शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

५८ जणांच्या खांद्यावर ७० गावांची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:10 IST

सुरेश येडे रावणवाडी : महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या येथील पोलीस ठाण्याला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. ठाण्यात ...

सुरेश येडे

रावणवाडी : महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या येथील पोलीस ठाण्याला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. ठाण्यात कार्यरत ३ अधिकारी व ५५ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ७० गावांची जबाबदारी आहे. परिणामी पोलीस कर्मचारी कामाच्या ताणात असतानाच सामान्य नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

रावणवाडी पोलीस ठाण्यात १४५ पोलीस कर्मचारी व ५ अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र वास्तविक अर्ध्यापेक्षाही कमी अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांवर असलेल्या कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पोलीस विविध घटनास्थळी वेळीच पोहचू शकत नाही. मात्र त्यानंतरही रावणवाडी पोलीस आपले कर्तव्य पूर्ण जबाबदारीने पार पाडत आहेत. परिसरातील नागरिकांना पोलीस सुविधा वेळीच मिळावी यासाठी सुमारे १० वर्षांपूर्वी रावणवाडी पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली. मात्र केवळ ३० टक्के कर्मचारी कार्यरत असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. दोन राज्यातील वाहनांची येथून मोठ्या प्रमाणात ये-जा असते. यामुळे कित्येक अपघात घडत असून हद्दीतील गावांमध्ये विविध गु्न्ह्यांच्या तक्रारीही येतात. मात्र कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे नागरिकांना वेळीच पोलिसांची मदत मिळत नाही. पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे पोलिसांची गस्तही रात्री कधी कधीच होते. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत रावणवाडी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

----------------------------

भाड्याच्या घरात सुरू आहे ठाणे

येथील पोलीस ठाणे एका भाड्याच्या घरात सुरू आहे. एखाद्या आरोपीला कोठडीत ठेवण्याची गरज पडल्यास रावणवाडी पोलिसांना त्या आरोपीला अन्य ठाण्यात ठेवावे लागते. परिणामी पोलिसांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. ठाण्यात आरोपीला ठेवण्याची सुविधा असती तर, पोलिसांना कारवाई करण्यात सुविधा झाली असती.

----------------------------

कासव गतीने सुरू आहे इमारत बांधकाम

पोलीस ठाणे इमारत व कर्मचारी क्वार्टर्सचे बांधकाम मागील ४ वर्षांपासून सुरू असून अद्यापही पूर्ण झालेले नाही. कासव गतीने सुरू असलेले काम बघता हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी २ वर्षे लागू शकतात. लवकरात लवकर पोलीस ठाणे व क्वार्टर्सचे काम पूर्ण झाल्यास पोलिसांना समस्यांचा सामना करावा लागणार नाही.