शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

तीन काळे कृषी कायदे रद्द करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST

गोंदिया : केंद्र शासनाने पारीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी करीत जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने ...

गोंदिया : केंद्र शासनाने पारीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी करीत जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि.२६) एक दिवसीय उपोषण करण्यात आले. याअंतर्गत उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळया कृषी कायद्या विरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील १२० दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. मोदी सरकारने ११ वेळा चर्चेचा देखावा केला, परंतु हे कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य केली नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासूनच काँग्रेसचा पाठिंबा असून महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीनेही राज्यभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलेला आहे. तीन काळे कृषी कायदे व महागाईच्या मुद्यावर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी २६ मार्च रोजी भारत बंद पाळला आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान यांच्या नेतृत्वात येथील गांधी चौकातील महात्मा गांधीच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन बुधवारी (दि.२६) सकाळी ११ ते सांयकाळी ४ या वेळेत जिल्हा मुख्यालयी पक्ष कार्यालयाजवळ अमर वराडे, अशोक गुप्ता, सूर्यप्रकाश भगत, जहीर अहमद, जितेश राणे,अलोक मोहंती, डॉ. योगेन्द्र भगत, जितेन्द्र कटरे, नटवरलाल गांधी, शैलेश जायस्वाल, प्रशांत लिल्हारे, रजित गणविर, प्रशांत लिल्हारे, चैनलाल रणगिरे, अरुण गजभिये, गंगाराम बावनकर, ब्रिजलाल पटले, राम चिखलोंडे, आंनद लांजेवार, दिलीप गौतम, नरेश लिल्हारे, ममता झगडे, अनिता मुनेश्वर, विश्वेश्वर लिल्हारे, दलेश नागदेवे, मनिष चव्हाण, निलम हलमारे, रमेश लिल्हारे, लखन नाईक, कृष्णा विवट, नफीस सिध्दीकी, नाईक, विनोद बरोंडे, अहमद सय्यद, अभिषेक जैन, नियाज शेख, अफसर खान, बलजित बग्गा, अमर राहुल आदी उपोषणाला बसले होते.

...........

याकडे वेधले लक्ष

पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून केंद्र सरकार दिवसाढवळया लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर तर गॅस सिलिंडर ८८० रुपयांवर गेले आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे गोरगरीब जनता व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे.