शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

उच्च माध्यमिक शाळा नॉन प्लॅनमध्ये परावर्तित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST

केशोरी : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने गोंदिया जिल्ह्यातील सहा माध्यमिक शाळा आणि तीन उच्च माध्यमिक आदिवासी क्षेत्रातील शाळा आदिवासी ...

केशोरी : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने गोंदिया जिल्ह्यातील सहा माध्यमिक शाळा आणि तीन उच्च माध्यमिक आदिवासी क्षेत्रातील शाळा आदिवासी उपयोजना प्लॅनमध्ये समाविष्ट करून या शाळांत कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते आदिवासी विभागाच्या आदिवासी घटक योजनेतून अदा केले जातात. टीएसपी योजनेतील शाळांमधील कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित मिळत नसल्यामुळे आदिवासी उपयोजना प्लॅनमधील शाळा नाॅन प्लॅनमध्ये परावर्तित करून कार्यरत शिक्षक, व्याख्याता, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते नियमित देण्याची मागणी शिक्षक भारती संघटना अर्जुनी मोरगाव यांनी केली आहे.

शिक्षण विभागाने आदिवासी क्षेत्रातील शाळांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सहा माध्यमिक शाळा आणि तीन उच्च माध्यमिक शाळांचा काही विशिष्ट कालावधीसाठी समावेश करून शिक्षणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करीत आहे. या योजनेतील शाळांमध्ये कार्यरत शिक्षक, व्याख्याता, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते आदिवासी घटक योजनेतून आदिवासी विकास विभाग शालेय शिक्षण विभागाला निधी प्रदान करून देण्याची प्रचलित पध्दत आहे. ही योजना केवळ पाच वर्षांकरिता राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. शैक्षणिक वर्ष २०००-२००१ पासून अनुदानावर आलेल्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना सन २००५-२००६ मध्ये आदिवासी उपयोजना प्लॅनमधून नॉन प्लॅनमध्ये परावर्तित केले होते. त्यानंतर मात्र पंधरा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटूनही टीएसपी प्लॅनमधून शिक्षक, व्याख्याता, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनियमित स्वरूपात वेतन व भत्ते देणे सुरू आहे. या योजनेचा निधी दर महिन्याला उपलब्ध होत नसल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असतो.

.............

शासनाकडून वेठीस धरण्याचा प्रयत्न

शासन याकडे दुर्लक्ष करून हेतुपुरस्सर टीएसपी प्लॅनमधून नॉन प्लॅनमध्ये परावर्तित करण्याची कार्यवाही रखडल्याचा शिक्षण संघटनांनी आरोप करून शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न शासन करीत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणाची दखल घेऊन शासनाने गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना टीएसपी प्लॅनमधील शाळा त्वरित नॉन प्लॅनमध्ये परावर्तित करून कार्यरत शिक्षक, व्याख्याता, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते नियमित अदा करावे, अशी मागणी अर्जुनी मोरगाव शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिनेश नाकाडे यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनात केली आहे.