शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

गोवारी समाजाला केंद्राच्या सूचित टाका

By admin | Updated: December 23, 2015 02:26 IST

विदर्भात १२ लाखाच्या जवळपास असणाऱ्या गोवारी समाजाची आजही उपेक्षा केली जात आहे.

५० वर्षांपासून उपेक्षा : स्वतंत्र महामंडळ स्थापन्याची बन्सोड यांची मागणीगोंदिया : विदर्भात १२ लाखाच्या जवळपास असणाऱ्या गोवारी समाजाची आजही उपेक्षा केली जात आहे. एक दशकापूर्वी नागपूर अधिवेशनात ११४ गोवारी समाजाचा बळी गेला असताना आजही शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्य व केंद्र या दोन्ही ठिकाणी भाजप सरकार असून यापूर्वी आपण सत्तेवर आल्यावर गोवारी समाजाला केंद्र व राज्याचे सुचीमध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते ते आता पूर्ण करायला पाहिजे आणि गोवारी समाजाकरिता विशेष महामंडळ स्थापित करून त्यांना योजनेचा लाभ द्यायला पाहिजे, असे मत तिरोडा क्षेत्राचे माजी आमदार दिलीप बंसोड यांनी व्यक्त केले. यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना बन्सोड म्हणाले, गोवारी समाजाची आज दयनिय अवस्था आहे. समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता ११४ समाजबांधवांचा बळी गेला. अशी दुर्दैवी घटना पूर्वी घडली नाही. आजचे सरकार विरोधी पक्षात असताना आपण सत्तेवर आल्यावर गोवारी समाजाला पूर्ण न्याय देवू, केंद्र शासनाच्या जातीच्या सूचित समाविष्ट करू, त्याकरिता स्वतंत्र गोवारी विकास महामंडळाची स्थापना करू असे आश्वासन देत होते. आजच्या घडीला केंद्र व राज्य दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता आहे. गोवारी समाजाला केंद्र शासनाच्या सूचित आणून गोवारी समाजाकरिता स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी. या माध्यमाने गोवारी समाजाच्या उत्थानाकरिता शिक्षणाच्या सुविधा व मदत, व्यवसायाकरिता आर्थिक सहाय्य आणि नोकरी सहीत अन्य रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात, अशी अपेक्षा माजी आ.बंसोड यांनी मत व्यक्त केली.१९५० पूर्वी गोवारी समाज आदिवासी प्रभागात होते. त्यावेळी गोंड-गोवारी ही संयुक्त जात दर्शविल्या जात होती. माजी आ.बाबुराव मडावी हे आदिवासी मंत्री असताना गोंडगोवारी ही जात अस्तित्वात नसल्याचे सांगून रद्द करण्यात आली. तेव्हापासून गोवारी समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. सतत लढा दिल्यानंतरही हा समाज उपेक्षित असल्याचे बंसोड म्हणाले. गोवारी समाजाला केंद्र शासनाच्या जातीत समाविष्ट करावे आणि या जातीकरिता अन्य मागास क्षेत्राच्या विकासाकरिता स्वतंत्र महामंडळे स्थापित केल्याशिवाय या समाजबांधवांचा विकास होणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)