शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ववत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST

गोंदिया : कोरोनाकाळात संपूर्ण ग्रामीण भागातील बस सेवा बंद करण्यात आली होती. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे ...

गोंदिया : कोरोनाकाळात संपूर्ण ग्रामीण भागातील बस सेवा बंद करण्यात आली होती. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने सर्वच क्षेत्र लॉकडाऊनपासून मोकळे केले आहे. त्यामुळे मागच्या ६ महिन्यांपासून बंद असलेली ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी ढाकणी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रीतम मेश्राम यांनी प्रशासनाकडे केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने मागच्या मार्च महिन्यात संपूर्ण बस सेवा बंद केली होती. त्यात ग्रामीण भागातील बस सेवेचाही सहभाग होता. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन शिथिल करून बाजारपेठा तसेच वाहतुकीचे क्षेत्र मोकळे केले आहे. त्यात मोठ्या शहरांना तसेच जिल्हास्थळांना जोडणारी बस सेवादेखील सुरू करण्यात आली. परंतु अद्यापही ग्रामीण भागातील बस सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे.

ग्रामीण भागातील दळणवळणाचे मुख्य साधन म्हणून बस सेवेची ओळख आहे. त्यातच बस सेवा बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना शहरात रोजगारासाठी येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता शाळा व महाविद्यालयदेखील सुरू झाल्यामुळे विद्यार्थी व शाळकरी मुलींना येण्या-जाण्यासाठी मोठी अडचण येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तसेच एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ववत व नियमित सुरू करावी, अशी मागणी मेश्राम यांनी प्रशासनाकडे लावून धरली आहे.