शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

५८ जणांच्या खांद्यावर ७० गावांची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:10 IST

सुरेश येडे रावणवाडी : महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या येथील पोलीस ठाण्याला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. ठाण्यात ...

सुरेश येडे

रावणवाडी : महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या येथील पोलीस ठाण्याला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. ठाण्यात कार्यरत ३ अधिकारी व ५५ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ७० गावांची जबाबदारी आहे. परिणामी पोलीस कर्मचारी कामाच्या ताणात असतानाच सामान्य नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

रावणवाडी पोलीस ठाण्यात १४५ पोलीस कर्मचारी व ५ अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र वास्तविक अर्ध्यापेक्षाही कमी अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांवर असलेल्या कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पोलीस विविध घटनास्थळी वेळीच पोहचू शकत नाही. मात्र त्यानंतरही रावणवाडी पोलीस आपले कर्तव्य पूर्ण जबाबदारीने पार पाडत आहेत. परिसरातील नागरिकांना पोलीस सुविधा वेळीच मिळावी यासाठी सुमारे १० वर्षांपूर्वी रावणवाडी पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली. मात्र केवळ ३० टक्के कर्मचारी कार्यरत असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. दोन राज्यातील वाहनांची येथून मोठ्या प्रमाणात ये-जा असते. यामुळे कित्येक अपघात घडत असून हद्दीतील गावांमध्ये विविध गु्न्ह्यांच्या तक्रारीही येतात. मात्र कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे नागरिकांना वेळीच पोलिसांची मदत मिळत नाही. पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे पोलिसांची गस्तही रात्री कधी कधीच होते. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत रावणवाडी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

----------------------------

भाड्याच्या घरात सुरू आहे ठाणे

येथील पोलीस ठाणे एका भाड्याच्या घरात सुरू आहे. एखाद्या आरोपीला कोठडीत ठेवण्याची गरज पडल्यास रावणवाडी पोलिसांना त्या आरोपीला अन्य ठाण्यात ठेवावे लागते. परिणामी पोलिसांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. ठाण्यात आरोपीला ठेवण्याची सुविधा असती तर, पोलिसांना कारवाई करण्यात सुविधा झाली असती.

----------------------------

कासव गतीने सुरू आहे इमारत बांधकाम

पोलीस ठाणे इमारत व कर्मचारी क्वार्टर्सचे बांधकाम मागील ४ वर्षांपासून सुरू असून अद्यापही पूर्ण झालेले नाही. कासव गतीने सुरू असलेले काम बघता हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी २ वर्षे लागू शकतात. लवकरात लवकर पोलीस ठाणे व क्वार्टर्सचे काम पूर्ण झाल्यास पोलिसांना समस्यांचा सामना करावा लागणार नाही.