शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रिफाईंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST

गोंदिया : अलीकडच्या काळात हृदयरोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कारखान्यांमधून रिफाईंड करून आलेले तेल किती प्रमाणात शुद्ध आहे ...

गोंदिया : अलीकडच्या काळात हृदयरोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कारखान्यांमधून रिफाईंड करून आलेले तेल किती प्रमाणात शुद्ध आहे याची माहिती आपल्याला नसते. रिफाईंड तेलाच्या नावावर आपण आपल्या शरीरात रोगांची संख्या वाढवित आहोत. आता सगळीकडे रिफाईंड तेलाचाच वापर होत असल्याने या तेलाच्या वापराने चरबीमध्ये वाढ होत आहे. परिणामी आता लोक या रिफाईंड तेलाच्या ऐवजी जुन्याच घाणा तेलाची मागणी करीत आहेत. परंतु आता घाणा बंद झाल्याने रिफाईंड तेलाशिवाय पर्याय दिसत नाही. परंतु जीवन वाचवायचे असेल तर घाणा तेलाकडे वळावेच लागणार आहे.

.......................

रिफाईंड तेल घातक का?

- रिफाईंड तेलाला हॉटेलात किंवा घरीही पदार्थ तयार करताना वारंवार वापरले तर त्यातून कर्करोग होऊ शकतो.

- प्रोसेस करून फॅक्टरीतून आलेल्या तेलात तेल तयार करताना वापरण्यात येणारे दाणे चांगल्या दर्जाचे असतीलच असे नाही. निकृष्ट दर्जाच्या बिया किंवा दाणे वापरून तेल काढले जाते.

- रिफाईंड तेलामुळे आपण आपल्या शरीरात हळूहळू विष घेत आहोत ‘ स्लो पाॅयझन’ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

......................

म्हणून वाढत आहेत हृदयरोगी

रिफाईंड तेलाचा अतिवापर, त्यातच काही लोक जेवणात पोळीवर, भाकरीवर किंवा भातावरही कच्चे तेल टाकत असल्यामुळे त्यांच्या शरीरात कोलेस्ट्राॅल वाढते. शरीरात वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आजघडीला बहुतांश लोकांच्या पोटाची चरबी वाढली आहे. त्यामुळे हृदयरोगाचेही प्रमाण वाढले.

...................

लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय

आता लाकडी घाण्याचे तेल जिल्ह्यात कुठेच निघत नाही. त्यामुळे रिफाईंड केलेल्या तेलाचाच वापर जिल्हावासीय करीत आहेत. लाकडी तेलाच्या घाण्याचा वापर होत नसला तरी ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात जवस लावून त्या जवसाचे तेल वर्षातून २-४ महिने पुरेल अशा पध्दतीने नियोजन करतात. काही शेतकरी वर्षभरही तेल वापरू यासाठी जवस जास्तीत जास्त शेतात लावण्याचा प्रयत्न करतात.

................

आहार तज्ज्ञ काय म्हणतात?

प्रोसेस करून तयार करण्यात आलेले रिफाईंड तेल शरीरात कोलेस्ट्राॅल वाढविते. ते शरीराला हळू-हळू विषारी ठरते. यामुळे शरीरातील चरबी वाढून हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. दोन प्रकारचे तेल एकाच कढईत गरम केल्यास त्या तेलात आपोआपच रासायनिक प्रक्रिया होते. त्यामुळे असे करू नये.

- स्वाती बन्सोड, आहार तज्ज्ञ, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, गोंदिया.