शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

टेकाबेदरवासीयांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

लोहारा : देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या पिंडकेपार-गोटाबोडी अंतर्गत मौजा टेकाबेदर येथे मागील २ वर्षांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण ...

लोहारा : देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या पिंडकेपार-गोटाबोडी अंतर्गत मौजा टेकाबेदर येथे मागील २ वर्षांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सन १९७९ मध्ये गावात प्रथम बोअरवेल खोदून पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या बोअरवेलला भरपूर पाणी लागले होते. नंतर काही काळात ४ बोअरवेल खोदून हातपंप बसविण्यात आले. असे एकूण ५ बोअरवेल खोदण्यात आले. पंरतु यापैकी ३ बाेअरवेल निकामी आहेत. एकाला खूपच कमी पाणी असल्याने ग्रामस्थानां भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सन १९९८-९९ या कालावधीत गावात नळयोजना अंमलात आली. तेव्हा गावातील प्रथम बोअरवेलने पाण्याचा पुरवठा पाणी टाकीत करून गावात नियमित पाणी पुरविले जात होते. त्या सर्व बोअरवेलची खोली २०० फूट आहे. सन १९८१ ते २०१९ पर्यंत गावाला एकाच बोअरवेलने पाणी पुरविले गेले. या काळात गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासली नाही. परंतु सन २०१९ पासून गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाला पाणी पुरवठा होणाऱ्या बोअरवेलजवळ गावातील एकाने स्वतःच्या मालकीची ३५० फूट खोल बोअरवेल खोदली आहे. तेव्हापासून पाणी टाकीला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बोअरवेलला पाणी कमी झाल्याने संपूर्ण टेकाबेदर गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाईची तक्रार घेऊन गावकऱ्यांनी प्रथमत: पिंडकेपार येथील गट ग्रामपंचायतकडे धाव घेतली. परंतु ग्रामपंचायतने समस्येकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून गट विकास अधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. यावर तहसीलदारांनी पाणीपुरवठा विभागाचे संदीप पवार यांना मौका चौकशी करण्यास सांगितले. संदीप पवार यांनी टेकाबेदर गावाला भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली तेव्हा त्यांनी पाणी टाकी लगत ४०-५० फूट अंतरावर असलेल्या त्या शेतकऱ्याचा पंप बंद करायला सांगितले. पण त्यांनी तो पंप बंद केला नाही. या विषयासंदर्भात उपविभागीय अभियंता, उपविभागीय वीज कार्यालयालाही गावकऱ्यांनी निवेदन दिले. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने पाणी टचांईचा प्रश्न सुटला नाही.

....................

काही लोकांमुळे गावकऱ्यांना त्रास

निसर्गाने नाही तर गावातील १-२ लोकांनी संपूर्ण गावाला संकटात टाकले असून आजघडीला पाण्याच्या शोधात गावकरी १-२ किलोमीटर अंतरावरून शेतातल्या बोअरवेलचे पाणी पिण्याकरिता आणतात. पण ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची सुद्धा जाणीव गावकऱ्यांना नाही. अशात पाणी संकटांचा सामना गावकरी भर पावसाळ्यातही करीत आहेत. योग्य ती चौकशी करून पाणी टंचाईची समस्या सोडविण्याची मागणी गावकऱ्यांनी अनेकदा स्थानिक ग्रामपंचायतसह तालुका व जिल्हा प्रशासनाकडे केली. पंरतु प्रशासन व लोकप्रतिनीधींच्या सततच्या वेळकाढू धोरणामुळे हा प्रश्न सुटला नाही. आता सोमवारी (दि.२६) गावकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.