शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

त्यांना घरकूलची गरज नसल्याचा अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:30 IST

सडक-अर्जुनी : कित्येकांच्या डोक्यावर छत नसून ते घरकुलाची आस लावून बसले आहेत. असे असतानाच कित्येकांना घरकूल मंजूर होऊनही ते ...

सडक-अर्जुनी : कित्येकांच्या डोक्यावर छत नसून ते घरकुलाची आस लावून बसले आहेत. असे असतानाच कित्येकांना घरकूल मंजूर होऊनही ते मागील ३ वर्षांपासून काम सुरू करीत नसल्याचे दिसत आहे. अशांना घरकुलाची गरज नसल्याचे गृहित धरून तसा अहवाल सादर करा, अशा सूचना आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

सभेत त्यांनी, रोहयो कामाशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेची प्रलंबित ९०० घरकूल, रमाई घरकूल योजनेची ७१ कामे व शबरी घरकूलची १८ कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना घरकूल अभियंत्यांना दिल्या. भटक्या व विमुक्त जातीसाठी नव्याने सुरू केलेल्या यशवंत घरकूल योजनेच्या कामांना त्वरित मंजुरी देऊन काम सुरू करणेबाबत सूचना केली. याशिवाय अनुसूचित जाती-नवबौद्ध घटकांसाठी बांधकाम, दुधाळ जनावर, शेळी गटांचा विविध घटकांना पुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, आरोग्य योजना, कोविड-१९ च्या उपाययोजना, स्वच्छ भारत मिशन कामांचाही आढावा घेतला. तालुक्यातील सर्व कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय उपलब्ध झाल्यामुळे तालुका उघड्यावर शौचास जाण्याच्या क्रुप्रथेपासून मुक्त झाला असल्याचे गटविकास अधिकारी खुणे यांनी सांगितले.

...........

३ ऑक्टोबरपूर्वी तयार करा गाव आराखडा

सर्व ग्रामपंचायतींनी सरासरी एक कोटी खर्चाचा गाव आराखडा तयार करण्याबाबत त्यांनी २१ मे रोजी पत्राव्दारे सर्व सरपंच व ग्रामसेवकांना सूचित केले होते. त्यानुसार रोहयो अंतर्गत अनुज्ञेय असलेली एकूण २६० कामे विचारात घेऊन अभिसरण करून ६०:४० या प्रमाणात कुशल व अकुशल कामे बसवून गाव विकास आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. मात्र त्यानुसार गाव आराखडा तयार करण्यात आला नाही. अशात विशेष मोहीम घेऊन ३ ऑक्टोबरपूर्वी गाव आराखडा तयार करून तहसीलदारांना सादर करण्याबाबत ग्रामसेवकांना त्यांनी सूचना दिल्या.

.........

रोहयो अंतर्गत सर्व प्रकारची २६० कामे अनुज्ञेय असून त्याद्वारे गावांचा विकास साधणे सहज शक्य आहे. त्यासाठी पंचायत समिती स्तरावरील सर्व विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका रोहयो समन्वय अधिकारी, व ग्रामसेवक यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याबाबत व यात कोणतीही अडचण येत असल्यास प्रत्यक्ष संपर्क साधण्याबाबत सूचना केल्या. गाव आराखडा तयार करताना योजनांच्या अभिसरणाच्या माध्यमातून गावातील सर्व प्रकारचे रस्ते, नाल्या, गोठे, तलावांचे खोलीकरण, शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन बांधकाम आदी सर्व मूलभूत सुविधा येत्या २ वर्षात रोहयोच्या माध्यमातून पूर्ण करता येतील, असा विश्वास आमदार चंद्रिकापुरे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.