शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अग्रीम वाटपाचे निकष शिथिल करा

By admin | Updated: June 24, 2017 01:48 IST

दरवर्षीच्या दुष्काळामुळे व रोगांच्या प्रादुर्भावामुळे हमीभावाप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला भाव मिळत नाही.

सुरेश हर्षे : अटींमुळे शेतकऱ्यांना १० हजारांचे कर्ज मिळणे कठीण लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दरवर्षीच्या दुष्काळामुळे व रोगांच्या प्रादुर्भावामुळे हमीभावाप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला भाव मिळत नाही. शेतकरी व राजकीय पुढाऱ्यांच्या दबावतंत्रामुळे राज्य शासनाने कर्जमाफी केली. मात्र घातलेल्या अटींमुळे गोंदिया जिल्ह्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना अग्रीम १० हजार रूपयांचे कर्ज मिळूच शकत नाही, असे जि.प. सदस्य सुरेश हर्षे यांनी सांगितले आहे. १४ जून २०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदीच्या नावाखाली १० हजार रूपये अग्रीम देण्यासाठी १ ते ६ मुद्यांमध्ये अटी घालण्यात आल्या. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील ८० टक्के शेतकरी १० हजार अग्रीम रकमेपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. यात अग्रीम रक्कम घेण्यासाठी स्वयंघोषित १ ते ६ मुद्यांचे हमीपत्र द्यायचे आहे. ज्यात पती, पत्नी, विवाहित, अविवाहित, मुलगा, मुलगी, सून यांच्या नावे चारचाकी वाहन किंवा ट्रॅक्टर नसावे; आयकर विभागाचे रिटर्न भरणारा किंवा कुटुंबातील उमेदवाराचे पॅनकार्ड असणारा यात मोडत नाही. परंतु आयडी प्रुफ किंवा छोट्या-मोठ्या कामाकरिता पॅनकार्ड आवश्यक असते व शिक्षित मुलांचे पॅनकार्ड असतेच. तसेच ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांनाच १० हजार रूपये अग्रीम देण्याची अट आहे. परंतु १ जुलै २०१६ नंतर अर्थात मागील खरीप हंगामासाठी पावसाळ्यात उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना १० हजार अग्रीम मिळणार नाही. हे सर्व मुद्दे गृहीत धरले तर ८० टक्के शेतकरी या अग्रीम रकमेपासून वंचितच राहतील. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून डिजिटल साधणांनी कर्जमुक्ती होणार असे वाटते. मात्र ज्याप्रकारे शेतकऱ्यांना कृषी विकास बँकांचे प्रमाणपत्र मागणे सुरू आहे, त्यात आधारकार्ड, पॅनकार्ड, चारचकी वाहन, रिटर्न भरणे, निवृत्तीवेतन, शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकूण व्यक्ती, अशी माहिती संगणकीकृत होईल. तसेच शेतकऱ्यांना १४ जून २०१७ च्या शासन निर्णयातील अट १ ते ६ मध्ये बसेल तरच १० हजार रूपये अग्रीम रक्कम दिली जाईल. डिजिटल यंत्रामुळे शेतकऱ्यांनी खासगी फायनान्स करून घेतलेले चारचाकी वाहन, ट्रॅक्टर, ओळखपत्रासाठी किंवा बँक खाते उघडण्यासाठी तयार केलेले पॅनकार्ड तसेच शिक्षित मुलांच्या पॅनकार्ड वापरामुळे ते १० हजार रूपये अग्रीम घेण्यास अपात्र ठरतील. तर १ जुलै २०१६ नंतर कर्ज घेणारे शेतकरीसुद्धा कर्जमाफीपासून वंचित राहतील. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार आहे. लोकप्रतिनिधींनी राज्यशासनामार्फत स्थापन होणाऱ्या संयुक्त समितीला शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन खासगी फायनान्स करून घेतलेले चारचाकी वाहन, ट्रॅक्टर, पॅनकार्ड बाळगणारे शेतकरी कुटुंबातील सदस्य यांना १० हजार अग्रीम व कर्जमाफी तसेच ३१ जुलै २०१६ नंतरच्या कर्जमाफीसाठी प्रेरित करावे, अशी मागणी जि.प. स्थायी समितीचे सदस्य सुरेश हर्षे यांनी केली आहे.