शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

आयएसओ दर्जासाठी निवासी शाळेची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:28 IST

मुर्री येथील अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळा नुकतीच १६ दिवस विद्युत पुरवठा खंडीत असल्याच्या मुद्दावरुन चर्चेत आली होती.

ठळक मुद्देप्राथमिक सुविधांचा अभाव : समाजकल्याण विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुर्री येथील अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळा नुकतीच १६ दिवस विद्युत पुरवठा खंडीत असल्याच्या मुद्दावरुन चर्चेत आली होती. या दरम्यान येथील सोयी सुविधांचा भोंगळ कारभार पुढे आला होता. याच शाळेची आता आयएसओ दर्जा मिळविण्यासाठी धडपड सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे.दुर्गम आदिवासी भागातील गरीब अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निवासी राहून दर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी मुर्री येथे या विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून शासकीय निवासी शाळा व वसतिगृह सुरू करण्यात आले. सध्या येथे इयत्ता पाचवी ते दहावीचे १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, दोन वेळेचे जेवण, नाश्ता तसेच इतर सुविधा समाज कल्याण विभागातंर्गत पुरविल्या जातात. यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान देखील या शाळेला दिले जाते. मात्र यानंतरही येथे सोयी सुविधांचा अभाव आहे. या शाळेच्या इमारतीच्या खिडक्यांचे काचे फुटली आहे, तसेच सुरक्षित वीज पुरवठ्याचा अभाव, एकाही खिडक्यांना पडदे नाहीत, खोल्यांमधील पंखे केवळ नावापूरतेच आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया जेवणाचा दर्जा देखील चांगला नसल्याची ओरड येथील विद्यार्थ्यांची आहे. विद्यार्थ्यांनी एखाद्या गोष्टीची तक्रार केल्यास त्या तक्रारीचे निराकरण करण्याऐवजी वसतिगृहाच्या अधिकाºयांना त्यांनाच दमदाटी केली जात असल्याचे काही विद्यार्थ्यांनी नाव लिहिण्याच्या अटीवर सांगितले. एकंदरीत येथे विविध सोयी सुविधांचा अभाव असताना आता समाज कल्याण विभागाने या शाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी धडपड सुरू केली आहे. ही निवासी शाळा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या जिल्ह्यातील असल्याने काहीही झाले तरी शाळेला आयएसओ दर्जा मिळालाच पाहिजे अशी भूमिका समाज कल्याण विभागाच्या अधिकाºयांनी घेतल्याची माहिती आहे.अधिकाºयांची शाळेकडे पाठमुर्री येथील अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळा व वसतिगृहाचा विद्युत पुरवठा तब्बल १६ दिवस खंडित होता. विद्यार्थी अंधारात झोपत होते. मात्र याची जबाबदारी असलेल्या समाज कल्याण विभागाने या शाळेला भेट देणे टाळले होते. लोकमतने यासंबंधीचे वृत्त प्रकाशीत केल्यानंतर अधिकाºयांनी वसतिगृहाकडे धाव घेतली होती. नियमानुसार शासकीय निवासी शाळा व वसतिगृहाना अधिकाºयांनी भेटी देणे अनिवार्य आहे. मात्र यानंतरही अधिकारी याकडे दुर्लक्ष करित असल्याचे चित्र आहे.