शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन तंटामुक्त गाव समितीचे पुनर्गठण करा

By admin | Updated: August 1, 2016 00:08 IST

सन २०१६-१७ या वर्षासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम १५ आॅगस्ट २०१६ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे

विनिता साहू यांची माहिती : गावात शांतता नांदवा भंडारा : सन २०१६-१७ या वर्षासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम १५ आॅगस्ट २०१६ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. १५ आॅगस्ट ते ३० आॅगस्ट या कालावधीत ग्रामपंचायतीनी ग्रामसभा घेवून गाव समित्या पुर्नगठीत कराव्यात, अशा सूचना जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी दिल्या आहेत. गावपातळीवर छोट्याछोट्या कारणावरुन निर्माण होणाऱ्या तंट्यांचे पर्यावसन मोठ्या तंट्यात होवू नये, वादामध्ये मालमत्ता अडकून पडून त्यातून आर्थिक नुकसान होवू नये, कुटुंबाची समाजाची व गावाची शांतता धोक्यात येवू नये, या दृष्टीने गावात तंटे निर्माण होणार नाहीत व अस्तित्वात असलेले तंटे लोकसहभागातून सामोपचाराने आणि आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेवून सोडविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी या करीता महाराष्ट्र शासनाने १५ आॅगस्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहिम सुरु केली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, दाखल झालेले तंटे मिटविणे व नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे अशा तीन भागाचा मोहिमेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या तीनही भागातील कार्यवाही व तंटे मिटविण्याची मोहिम ही लोकचळवळ महणून राबविली जावी मोहिमेमध्ये दिवाणी, महसूली, फौजदारी व इतर तंटयांचा समावेश करण्यात आला आहे. गावे तंटामुक्त झाली म्हणून मोहिम संपली असे नाही यापुढेही मोहिम राबविण्याचे काम सातत्याने सुरुच राहणार आहे. तंटामुक्त गाव समिती कायमस्वरुपी कार्यरत राहील. तथापि जे सदस्य समितीच्या बैठकांना उपस्थित राहत नसतील, समितीच्या कामकाजात अडथडा निर्माण करीत असतील अशा सदस्यांना बदलून नविन सदस्य घेण्याबाबत प्रत्येक वर्षाच्या १५ आॅगस्ट नंतरच्या पहिल्या ग्राम सभेमध्ये ग्रामसभेच्या मान्यतेने निर्णय घेता येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत तंटामुक्त गाव समितीचे १/३ पेक्षा अधिक सदस्य एकाच वेळी बदलता येणार नाहीत. तसेच समितीच्या अध्यक्ष बदलण्याची ग्राम सभेला आवश्यकता वाटत असेल तर अध्यक्ष बदलून नविन अध्यक्षाची निवड त्याच ग्रामसभेमध्ये करण्यात यावी. गाव समितीमध्ये महिलांना ३० टक्के प्राधान्य द्यावे. प्रत्येक गावातील अध्यक्ष व सदस्य यांनी निवड करतांना शासन निर्णयाला अधिन राहून तंटामुक्त गाव समिती अध्यक्षांची निवड पोलीस विभागाकडून वर्तणूकीचा दाखला घेवूनच करण्यात यावी. तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड ग्रामसभेच्या मान्यतेने करण्यात यावी. तंटामुक्त गाव समित्यांनी गावातले तंटे गावातच मिटवित रहावे. महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी गावभेटी व दौऱ्याचे वेळी तंटामुक्त तंटामुक्त गाव समित्यांना मार्गदर्शन करुन तंटे मिटविण्यास सहकार्य करावे. ग्राम सुरक्षा दलातील सदस्यानी चोखपणे कार्य करीत रहावे, गाव पातळीवरील समितीमध्ये सर्व प्रकारचे सदस्यांचा समावेश असल्याने सर्वांनी कर्तव्य निट बजावल्यास मोहिमेस निश्चित गती येवू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली. (नगर प्रतिनिधी)