शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

उपाहारगृहांमध्ये दूषित पाणी अन्न प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: November 8, 2014 22:41 IST

गोदिया शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील ठिकठिकाणच्या हॉटेलांमध्ये ग्राहकांना देण्यासाठी शुद्ध पाणीच नसते. किंबहुना बरेचदा ग्राहकांनी पाणी विकत घेऊन प्यावे यासाठी म्हणून मुद्दाम पाण्याच्या

गोंदिया : गोदिया शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील ठिकठिकाणच्या हॉटेलांमध्ये ग्राहकांना देण्यासाठी शुद्ध पाणीच नसते. किंबहुना बरेचदा ग्राहकांनी पाणी विकत घेऊन प्यावे यासाठी म्हणून मुद्दाम पाण्याच्या शुद्धतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही पहायला मिळत आहे. मात्र हा प्रकार नियमबाह्य असताना अन्न व औषध प्रशासन विभाग त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास तयार नसल्याचे दिसून येते.जुन्या गोल टाक्यांमध्ये, रांजणात पाणी साठवले जाते. यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे आरोग्याला धोका असतो. शहरात हॉटेलांमध्ये अशा प्रकारे अशुद्ध पाणी वापरले जाते. गोंदिया शहरातील तसेच आसपासच्या परिसरातील हॉटेल व्यावसायिक तसेच टपरी चालविणारे सर्रासपणे अशुद्ध पाण्याचा वापर करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. गोंदिया शहरातील रेल्वे स्थानकाच्या परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले असतानाही येथील पाण्याचा हातगाडी व्यवसायिक उपयोग करतात. हेच पाणी हॉटेल व्यावसायिकही वापरतात. शहरात एखाद्या ठिकाणी पाण्याची बोंब असेल त्यावेळी याच विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. हॉटेलमधील चवीचे खाद्य पदार्थ, चहा आदी बनविण्याकरिता याच पिण्यास अयोग्य असलेल्या पाण्याचा वापर केला जातो. शिवाय नागरिकांना हेच पाणी पिण्यास दिल्या जाते. अनेकदा या पाण्यात जंतू, चामडोक आढळून येतात. या हॉटेलांमध्ये बनणारे पदार्थ हे चरमरीत आणि तेलकट असतात. त्यामुळे ते खाल्ल्यावर प्रत्येकालाच भरपूर पाणी प्यावे लागते. तसेच प्रत्येकाचीच असे पदार्थ खाल्ल्यावर पाणी विकत घेऊन खाण्याची ऐपत नसते. त्यामुळे अशा नागरिकांचे आरोग्य जास्त धोक्यात येते. (प्रतिनिधी)