शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रिफाईंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST

गोंदिया : अलीकडच्या काळात हृदयरोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कारखान्यांमधून रिफाईंड करून आलेले तेल किती प्रमाणात शुद्ध आहे ...

गोंदिया : अलीकडच्या काळात हृदयरोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कारखान्यांमधून रिफाईंड करून आलेले तेल किती प्रमाणात शुद्ध आहे याची माहिती आपल्याला नसते. रिफाईंड तेलाच्या नावावर आपण आपल्या शरीरात रोगांची संख्या वाढवित आहोत. आता सगळीकडे रिफाईंड तेलाचाच वापर होत असल्याने या तेलाच्या वापराने चरबीमध्ये वाढ होत आहे. परिणामी आता लोक या रिफाईंड तेलाच्या ऐवजी जुन्याच घाणा तेलाची मागणी करीत आहेत. परंतु आता घाणा बंद झाल्याने रिफाईंड तेलाशिवाय पर्याय दिसत नाही. परंतु जीवन वाचवायचे असेल तर घाणा तेलाकडे वळावेच लागणार आहे.

.......................

रिफाईंड तेल घातक का?

- रिफाईंड तेलाला हॉटेलात किंवा घरीही पदार्थ तयार करताना वारंवार वापरले तर त्यातून कर्करोग होऊ शकतो.

- प्रोसेस करून फॅक्टरीतून आलेल्या तेलात तेल तयार करताना वापरण्यात येणारे दाणे चांगल्या दर्जाचे असतीलच असे नाही. निकृष्ट दर्जाच्या बिया किंवा दाणे वापरून तेल काढले जाते.

- रिफाईंड तेलामुळे आपण आपल्या शरीरात हळूहळू विष घेत आहोत ‘ स्लो पाॅयझन’ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

......................

म्हणून वाढत आहेत हृदयरोगी

रिफाईंड तेलाचा अतिवापर, त्यातच काही लोक जेवणात पोळीवर, भाकरीवर किंवा भातावरही कच्चे तेल टाकत असल्यामुळे त्यांच्या शरीरात कोलेस्ट्राॅल वाढते. शरीरात वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आजघडीला बहुतांश लोकांच्या पोटाची चरबी वाढली आहे. त्यामुळे हृदयरोगाचेही प्रमाण वाढले.

...................

लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय

आता लाकडी घाण्याचे तेल जिल्ह्यात कुठेच निघत नाही. त्यामुळे रिफाईंड केलेल्या तेलाचाच वापर जिल्हावासीय करीत आहेत. लाकडी तेलाच्या घाण्याचा वापर होत नसला तरी ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात जवस लावून त्या जवसाचे तेल वर्षातून २-४ महिने पुरेल अशा पध्दतीने नियोजन करतात. काही शेतकरी वर्षभरही तेल वापरू यासाठी जवस जास्तीत जास्त शेतात लावण्याचा प्रयत्न करतात.

................

आहार तज्ज्ञ काय म्हणतात?

प्रोसेस करून तयार करण्यात आलेले रिफाईंड तेल शरीरात कोलेस्ट्राॅल वाढविते. ते शरीराला हळू-हळू विषारी ठरते. यामुळे शरीरातील चरबी वाढून हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. दोन प्रकारचे तेल एकाच कढईत गरम केल्यास त्या तेलात आपोआपच रासायनिक प्रक्रिया होते. त्यामुळे असे करू नये.

- स्वाती बन्सोड, आहार तज्ज्ञ, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, गोंदिया.