शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

निम्म्या जिल्ह्यासाठी तारणहार ठरणारा जलाशय उपेक्षित का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:23 IST

विजय मानकर : सालेकसा जिल्ह्यातील गोंदिया-आमगाव-सालेकसा देवरी तालुक्यांतील लोकांची तहान भागविणाऱ्यासह अन्नपाण्याची सोय करण्याच्या मुख्य स्रोत असलेला सिरपूर धरण ...

विजय मानकर : सालेकसा जिल्ह्यातील गोंदिया-आमगाव-सालेकसा देवरी तालुक्यांतील लोकांची तहान भागविणाऱ्यासह अन्नपाण्याची सोय करण्याच्या मुख्य स्रोत असलेला सिरपूर धरण (मनोहर सरोवर) सध्या शासनाकडून सपशेल उपेक्षित केला जात आहे. सिरपूर धरणाला संचालित करीत पाण्याच्या नियोजनाची व्यवस्था सांभाळणाऱ्या पाटबंधारे विभागात एकूण २२ पदांपैकी एकही पद भरलेले नसून, एक-दोन उधारीच्या कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे.

देवरी तालुक्यातील सिरपूर गावाजवळ वाघ नदीवर सिरपूृर धरण बांधलेला असून महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवर आहे. १९७० मध्ये मध्यप्रदेश शासनाच्या सहमतीने या धरणाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. धरणनिर्मितीसाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांचा सिंहाचा वाटा राहिला. त्यामुळे या धरणाला मनोहर सरोवर असे नाव देण्यात आले. परंतु एवढे मोठे असलेले धरण आज एवढे उपेक्षित आहे. २४.६९ मीटर उंच आणि २८४० मीटर लांब असलेले सिरपूर धरण भीषण पाणीटंचाईमध्ये तहान भागविणारे आणि दुष्काळावर मात करण्यास महत्त्वपूर्ण ठरत आहे. या धरणाची साठवण क्षमता भरपूर असून ती क्षमता टिकवून ठेवणे मोठे आव्हान आहे. पाणी वितरणाची जबाबदारी पाटबंधारे विभागाकडे असून येथे एक शाखा अभियंता, दोन दप्तर कारकून, चार मोजणीदार, आठ कालवा निरीक्षक, एक संदेशक, एक स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, तीन कालवा चौकीदार, एक कालवा टपाली आणि एक शिपाई अशी एकूण २२ पदे मंजूर आहेत; मात्र यांपैकी एकही पद भरले नसृून, आमगाव सिंचन उपविभागीय अधिकाऱ्यांकडे या धरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम शेतीला पुरेपूर पाण्याचा पुरवठा करणारे सिरपूर धरण फक्त शेतीसाठीच नव्हे तर पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांसाठी वरदान ठरते.

तीन वर्षांपूर्वी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी गोंदिया शहरावर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले तेव्हा सिरपूर धरणातून बाघनदीला पाणी सोडण्यात आले. ते पाणी पुजारीटोला धरणातून गोंदियाकडे जाणाऱ्या कालव्याद्वारे पाठविण्यात आले व शेवटी गोंदियाकरांची तहान भागविण्यात आली. या धरणाचे पाणी पुजारीटोलाच्या दोन मुख्य कालव्यांद्वारे वितरित केले जात असून, एक कालवा निम्म्या जिल्ह्याला पाणीपुरवठा करतो; तर दुसरा कालवा सालेकसा तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील लांजी आणि किरणापूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जीवनाचा आधार बनलेला आहे.

बॉक्स....

देखभालीसाठी शासनाची शून्य मदत

धरण आणि कालव्याच्या महत्त्वाच्या देखभालीसाठी शासनाकडून दरवर्षी काही निर्धारित निधीची तरतूद करणे आवश्यक असते. परंतु संबंधित विभागातील शासकीय अधिकारी निधी न देता पाणीपट्टीच्या वसुलीचा हिशेब विचारतात. शेतकऱ्यांबद्दल शासनाच्या धोरणामुळे कर्मचारी पाणीपट्टीची वसुली सक्तीने करू शकत नाहीत. परिणामी सध्या मनोहर सरोवर रामभरोसे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.