शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

काढला ३.९ लाख घनमीटर गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 21:49 IST

सिंचनाअभावी शेतकऱ्यांचे पीक अडचणीत येऊ नये यासाठी शासनाने माजी मालगुजारी तलावांचा पुनरुज्जीवन कार्यक्रम आखला. सन १७-१८ या वर्षात ३७९ तलावांमधून गाळ काढायचा होता. यातील ९४ तलावांतील संपूर्ण गाळ काढण्यात आला असून १२० तलावांमधील तलावात गाळ काढण्याचे काम अजून सुरु आहे.

ठळक मुद्देमालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन : ९४ मामा तलावांची कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सिंचनाअभावी शेतकऱ्यांचे पीक अडचणीत येऊ नये यासाठी शासनाने माजी मालगुजारी तलावांचा पुनरुज्जीवन कार्यक्रम आखला. सन १७-१८ या वर्षात ३७९ तलावांमधून गाळ काढायचा होता. यातील ९४ तलावांतील संपूर्ण गाळ काढण्यात आला असून १२० तलावांमधील तलावात गाळ काढण्याचे काम अजून सुरु आहे. ३१ जानेवारीपर्यंत ३ लाख ९ हजार ७०६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.गोंदिया तालुक्यातील १८ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून २१ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात ६८ हजार ५४७ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. गोरेगाव तालुक्यातील १८ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आले असून १८ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात ७६ हजार ५१० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तिरोडा तालुक्यातील १७ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १८ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात २८ हजार ४६४ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. आमगाव तालुक्यातील १० तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून ११ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात १९ हजार ५५७ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.देवरी तालुक्यातील १५ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १५ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात १९ हजार ११ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील १२ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १३ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात ५८ हजार १४९ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. सालेकसा तालुक्यातील ४ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १० तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात ११ हजार ९१९ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एकही तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला नाही. १४ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात २७ हजार ५४९ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. अशाप्रकारे, जिल्ह्यातील ९४ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १२० तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ७०६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.३८७ तलाव करतात शेतकऱ्यांना समृद्धशासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून माजी मालगुजारी तलावांचा पुनरज्जीवन कार्यक्रम सुरु केला. त्यात सन २०१६-१७ या वर्षात ३८७ तलावामधील ८ लाख ११ हजार ३० घनमीटर गाळ काढून शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देण्यासाठी हे तलाव सज्ज झाले आहेत.