शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

टेकाबेदरवासीयांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

लोहारा : देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या पिंडकेपार-गोटाबोडी अंतर्गत मौजा टेकाबेदर येथे मागील २ वर्षांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण ...

लोहारा : देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या पिंडकेपार-गोटाबोडी अंतर्गत मौजा टेकाबेदर येथे मागील २ वर्षांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सन १९७९ मध्ये गावात प्रथम बोअरवेल खोदून पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या बोअरवेलला भरपूर पाणी लागले होते. नंतर काही काळात ४ बोअरवेल खोदून हातपंप बसविण्यात आले. असे एकूण ५ बोअरवेल खोदण्यात आले. पंरतु यापैकी ३ बाेअरवेल निकामी आहेत. एकाला खूपच कमी पाणी असल्याने ग्रामस्थानां भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सन १९९८-९९ या कालावधीत गावात नळयोजना अंमलात आली. तेव्हा गावातील प्रथम बोअरवेलने पाण्याचा पुरवठा पाणी टाकीत करून गावात नियमित पाणी पुरविले जात होते. त्या सर्व बोअरवेलची खोली २०० फूट आहे. सन १९८१ ते २०१९ पर्यंत गावाला एकाच बोअरवेलने पाणी पुरविले गेले. या काळात गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासली नाही. परंतु सन २०१९ पासून गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाला पाणी पुरवठा होणाऱ्या बोअरवेलजवळ गावातील एकाने स्वतःच्या मालकीची ३५० फूट खोल बोअरवेल खोदली आहे. तेव्हापासून पाणी टाकीला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बोअरवेलला पाणी कमी झाल्याने संपूर्ण टेकाबेदर गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाईची तक्रार घेऊन गावकऱ्यांनी प्रथमत: पिंडकेपार येथील गट ग्रामपंचायतकडे धाव घेतली. परंतु ग्रामपंचायतने समस्येकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून गट विकास अधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. यावर तहसीलदारांनी पाणीपुरवठा विभागाचे संदीप पवार यांना मौका चौकशी करण्यास सांगितले. संदीप पवार यांनी टेकाबेदर गावाला भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली तेव्हा त्यांनी पाणी टाकी लगत ४०-५० फूट अंतरावर असलेल्या त्या शेतकऱ्याचा पंप बंद करायला सांगितले. पण त्यांनी तो पंप बंद केला नाही. या विषयासंदर्भात उपविभागीय अभियंता, उपविभागीय वीज कार्यालयालाही गावकऱ्यांनी निवेदन दिले. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने पाणी टचांईचा प्रश्न सुटला नाही.

....................

काही लोकांमुळे गावकऱ्यांना त्रास

निसर्गाने नाही तर गावातील १-२ लोकांनी संपूर्ण गावाला संकटात टाकले असून आजघडीला पाण्याच्या शोधात गावकरी १-२ किलोमीटर अंतरावरून शेतातल्या बोअरवेलचे पाणी पिण्याकरिता आणतात. पण ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची सुद्धा जाणीव गावकऱ्यांना नाही. अशात पाणी संकटांचा सामना गावकरी भर पावसाळ्यातही करीत आहेत. योग्य ती चौकशी करून पाणी टंचाईची समस्या सोडविण्याची मागणी गावकऱ्यांनी अनेकदा स्थानिक ग्रामपंचायतसह तालुका व जिल्हा प्रशासनाकडे केली. पंरतु प्रशासन व लोकप्रतिनीधींच्या सततच्या वेळकाढू धोरणामुळे हा प्रश्न सुटला नाही. आता सोमवारी (दि.२६) गावकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.