शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

काढला ३.९ लाख घनमीटर गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 21:49 IST

सिंचनाअभावी शेतकऱ्यांचे पीक अडचणीत येऊ नये यासाठी शासनाने माजी मालगुजारी तलावांचा पुनरुज्जीवन कार्यक्रम आखला. सन १७-१८ या वर्षात ३७९ तलावांमधून गाळ काढायचा होता. यातील ९४ तलावांतील संपूर्ण गाळ काढण्यात आला असून १२० तलावांमधील तलावात गाळ काढण्याचे काम अजून सुरु आहे.

ठळक मुद्देमालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन : ९४ मामा तलावांची कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सिंचनाअभावी शेतकऱ्यांचे पीक अडचणीत येऊ नये यासाठी शासनाने माजी मालगुजारी तलावांचा पुनरुज्जीवन कार्यक्रम आखला. सन १७-१८ या वर्षात ३७९ तलावांमधून गाळ काढायचा होता. यातील ९४ तलावांतील संपूर्ण गाळ काढण्यात आला असून १२० तलावांमधील तलावात गाळ काढण्याचे काम अजून सुरु आहे. ३१ जानेवारीपर्यंत ३ लाख ९ हजार ७०६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.गोंदिया तालुक्यातील १८ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून २१ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात ६८ हजार ५४७ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. गोरेगाव तालुक्यातील १८ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आले असून १८ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात ७६ हजार ५१० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तिरोडा तालुक्यातील १७ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १८ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात २८ हजार ४६४ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. आमगाव तालुक्यातील १० तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून ११ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात १९ हजार ५५७ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.देवरी तालुक्यातील १५ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १५ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात १९ हजार ११ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील १२ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १३ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात ५८ हजार १४९ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. सालेकसा तालुक्यातील ४ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १० तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात ११ हजार ९१९ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एकही तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला नाही. १४ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात २७ हजार ५४९ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. अशाप्रकारे, जिल्ह्यातील ९४ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १२० तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ७०६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.३८७ तलाव करतात शेतकऱ्यांना समृद्धशासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून माजी मालगुजारी तलावांचा पुनरज्जीवन कार्यक्रम सुरु केला. त्यात सन २०१६-१७ या वर्षात ३८७ तलावामधील ८ लाख ११ हजार ३० घनमीटर गाळ काढून शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देण्यासाठी हे तलाव सज्ज झाले आहेत.