शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रोजगार सेवकांचे मानधन द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:00 IST

अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कार्यरत रोजगार सेवकांना त्यांचा कामाचा मोबदला अविलंब देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्याकडे लिखित पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून प्रलंबित : उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कार्यरत रोजगार सेवकांना त्यांचा कामाचा मोबदला अविलंब देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्याकडे लिखित पत्राद्वारे केली आहे.ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्यावतीने करण्यात येणाºया कामाचा लेखाजोगा गावपातळीवर रोजगार सेवक करतात. रोहयो कामाच्या अंदाजपत्रकावर रोजगार सेवकाचा मेहनताना काढला जातो, असे समजते. तालुक्यातील रोजगार सेवकांना मागील सहा महिन्यांपासून केलेल्या कामाचा मेहनताना मिळाला नाही. नियमित मोबदला मिळत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे.कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार सेवकांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन अविलंब मागील ६ महिन्यांपासूनचा थकीत मेहनताना देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्याकडे केली आहे.तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मग्रारोहयो) यांना सुध्दा निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.अन्यथा कामबंद आंदोलनतालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेच्यावतीने १४ फेब्रुवारी २०१८ ते ३१ मार्च १८ व १ एप्रिल १८ ते ३१ जुलै १८ पर्यंतचा मोबदला अविलंब देण्यात यावा, अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा पं.स. सभापती अरविंद शिवणकर यांना शनिवारी (दि.४) दिलेल्या निवेदनातून दिला आहे. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन सभापती शिवणकर यांनी त्याचक्षणी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांना निवेदन पाठवून रोजगार सेवकांचा ६ महिन्यांपासून थकीत असलेला मेहनताना देण्यासंबंधी साकडे घातले. तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने रोजगार सेवकांचा दर ३ महिन्यांनी मोबदला काढण्यात यावा, अशी मागणीसुध्दा करण्यात आली आहे.