शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अन्नधान्याचा पुरवठा नियमित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:45 IST

शासनाच्या नियमानुसार अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बीपीएलच्या दराने अन्न- धान्य पुरविण्यात येते. मात्र मागील एक वर्षापासून पुरवठाच बंद करण्यात आला आहे. संबंधीत अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बाहेरुन अन्न-धान्य खरेदी करावे लागत आहे. अशात पुरवठा पूर्ववत देण्यात यावा, अशी मागणी आदिवासी आश्रमशाळा संचालक वेलफेअर असोसिएशननेतर्फे करण्यात आली.सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना यासंदर्भात सोमवारी निवेदन देण्यात आले आहे.

ठळक मुद्देवर्षभरापासून पुरवठा बंद : परिणय फुके यांना असोसिएशनचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाच्या नियमानुसार अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बीपीएलच्या दराने अन्न- धान्य पुरविण्यात येते. मात्र मागील एक वर्षापासून पुरवठाच बंद करण्यात आला आहे. संबंधीत अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बाहेरुन अन्न-धान्य खरेदी करावे लागत आहे. अशात पुरवठा पूर्ववत देण्यात यावा, अशी मागणी आदिवासी आश्रमशाळा संचालक वेलफेअर असोसिएशननेतर्फे करण्यात आली.सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना यासंदर्भात सोमवारी निवेदन देण्यात आले आहे.राज्यात शासनाच्या विविध विभागांतर्गत कल्याणकारी संस्थामार्फत अनेक अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृह असून या शाळा वसतिगृहांना शासनाच्या २००२ च्या शासन निर्णयानुसार बीपीएलच्या दराने अन्न-धान्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र मागील एक वर्षापूर्वी हा पुरवठा बंद करण्यात आला. तर मे २०१९ च्या शासनाच्या नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पत्रानुसार जिल्ह्यातील कल्याणकारी संस्थांमार्फत सुरु असलेल्या अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना २०१७-१८ या सत्रातील देण्यात न आलेले धान्य पुरवठा करण्याचे निर्देश संबंधीत विभागाला देण्यात आले. मात्र, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करुन कुठलीच कार्यवाही न करता अन्न व धान्यांचा पुरवठा केला नाही. तर ३ मे २०१९ च्या परिपत्रावर कुठलेही स्थगिती आदेश नसताना २९ मार्च २०१९ च्या पत्राचा दाखला देत सदर पुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेऊन याविषयी त्यांना माहिती दिली. यावर त्यांनी अशी कुठलीच बंदी नसल्याचे पदाधिकाºयांना सांगितले. मात्र आता संबंधीत संस्था चालकांवर बाहेरुन अन्न-धान्य घेण्याची वेळ आली असून जे परवडण्यासारखे नाही. मात्र शाळा व वसतिगृह सुरु ठेवता यावे यासाठी हा भार त्यांना सोसावा लागत आहे.तेव्हा शासनस्तरावर याची दखल घेत अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बीपीएलच्या दरात देण्यात येणाºया अन्न- धान्याचा पुरवठा पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी आदिवासी आश्रमशाळा संचालक वेलफेअर असोसिएशनच्यावतीने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.आदिवासी आश्रमशाळा संचालक वेलफेअर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने असोसिएशनचे अध्यक्ष चामेश्वर गहाणे यांच्या नेतृत्वात सोमवार येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री फुके यांची भेट घेऊन निवेदन दिले.या वेळी फुके यांनी असोसिएशनच्या समस्या ऐकूण घेत त्यावर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.शिष्टमंडळात झामसिंग येरणे, केवळराम पुस्तोड, अ‍ॅड.टी.बी.कटरे, यु.टी.बिसेन, सुखदेव दहिवले, राजेंद्र बडोले, लक्ष्मण चंद्रीकापुरे, कोरे, डॉ. फुंडे यांच्या अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.आॅडिटमध्ये द्यावा लागतो बीपीएलचा हिशेबसंचालकांना आपली आश्रमशाळा व वसतिगृह टिकवून ठेवता यावे यासाठी धडपड करावी लागत असून मागील वर्षभरापासून शासनाकडून बीपीएलच्या दराने देण्यात येणारा अन्न -धान्य बंद पुरवठा असल्याने संस्थाचालकांना बाहेर व्यापाºयांकडून खरेदी करावे लागत आहे. मात्र,संस्थेचे आॅडीट करत असताना त्यांना बीपीएलचेच दर दाखवावे लागत असल्याने बाहेरुन घेतलेले अन्न -धान्य देखील आॅडीटमध्ये ग्राह्य धरले जात नाही. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना उपाशीही ठेवता येत नाही. त्यामुळे संस्था चालकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.उपयोगीता प्रमाणपत्र सादरच नाहीकल्याणकारी संस्थांच्या शाळा व वसतिगृहांना बीपीएलच्या दरात अन्न-धान्य, देण्यात यावे यासाठी राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केंद्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे उपयोगीता प्रमाणपत्र सादर करण्यात येते. त्यानुसार सदर अन्न व धान्य पुरविण्यात येते. मात्र मागील पाच वर्षापूर्वीपासून यात घोळ आहे.आठ दिवसांत तोडगा काढणारअसोसिएशनच्यावतीने राज्यमंत्री डॉ. फुके यांना निवेदन देण्यात आले असता त्यांनी या प्रकरणी संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेऊन आठ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन असोसिएशनच्या पदाधिकाºयांना दिले.