शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

निम्म्या जिल्ह्यासाठी तारणहार ठरणारा जलाशय उपेक्षित का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:23 IST

विजय मानकर : सालेकसा जिल्ह्यातील गोंदिया-आमगाव-सालेकसा देवरी तालुक्यांतील लोकांची तहान भागविणाऱ्यासह अन्नपाण्याची सोय करण्याच्या मुख्य स्रोत असलेला सिरपूर धरण ...

विजय मानकर : सालेकसा जिल्ह्यातील गोंदिया-आमगाव-सालेकसा देवरी तालुक्यांतील लोकांची तहान भागविणाऱ्यासह अन्नपाण्याची सोय करण्याच्या मुख्य स्रोत असलेला सिरपूर धरण (मनोहर सरोवर) सध्या शासनाकडून सपशेल उपेक्षित केला जात आहे. सिरपूर धरणाला संचालित करीत पाण्याच्या नियोजनाची व्यवस्था सांभाळणाऱ्या पाटबंधारे विभागात एकूण २२ पदांपैकी एकही पद भरलेले नसून, एक-दोन उधारीच्या कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे.

देवरी तालुक्यातील सिरपूर गावाजवळ वाघ नदीवर सिरपूृर धरण बांधलेला असून महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवर आहे. १९७० मध्ये मध्यप्रदेश शासनाच्या सहमतीने या धरणाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. धरणनिर्मितीसाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांचा सिंहाचा वाटा राहिला. त्यामुळे या धरणाला मनोहर सरोवर असे नाव देण्यात आले. परंतु एवढे मोठे असलेले धरण आज एवढे उपेक्षित आहे. २४.६९ मीटर उंच आणि २८४० मीटर लांब असलेले सिरपूर धरण भीषण पाणीटंचाईमध्ये तहान भागविणारे आणि दुष्काळावर मात करण्यास महत्त्वपूर्ण ठरत आहे. या धरणाची साठवण क्षमता भरपूर असून ती क्षमता टिकवून ठेवणे मोठे आव्हान आहे. पाणी वितरणाची जबाबदारी पाटबंधारे विभागाकडे असून येथे एक शाखा अभियंता, दोन दप्तर कारकून, चार मोजणीदार, आठ कालवा निरीक्षक, एक संदेशक, एक स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, तीन कालवा चौकीदार, एक कालवा टपाली आणि एक शिपाई अशी एकूण २२ पदे मंजूर आहेत; मात्र यांपैकी एकही पद भरले नसृून, आमगाव सिंचन उपविभागीय अधिकाऱ्यांकडे या धरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम शेतीला पुरेपूर पाण्याचा पुरवठा करणारे सिरपूर धरण फक्त शेतीसाठीच नव्हे तर पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांसाठी वरदान ठरते.

तीन वर्षांपूर्वी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी गोंदिया शहरावर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले तेव्हा सिरपूर धरणातून बाघनदीला पाणी सोडण्यात आले. ते पाणी पुजारीटोला धरणातून गोंदियाकडे जाणाऱ्या कालव्याद्वारे पाठविण्यात आले व शेवटी गोंदियाकरांची तहान भागविण्यात आली. या धरणाचे पाणी पुजारीटोलाच्या दोन मुख्य कालव्यांद्वारे वितरित केले जात असून, एक कालवा निम्म्या जिल्ह्याला पाणीपुरवठा करतो; तर दुसरा कालवा सालेकसा तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील लांजी आणि किरणापूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जीवनाचा आधार बनलेला आहे.

बॉक्स....

देखभालीसाठी शासनाची शून्य मदत

धरण आणि कालव्याच्या महत्त्वाच्या देखभालीसाठी शासनाकडून दरवर्षी काही निर्धारित निधीची तरतूद करणे आवश्यक असते. परंतु संबंधित विभागातील शासकीय अधिकारी निधी न देता पाणीपट्टीच्या वसुलीचा हिशेब विचारतात. शेतकऱ्यांबद्दल शासनाच्या धोरणामुळे कर्मचारी पाणीपट्टीची वसुली सक्तीने करू शकत नाहीत. परिणामी सध्या मनोहर सरोवर रामभरोसे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.