शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आदर्श ग्राम निर्मितीचा संकल्प

By admin | Updated: November 26, 2014 23:09 IST

ग्रामपंचायत सजेगाव खुर्द येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि.२४) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भजन, कीर्तनातून जनजागृती करीत आदर्श

रात्रभर भजन-कीर्तन : राष्ट्रसंत तुकडोजी पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमगोंदिया : ग्रामपंचायत सजेगाव खुर्द येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि.२४) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भजन, कीर्तनातून जनजागृती करीत आदर्श ग्राम निर्मितीचा संकल्प करण्यात आला.पहाटे ५.३० वाजता सामुदायिक ध्यानपाठ सुरेश सोनवाने व तालुका सेवाधिकारी भोजलाल बिसेन यांच्या सहकार्याने पार पडले. दुपारी १ वाजता जिल्हा प्रचार प्रमुख भोजराज बघेले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी देवराम कटरे, भोजलाल बिसेन, नानू बघेले, गोरेगाव तालुका प्रचारक लिखीराम पटले सचिव उपस्थित होते. गुरुदेव सेवा मंडळ सेजगाव, मुंडीपार व डोंगरगाव येथील सदस्यांनी भजने सादर केली. सामुदायिक प्रार्थना सायंकाळी ६ वाजता आचार्य एम.ए. ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पार पडली. चिंतनपर भाषण प्रचारक चंद्रशेखर आसेकर यांनी केले. रात्रीला हभप चंदन चौधरी महाराज, हभप प्रेमलाल घरत पाथरी, हभप चमरु बिसेन, हभप कटरे महाराज यांचे कीर्तन झाले. रात्री १२.३० वाजता राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.गावातून रामधुनची दिंडी निघाली या सोहळ्यात श्रीगुरुदेव सेवामंडळ सेजगाव खुर्द, भानपुर, मुंडीपार, रतनारा, जांभूळपाणी, डोंगरगाव, पाथरी, दागोटोला, मुर्री, दुर्गामंडळ, सेजगाव यांनी सहभाग घेतला होता. अत्यंत प्रभावी भजने सादर करण्यात आले. सगळ्या मंडळाकडून व राष्ट्रसंताचे दोन भजने सादर करण्यात आले. आचार्य एम.एम. ठाकूर गुरुजींच्या अमृतवाणीने गोपाल काल्याचे किर्तन करण्यात आले. त्यात राष्ट्रीय एकात्मता, ग्राम स्वरंक्षण दलाची गरज, समता, बंधुता, ग्राम हेच मंदिर, ग्राम जनतेचा सांस्कृतीक, आध्यामिक व पारमार्थिक विकास करुन ग्राम आदर्श कसे करता येईल यावर विशेष भर देण्यात आला.समारोपीय कार्यक्रमास विनोद अग्रवाल, बबलू रहांगडाले, संदीप बघेले, संजय कुलकर्णी, भाऊराव कठाने, रामेश्वर चौरागडे, भोजराज बघेले, देवराम कटरे, अशोक हरिणखेडे, धनंजय रिनाईत, रमेश चिल्हारे, मुन्ना सोनवाने, लिलाधर बोपचे, छगन पटले आदी मंडळी उपस्थित होते. परिसरातील तसेच गावातील मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होती.यावेळी विनोद अग्रवाल यांनी जनतेला तुकडोजी महाराजांचे तत्वज्ञान तेच ग्रामगीतेचे तत्वज्ञान घरा-घरापर्यंत जाण्यासाठी सामूहिक प्रार्थना व ज्ञान अत्यावश्यक असून प्रत्येकाने सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक घरात ग्रामगीता असणे आवश्यक असल्याचे आचार्य एम.ए. ठाकूर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष भोजलाल बिसेन, मुन्ना सोनवाने व गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व सेवकांनी सहकार्य केले. राष्ट्रवंदनेही कार्यक्रमाची सांगता झाली.या पुण्यतिथी महोत्सवात महाप्रसादाच आयोजन करण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)