शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

‘क्राईमवर कंट्रोल’साठी जामिनालाच लगाम

By admin | Updated: July 30, 2015 01:36 IST

गुन्हा केल्यावर पोलिसांनी एखाद्याला अटक करून न्यायालयात हजर केल्यावर लगेच तो आरोपी जामिनावर सुटका करून घेतो.

रामनगर पोलिसांचा प्रयोग : तीन गुन्ह्यातील आरोपींना नाकारला जामीन गोंदिया : गुन्हा केल्यावर पोलिसांनी एखाद्याला अटक करून न्यायालयात हजर केल्यावर लगेच तो आरोपी जामिनावर सुटका करून घेतो. यानंतर तो आरोपी पुन्हा दुसरा गुन्हा करण्याची तयारी करतो. यामुळे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असते. या वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी अटक केलेल्या आरोपीला जामीनच मिळू द्यायचा नाही, असा संकल्प रामनगर येथील नवनियुक्त ठाणेदार बाळासाहेब पवार यांनी केला आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तीन गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळू नये यासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्न करून तशी बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडली. यामुळए तीन प्रकरणातील दहा आरोपींना जामीन मिळालाच नाही. रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ मध्ये उदय भालेकर उर्फ रंजीत देवेंद्र पुरी रा. मुंबई, श्रवणकुमार जयेशराम यादव (३५) रा. मुंबई ठाणे व संगीता सरोजकुमार सायंना (३५) रा. पालघर ठाणे या तिघांना जामीन मिळू दिला नाही. या तिघांनी इंडियन एअरलाईन्स मुंबईचे ५६ लाखांचे बनावट धनादेश तयार करून ते पैसे खात्यातून वटविले. त्यांनी जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात १८ जुलै रोजी अर्ज केला. मात्र पोलीस निरीक्षक पवार यांनी त्यांचा जामीन मंजूर होऊ नये यासाठी न्यायालयाला सादर केलेल्या कागदपत्रात आरोपी बाहेर आल्यास पुन्हा गुन्हा कसे करू शकतात हे न्यायालयाला पटवून दिले. त्यामुळे त्या आरोपींचा जामीन न्यायालयाने नामंजूर केला. दुसऱ्या एका गुन्ह्यात कलम ३६४ अ, ३८५, १२० ब, ५०६, ३४ अंतर्गत अटकेत असलेले आरोपी गोकूल मनिराम मंडलवार (२५), राजा बबलू सागर (२५)विजय कृष्णा चौधरी (३०) रा.बालाघाट, मोहम्मद सर्फराज रजा उर्फ जमीलभाई अब्दुल करीम कुरेशी (३६) रा. रामनगर, निशा उर्फ पिंकी उर्फ सिमा राणा चमनलाल मरठे (१९) रा.गोंदिया व गीता उर्फ पूजा गोकुल मंडलवार (२३) रा.बालाघाट या सहा जणांना जामीन मंजूर होऊ नये, ते समाजासाठी कसे घातक आहेत हे पोलीस निरीक्षक पवार यांनी न्यायालयासमोर मांडले. परिणामी त्यांचाही जामीन रद्द झाला. रामनगरातील एका मुलीला प्रेमात अडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवेगावबांध येथील रोहीत रमेश बागळे (१९) यालाही जामीन मंजूर होऊ दिला नाही. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी त्यांना आरोपींचा जामीन रद्द करून त्यांना तुरूंगातच ठेवल्यास समाजात वावरणाऱ्या इतर गुन्हेगारांमध्ये धसका बसून ते गुन्हे करण्यास घाबरतील या कारणाने त्यांचे जामीन कसे रद्द करता येईल, याकडेच त्यांनी आधी लक्ष केंद्रीत केले आहे. हा प्रयोग जिल्ह्यात अनोखा ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)न मारता गुन्हे नियंत्रणातएखाद्या आरोपीने गुन्हा केला तरी त्याला मारू नका असे मानवाधिकार सांगत असल्याने आरोपींना न मारताही गुन्हे नियंत्रणात येऊ शकतात. गुन्हा केलेल्या आरोपीला जामीन होऊच द्यायचा नाही. त्यासाठी न्यायालयात पोलीस यंत्रणेकडून तसे प्रयत्न करणे गरजेचे आहे. जामिनाचा अर्ज रद्द होत असल्याचे पाहून इतर आरोपी गुन्हे करणार नाहीत. अटक झालेले आरोपी तुरूंगातच राहतील.गुन्हेगारांना मारहाण केल्यास ते गुन्हे करायला विसरत नाही. त्यांना हात न लावता त्यांचा जामीनच होऊ द्यायचा नाही, असा संकल्प प्रत्येक तपासी अंमलदाराने केल्यास आरोपींचा जामीन होणार नाही. परिणामी आरोपींना तुरूंगातच राहावे लागेल. तो आरोपी बाहेर आल्यास तो समाजासाठी कसा घातक आहे हे पटवून दिल्यामुळे सदर आरोपींचा जामीन न्यायालय मंजूर करणार नाही.- बाळासाहेब पवार पोलीस निरीक्षक, पो.स्टे. रामनगर