शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टेकाबेदरवासीयांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

लोहारा : देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या पिंडकेपार-गोटाबोडी अंतर्गत मौजा टेकाबेदर येथे मागील २ वर्षांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण ...

लोहारा : देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या पिंडकेपार-गोटाबोडी अंतर्गत मौजा टेकाबेदर येथे मागील २ वर्षांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सन १९७९ मध्ये गावात प्रथम बोअरवेल खोदून पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या बोअरवेलला भरपूर पाणी लागले होते. नंतर काही काळात ४ बोअरवेल खोदून हातपंप बसविण्यात आले. असे एकूण ५ बोअरवेल खोदण्यात आले. पंरतु यापैकी ३ बाेअरवेल निकामी आहेत. एकाला खूपच कमी पाणी असल्याने ग्रामस्थानां भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सन १९९८-९९ या कालावधीत गावात नळयोजना अंमलात आली. तेव्हा गावातील प्रथम बोअरवेलने पाण्याचा पुरवठा पाणी टाकीत करून गावात नियमित पाणी पुरविले जात होते. त्या सर्व बोअरवेलची खोली २०० फूट आहे. सन १९८१ ते २०१९ पर्यंत गावाला एकाच बोअरवेलने पाणी पुरविले गेले. या काळात गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासली नाही. परंतु सन २०१९ पासून गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाला पाणी पुरवठा होणाऱ्या बोअरवेलजवळ गावातील एकाने स्वतःच्या मालकीची ३५० फूट खोल बोअरवेल खोदली आहे. तेव्हापासून पाणी टाकीला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बोअरवेलला पाणी कमी झाल्याने संपूर्ण टेकाबेदर गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाईची तक्रार घेऊन गावकऱ्यांनी प्रथमत: पिंडकेपार येथील गट ग्रामपंचायतकडे धाव घेतली. परंतु ग्रामपंचायतने समस्येकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून गट विकास अधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. यावर तहसीलदारांनी पाणीपुरवठा विभागाचे संदीप पवार यांना मौका चौकशी करण्यास सांगितले. संदीप पवार यांनी टेकाबेदर गावाला भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली तेव्हा त्यांनी पाणी टाकी लगत ४०-५० फूट अंतरावर असलेल्या त्या शेतकऱ्याचा पंप बंद करायला सांगितले. पण त्यांनी तो पंप बंद केला नाही. या विषयासंदर्भात उपविभागीय अभियंता, उपविभागीय वीज कार्यालयालाही गावकऱ्यांनी निवेदन दिले. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने पाणी टचांईचा प्रश्न सुटला नाही.

....................

काही लोकांमुळे गावकऱ्यांना त्रास

निसर्गाने नाही तर गावातील १-२ लोकांनी संपूर्ण गावाला संकटात टाकले असून आजघडीला पाण्याच्या शोधात गावकरी १-२ किलोमीटर अंतरावरून शेतातल्या बोअरवेलचे पाणी पिण्याकरिता आणतात. पण ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची सुद्धा जाणीव गावकऱ्यांना नाही. अशात पाणी संकटांचा सामना गावकरी भर पावसाळ्यातही करीत आहेत. योग्य ती चौकशी करून पाणी टंचाईची समस्या सोडविण्याची मागणी गावकऱ्यांनी अनेकदा स्थानिक ग्रामपंचायतसह तालुका व जिल्हा प्रशासनाकडे केली. पंरतु प्रशासन व लोकप्रतिनीधींच्या सततच्या वेळकाढू धोरणामुळे हा प्रश्न सुटला नाही. आता सोमवारी (दि.२६) गावकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.