शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कायद्याची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:51 IST

आजच्या आधुनिक युगात शिक्षणाचे प्रमाण वाढले त्याचबरोबर ग्रामीण भागाचा विकास ही आवश्यक आहे. परंतु भांडण तंट्यांमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला बाधा निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देव्ही.ए. साठे : सौंदड येथे फिरते लोकअदालत

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : आजच्या आधुनिक युगात शिक्षणाचे प्रमाण वाढले त्याचबरोबर ग्रामीण भागाचा विकास ही आवश्यक आहे. परंतु भांडण तंट्यांमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला बाधा निर्माण झाली आहे. त्याकरिता कायद्याची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचावी याकरिता शासनाच्या माध्यमातून फिरते लोकअदालत ग्रामीण भागामध्ये पोहोचविण्यात आले आहे. असे प्रतिपादन फौजदारी व दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.ए. साठे यांनी केले.तालुक्यातील ग्राम सौंदड येथे घेण्यात आलेल्या फिरते लोक अदालतमध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. बन्सोड, प्रा.आर.के. भगत, अ‍ॅड.आर.के. लंजे, ठाणेदार किशोर पर्वते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गायत्री इरले, उपसरपंच सुनील राऊत, तंटामुक्त अध्यक्ष चरणदास शहारे उपस्थित होते.डव्वा येथील लोकअदालतच्या अध्यक्षस्थानी तिरोडा न्यायालयाचे न्यायाधीश वी.सी. बछले होते. मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. रहांगडाले, प्रा.आर.के. भगत, सरपंच पुष्पमाला बडोले, उपसरपंच चेतन वडगाये, रूपविलास कुरसुंगे, अनिल बिलीया, विलास चव्हाण, ग्रामविस्तार अधिकारी नागदेवे उपस्थित होते.चिखली येथे घेण्यात आलेल्या फिरत्या लोक अदालतच्या अध्यक्षस्थानी व्ही.ए.साठे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.आर.के. भगत, अ‍ॅड. बन्सोड, अ‍ॅड. गिºहेपुंजे, अ‍ॅड. रहांगडाले, पीएसआय चंदेल, सरपंच सुधाकर कुर्वे, खुशाल भेंडारकर, शालीकराम शहारे, पोलीस पाटील बडोले, सुभाष मेश्राम, भुवनलाल भोयर उपस्थित होते.फिरत्या लोक अदालतीमध्ये सौंदड येथील २, डव्वा येथील २ व चिखली येथील २ असे एकूण ६ प्रकरण तडजोडीत निकाली काढण्यात आले. तसेच गावकऱ्यांना महिलांविषयी कायदे, सायबर क्राईम, मनोरंजनाचे कायदे अशा विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.