शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

अग्रीम वाटपाचे निकष शिथिल करा

By admin | Updated: June 24, 2017 01:48 IST

दरवर्षीच्या दुष्काळामुळे व रोगांच्या प्रादुर्भावामुळे हमीभावाप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला भाव मिळत नाही.

सुरेश हर्षे : अटींमुळे शेतकऱ्यांना १० हजारांचे कर्ज मिळणे कठीण लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दरवर्षीच्या दुष्काळामुळे व रोगांच्या प्रादुर्भावामुळे हमीभावाप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला भाव मिळत नाही. शेतकरी व राजकीय पुढाऱ्यांच्या दबावतंत्रामुळे राज्य शासनाने कर्जमाफी केली. मात्र घातलेल्या अटींमुळे गोंदिया जिल्ह्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना अग्रीम १० हजार रूपयांचे कर्ज मिळूच शकत नाही, असे जि.प. सदस्य सुरेश हर्षे यांनी सांगितले आहे. १४ जून २०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदीच्या नावाखाली १० हजार रूपये अग्रीम देण्यासाठी १ ते ६ मुद्यांमध्ये अटी घालण्यात आल्या. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील ८० टक्के शेतकरी १० हजार अग्रीम रकमेपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. यात अग्रीम रक्कम घेण्यासाठी स्वयंघोषित १ ते ६ मुद्यांचे हमीपत्र द्यायचे आहे. ज्यात पती, पत्नी, विवाहित, अविवाहित, मुलगा, मुलगी, सून यांच्या नावे चारचाकी वाहन किंवा ट्रॅक्टर नसावे; आयकर विभागाचे रिटर्न भरणारा किंवा कुटुंबातील उमेदवाराचे पॅनकार्ड असणारा यात मोडत नाही. परंतु आयडी प्रुफ किंवा छोट्या-मोठ्या कामाकरिता पॅनकार्ड आवश्यक असते व शिक्षित मुलांचे पॅनकार्ड असतेच. तसेच ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांनाच १० हजार रूपये अग्रीम देण्याची अट आहे. परंतु १ जुलै २०१६ नंतर अर्थात मागील खरीप हंगामासाठी पावसाळ्यात उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना १० हजार अग्रीम मिळणार नाही. हे सर्व मुद्दे गृहीत धरले तर ८० टक्के शेतकरी या अग्रीम रकमेपासून वंचितच राहतील. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून डिजिटल साधणांनी कर्जमुक्ती होणार असे वाटते. मात्र ज्याप्रकारे शेतकऱ्यांना कृषी विकास बँकांचे प्रमाणपत्र मागणे सुरू आहे, त्यात आधारकार्ड, पॅनकार्ड, चारचकी वाहन, रिटर्न भरणे, निवृत्तीवेतन, शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकूण व्यक्ती, अशी माहिती संगणकीकृत होईल. तसेच शेतकऱ्यांना १४ जून २०१७ च्या शासन निर्णयातील अट १ ते ६ मध्ये बसेल तरच १० हजार रूपये अग्रीम रक्कम दिली जाईल. डिजिटल यंत्रामुळे शेतकऱ्यांनी खासगी फायनान्स करून घेतलेले चारचाकी वाहन, ट्रॅक्टर, ओळखपत्रासाठी किंवा बँक खाते उघडण्यासाठी तयार केलेले पॅनकार्ड तसेच शिक्षित मुलांच्या पॅनकार्ड वापरामुळे ते १० हजार रूपये अग्रीम घेण्यास अपात्र ठरतील. तर १ जुलै २०१६ नंतर कर्ज घेणारे शेतकरीसुद्धा कर्जमाफीपासून वंचित राहतील. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार आहे. लोकप्रतिनिधींनी राज्यशासनामार्फत स्थापन होणाऱ्या संयुक्त समितीला शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन खासगी फायनान्स करून घेतलेले चारचाकी वाहन, ट्रॅक्टर, पॅनकार्ड बाळगणारे शेतकरी कुटुंबातील सदस्य यांना १० हजार अग्रीम व कर्जमाफी तसेच ३१ जुलै २०१६ नंतरच्या कर्जमाफीसाठी प्रेरित करावे, अशी मागणी जि.प. स्थायी समितीचे सदस्य सुरेश हर्षे यांनी केली आहे.