येऊ शकतात. गुन्हा केलेल्या आरोपीला जामीन होऊच द्यायचा नाही. त्यासाठी न्यायालयात पोलीस यंत्रणेकडून तसे प्रयत्न करणे गरजेचे आहे. जामिनाचा अर्ज रद्द होत असल्याचे पाहून इतर आरोपी गुन्हे करणार नाहीत. अटक झालेले आरोपी तुरूंगातच राहतील.गुन्हेगारांना मारहाण केल्यास ते गुन्हे करायला विसरत नाही. त्यांना हात न लावता त्यांचा जामीनच होऊ द्यायचा नाही, असा संकल्प प्रत्येक तपासी अंमलदाराने केल्यास आरोपींचा जामीन होणार नाही. परिणामी आरोपींना तुरूंगातच राहावे लागेल. तो आरोपी बाहेर आल्यास तो समाजासाठी कसा घातक आहे हे पटवून दिल्यामुळे सदर आरोपींचा जामीन न्यायालय मंजूर करणार नाही.- बाळासाहेब पवार पोलीस निरीक्षक, पो.स्टे. रामनगर