शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

तीन काळे कृषी कायदे रद्द करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST

गोंदिया : केंद्र शासनाने पारीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी करीत जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने ...

गोंदिया : केंद्र शासनाने पारीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी करीत जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि.२६) एक दिवसीय उपोषण करण्यात आले. याअंतर्गत उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळया कृषी कायद्या विरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील १२० दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. मोदी सरकारने ११ वेळा चर्चेचा देखावा केला, परंतु हे कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य केली नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासूनच काँग्रेसचा पाठिंबा असून महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीनेही राज्यभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलेला आहे. तीन काळे कृषी कायदे व महागाईच्या मुद्यावर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी २६ मार्च रोजी भारत बंद पाळला आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान यांच्या नेतृत्वात येथील गांधी चौकातील महात्मा गांधीच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन बुधवारी (दि.२६) सकाळी ११ ते सांयकाळी ४ या वेळेत जिल्हा मुख्यालयी पक्ष कार्यालयाजवळ अमर वराडे, अशोक गुप्ता, सूर्यप्रकाश भगत, जहीर अहमद, जितेश राणे,अलोक मोहंती, डॉ. योगेन्द्र भगत, जितेन्द्र कटरे, नटवरलाल गांधी, शैलेश जायस्वाल, प्रशांत लिल्हारे, रजित गणविर, प्रशांत लिल्हारे, चैनलाल रणगिरे, अरुण गजभिये, गंगाराम बावनकर, ब्रिजलाल पटले, राम चिखलोंडे, आंनद लांजेवार, दिलीप गौतम, नरेश लिल्हारे, ममता झगडे, अनिता मुनेश्वर, विश्वेश्वर लिल्हारे, दलेश नागदेवे, मनिष चव्हाण, निलम हलमारे, रमेश लिल्हारे, लखन नाईक, कृष्णा विवट, नफीस सिध्दीकी, नाईक, विनोद बरोंडे, अहमद सय्यद, अभिषेक जैन, नियाज शेख, अफसर खान, बलजित बग्गा, अमर राहुल आदी उपोषणाला बसले होते.

...........

याकडे वेधले लक्ष

पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून केंद्र सरकार दिवसाढवळया लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर तर गॅस सिलिंडर ८८० रुपयांवर गेले आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे गोरगरीब जनता व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे.