शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

तीन काळे कृषी कायदे रद्द करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST

गोंदिया : केंद्र शासनाने पारीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी करीत जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने ...

गोंदिया : केंद्र शासनाने पारीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी करीत जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि.२६) एक दिवसीय उपोषण करण्यात आले. याअंतर्गत उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळया कृषी कायद्या विरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील १२० दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. मोदी सरकारने ११ वेळा चर्चेचा देखावा केला, परंतु हे कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य केली नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासूनच काँग्रेसचा पाठिंबा असून महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीनेही राज्यभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलेला आहे. तीन काळे कृषी कायदे व महागाईच्या मुद्यावर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी २६ मार्च रोजी भारत बंद पाळला आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान यांच्या नेतृत्वात येथील गांधी चौकातील महात्मा गांधीच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन बुधवारी (दि.२६) सकाळी ११ ते सांयकाळी ४ या वेळेत जिल्हा मुख्यालयी पक्ष कार्यालयाजवळ अमर वराडे, अशोक गुप्ता, सूर्यप्रकाश भगत, जहीर अहमद, जितेश राणे,अलोक मोहंती, डॉ. योगेन्द्र भगत, जितेन्द्र कटरे, नटवरलाल गांधी, शैलेश जायस्वाल, प्रशांत लिल्हारे, रजित गणविर, प्रशांत लिल्हारे, चैनलाल रणगिरे, अरुण गजभिये, गंगाराम बावनकर, ब्रिजलाल पटले, राम चिखलोंडे, आंनद लांजेवार, दिलीप गौतम, नरेश लिल्हारे, ममता झगडे, अनिता मुनेश्वर, विश्वेश्वर लिल्हारे, दलेश नागदेवे, मनिष चव्हाण, निलम हलमारे, रमेश लिल्हारे, लखन नाईक, कृष्णा विवट, नफीस सिध्दीकी, नाईक, विनोद बरोंडे, अहमद सय्यद, अभिषेक जैन, नियाज शेख, अफसर खान, बलजित बग्गा, अमर राहुल आदी उपोषणाला बसले होते.

...........

याकडे वेधले लक्ष

पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून केंद्र सरकार दिवसाढवळया लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर तर गॅस सिलिंडर ८८० रुपयांवर गेले आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे गोरगरीब जनता व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे.