शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रिफाईंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST

गोंदिया : अलीकडच्या काळात हृदयरोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कारखान्यांमधून रिफाईंड करून आलेले तेल किती प्रमाणात शुद्ध आहे ...

गोंदिया : अलीकडच्या काळात हृदयरोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कारखान्यांमधून रिफाईंड करून आलेले तेल किती प्रमाणात शुद्ध आहे याची माहिती आपल्याला नसते. रिफाईंड तेलाच्या नावावर आपण आपल्या शरीरात रोगांची संख्या वाढवित आहोत. आता सगळीकडे रिफाईंड तेलाचाच वापर होत असल्याने या तेलाच्या वापराने चरबीमध्ये वाढ होत आहे. परिणामी आता लोक या रिफाईंड तेलाच्या ऐवजी जुन्याच घाणा तेलाची मागणी करीत आहेत. परंतु आता घाणा बंद झाल्याने रिफाईंड तेलाशिवाय पर्याय दिसत नाही. परंतु जीवन वाचवायचे असेल तर घाणा तेलाकडे वळावेच लागणार आहे.

.......................

रिफाईंड तेल घातक का?

- रिफाईंड तेलाला हॉटेलात किंवा घरीही पदार्थ तयार करताना वारंवार वापरले तर त्यातून कर्करोग होऊ शकतो.

- प्रोसेस करून फॅक्टरीतून आलेल्या तेलात तेल तयार करताना वापरण्यात येणारे दाणे चांगल्या दर्जाचे असतीलच असे नाही. निकृष्ट दर्जाच्या बिया किंवा दाणे वापरून तेल काढले जाते.

- रिफाईंड तेलामुळे आपण आपल्या शरीरात हळूहळू विष घेत आहोत ‘ स्लो पाॅयझन’ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

......................

म्हणून वाढत आहेत हृदयरोगी

रिफाईंड तेलाचा अतिवापर, त्यातच काही लोक जेवणात पोळीवर, भाकरीवर किंवा भातावरही कच्चे तेल टाकत असल्यामुळे त्यांच्या शरीरात कोलेस्ट्राॅल वाढते. शरीरात वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आजघडीला बहुतांश लोकांच्या पोटाची चरबी वाढली आहे. त्यामुळे हृदयरोगाचेही प्रमाण वाढले.

...................

लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय

आता लाकडी घाण्याचे तेल जिल्ह्यात कुठेच निघत नाही. त्यामुळे रिफाईंड केलेल्या तेलाचाच वापर जिल्हावासीय करीत आहेत. लाकडी तेलाच्या घाण्याचा वापर होत नसला तरी ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात जवस लावून त्या जवसाचे तेल वर्षातून २-४ महिने पुरेल अशा पध्दतीने नियोजन करतात. काही शेतकरी वर्षभरही तेल वापरू यासाठी जवस जास्तीत जास्त शेतात लावण्याचा प्रयत्न करतात.

................

आहार तज्ज्ञ काय म्हणतात?

प्रोसेस करून तयार करण्यात आलेले रिफाईंड तेल शरीरात कोलेस्ट्राॅल वाढविते. ते शरीराला हळू-हळू विषारी ठरते. यामुळे शरीरातील चरबी वाढून हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. दोन प्रकारचे तेल एकाच कढईत गरम केल्यास त्या तेलात आपोआपच रासायनिक प्रक्रिया होते. त्यामुळे असे करू नये.

- स्वाती बन्सोड, आहार तज्ज्ञ, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, गोंदिया.