शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
4
राहुल गांधींना वाचन करण्याचा आदेश कसा द्यायचा? सावरकरांवरील याचिका हायकोर्टाने फेटाळली
5
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
6
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
7
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
8
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
9
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
10
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
11
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
12
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
13
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
14
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
15
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
16
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
17
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
18
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
Manglagauri 2025 Date: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..

खंडित बिलाची तक्रार खारिज

By admin | Updated: June 10, 2015 00:48 IST

विद्युत कंपनीने वीज पुरवठा खंडित करून त्या कालावधीचे बेकायदेशीर बिल शेतकऱ्याला पाठविले.

न्यायमंच : सुधारित बिल भरल्याने वीज पुरवठा सुरूगोंदिया : विद्युत कंपनीने वीज पुरवठा खंडित करून त्या कालावधीचे बेकायदेशीर बिल शेतकऱ्याला पाठविले. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई एक लाख रूपये मिळावी म्हणून त्याने न्यायमंचात तक्रार दाखल केली. परंतु वीज कंपनीचे सुधारित बिल दोन हजार ४०० रूपये सदर शेतकऱ्याने भरले व कंपनीने वीज पुरवठा पुर्ववत सुरू केला. त्यामुळे शेतकऱ्याची सदर तक्रार न्यायमंचाने खारित केली. केशवराव दाजीबा पाथोडे रा. दत्तोरा (ता.जि. गोंदिया) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या पाच एकर शेतील पाईपलाईनद्वारे पाणी पुरविण्यासाठी सन २००५ मध्ये विद्युत पुरवठा घेतला होता. सदर विद्युत पंप वाघ इटियाडोह डाव्या कालव्यावर बसविला होता. नियमित वीज बिल भरणे सुरू असतानाच अचानक डिसेंबर २०१० मध्ये वीज मीटर जळाले. त्यांनी वारंवार मीटर बदलविण्याचा अर्ज केला. मात्र त्यांना डिसेंबर २०१० चा एक हजार ८० रूपये व जून २०११ मध्ये दोन हजार २० रूपये असा एकूण तीन हजार १०० रूपये बिल आला. तसेच कुठलीही सूचना न देता जानेवारी २०१२ मध्ये कंपनीने पुरवठा बंद केल्याने त्यांचे रबी पिकाचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले. शिवाय मार्च २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीचे बेकायदेशीर बिल रद्द करावे. पुरवठा खंडित झाल्यामुळे मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसान भरपाई एक लाख १५ हजार रूपये मिळावी म्हणून त्यांनी न्यायमंचात तक्रार दाखल केली. विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबात, मीटर हे बॅकींश स्थितीमध्ये असल्याने रिडिंग घेणे शक्य नव्हते. शिवाय पुरवठा सुरू असल्याने सरासरी बिल देण्यात आले. परंतु ग्राहकाने थकीत बिलाचा भरणा न केल्याने आॅक्टोबर २०१२ मध्ये तात्पुरता पुरवठा खंडित करण्यात आला. तसेच लोकशाही दिनी केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारकर्ता व सहायक अभियंता यांच्यात आपसी समझोता झाला. त्यात तक्रारकर्त्याने सुधारित बिल दोन हजार ४०० रूपये व पुनर्जोडणीचे १०० रूपये भरावे असे ठरले. शेतकऱ्याने सदर रक्कम भरल्यावर वीज पुरवठा २७ जानेवारी २०१४ रोजी पूर्ववत सुरू करण्यात आल्याचे नमूद केले.यावर न्यायमंचाने कारणमिमांसा केली. यात वीज कंपनीने पाथोडे यांना बिल दुरूस्त करून सुधारित बिल दिले. त्याचा भरणा करण्यात आला. त्यामुळे वीज कंपनीच्या सेवेतील त्रुटी सिद्ध होत नाही. शिवाय शेतीला झालेल्या नुकसानीचा कुठलाही पुरावा पाथोडे यांनी प्रकरणात सादर केला नाही. त्यामुळे शेतकरी पाथोडे यांची तक्रार न्यायमंचाने खारिज केली. (प्रतिनिधी)