शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

आयएसओ दर्जासाठी निवासी शाळेची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:28 IST

मुर्री येथील अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळा नुकतीच १६ दिवस विद्युत पुरवठा खंडीत असल्याच्या मुद्दावरुन चर्चेत आली होती.

ठळक मुद्देप्राथमिक सुविधांचा अभाव : समाजकल्याण विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुर्री येथील अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळा नुकतीच १६ दिवस विद्युत पुरवठा खंडीत असल्याच्या मुद्दावरुन चर्चेत आली होती. या दरम्यान येथील सोयी सुविधांचा भोंगळ कारभार पुढे आला होता. याच शाळेची आता आयएसओ दर्जा मिळविण्यासाठी धडपड सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे.दुर्गम आदिवासी भागातील गरीब अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निवासी राहून दर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी मुर्री येथे या विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून शासकीय निवासी शाळा व वसतिगृह सुरू करण्यात आले. सध्या येथे इयत्ता पाचवी ते दहावीचे १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, दोन वेळेचे जेवण, नाश्ता तसेच इतर सुविधा समाज कल्याण विभागातंर्गत पुरविल्या जातात. यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान देखील या शाळेला दिले जाते. मात्र यानंतरही येथे सोयी सुविधांचा अभाव आहे. या शाळेच्या इमारतीच्या खिडक्यांचे काचे फुटली आहे, तसेच सुरक्षित वीज पुरवठ्याचा अभाव, एकाही खिडक्यांना पडदे नाहीत, खोल्यांमधील पंखे केवळ नावापूरतेच आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया जेवणाचा दर्जा देखील चांगला नसल्याची ओरड येथील विद्यार्थ्यांची आहे. विद्यार्थ्यांनी एखाद्या गोष्टीची तक्रार केल्यास त्या तक्रारीचे निराकरण करण्याऐवजी वसतिगृहाच्या अधिकाºयांना त्यांनाच दमदाटी केली जात असल्याचे काही विद्यार्थ्यांनी नाव लिहिण्याच्या अटीवर सांगितले. एकंदरीत येथे विविध सोयी सुविधांचा अभाव असताना आता समाज कल्याण विभागाने या शाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी धडपड सुरू केली आहे. ही निवासी शाळा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या जिल्ह्यातील असल्याने काहीही झाले तरी शाळेला आयएसओ दर्जा मिळालाच पाहिजे अशी भूमिका समाज कल्याण विभागाच्या अधिकाºयांनी घेतल्याची माहिती आहे.अधिकाºयांची शाळेकडे पाठमुर्री येथील अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळा व वसतिगृहाचा विद्युत पुरवठा तब्बल १६ दिवस खंडित होता. विद्यार्थी अंधारात झोपत होते. मात्र याची जबाबदारी असलेल्या समाज कल्याण विभागाने या शाळेला भेट देणे टाळले होते. लोकमतने यासंबंधीचे वृत्त प्रकाशीत केल्यानंतर अधिकाºयांनी वसतिगृहाकडे धाव घेतली होती. नियमानुसार शासकीय निवासी शाळा व वसतिगृहाना अधिकाºयांनी भेटी देणे अनिवार्य आहे. मात्र यानंतरही अधिकारी याकडे दुर्लक्ष करित असल्याचे चित्र आहे.