शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

सातबारावर महिलांच्या नावाची नोंदणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:36 IST

शेतीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटूंबातील महिला काबाडकष्ट करतात. शेतीत राबताना अपघात होवून एखाद्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात वारसांना कोणताही लाभ मिळत नाही.

ठळक मुद्देचिरेखनीत संवाद पर्व :तहसीलदार संजय रामटेके यांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : शेतीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटूंबातील महिला काबाडकष्ट करतात. शेतीत राबताना अपघात होवून एखाद्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात वारसांना कोणताही लाभ मिळत नाही. शेतीची सहमालक व विविध योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने शेतकºयांनो आपल्या कुटूंबातील मुलीचे, सुनेचे आणि पत्नीचे नाव सातबाºयावर नोंदवा, असे आवाहन तिरोड्याचे तहसीलदार संजय रामटेके यांनी केले आहे.तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथे सार्वजनिक गणेश मंडळ चिरेखनी समाज ग्रामसंस्था व कल्याण ग्रामसंस्था, जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित संवाद पर्व कार्यक्रमात ते बोलत होते. गटविकास अधिकारी इनामदार, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, सरपंच जगन्नाथ पारधी, उपसरपंच सोनू पारधी, विस्तार अधिकारी उके, बन्सोड, कृषीमित्र नंदराम पारधी, पाणलोट समतिीचे सचिव लेखराम राणे, माविमच्या तालुका कार्यक्रम समन्वयक शिल्पा येडे, ग्रामसेवक तिडके उपस्थित होते. एक गाव एक गणपती ही संकल्पना चिरेखनी या गावात प्रत्यक्ष साकारली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक कार्यक्र म आयोजित करण्यात येतात.संवाद पर्व हा कार्यक्रम शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केला जात आहे. शेतकºयांनी आता सेंद्रीय शेती करून पिकांचे उत्पादन घ्यावे, सेंद्रीय शेत मालाला चांगला भाव मिळतो, सेंद्रीय शेतीमुळे विषमुक्त अन्न उपलब्ध होण्यास मदत होते. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, श्रावणबाळ या विविध योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गावातील प्रत्येक कुटूंबातील महिला ही बचतगटात सदस्य आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी पैशाच्या बचतीला सुरुवात तर केली आहेच यापुढेही जावून त्या उद्योग व्यवसायाची कास धरीत असल्याचे सोसे यांनी सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने संवाद पर्वाच्या आयोजनातून ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे होणार असल्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी ग्रामसंस्थेच्या अध्यक्ष चंद्रकला बिसेन, उपाध्यक्ष रेघन पारधी, सचिव चंद्रकला कुर्वे, सहसचिव जीवनकला पारधी, कोषाध्यक्ष कल्पना रिनाईत, कल्याण ग्रामसंस्थेच्या अध्यक्ष पोर्णिमा शहारे, उपाध्यक्ष स्वानंदा कोटांगले, सचिव निला पारधी, सहसचिव अलका कुर्वे, कोषाध्यक्ष मुनेश्वरी भगत, जोती पटले, वैशाली पारधी, प्रणिता राणे, गीता मडावी यांनी सहकार्य केले.तर शासकीय योजनांचा लाभ नाहीस्वच्छ भारत मिशन कार्यक्र माची अंमलबजावणी तालुक्यात करण्यात यावी. गावातील कोणतेही कुटूंब उघड्यावर शौचास जाणार नाही याची दक्षता घ्यावी. जे उघड्यावर शौचास जातील त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे इनामदार यांनी सांगितले.