शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कारवायांत घट; मात्र लाचखोरी थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

कपिल केकत गोंदिया : अगोदर आलेल्या नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था हादरून गेली होती. त्यानंतर आता मागील वर्षापासून कोरोनाने अर्थव्यवस्थेचे वाटोळेच करून ...

कपिल केकत

गोंदिया : अगोदर आलेल्या नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था हादरून गेली होती. त्यानंतर आता मागील वर्षापासून कोरोनाने अर्थव्यवस्थेचे वाटोळेच करून टाकले आहे. कोरोनामुळे मागील वर्षापासून कित्येकांच्या हातचे रोजगार हिरावले गेले आहेत; तर कित्येक उद्योगधंदे बंद पडले असून काम देणाऱ्या हातांनाच आता काम मागण्याची वेळ आल्याचेही दिवस पाहावयास मिळत आहेत. लोकांना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला असतानाही लाचखोरांना मात्र त्याचे काहीच सोयरसुतक नाही. परिणामी कोरोनाकाळातही लाचखोर माणुसकी सोडून पैशांची सर्रास मागणी करीत आहेत. कोरोनापूर्वी जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेल्या कारवायांत घट दिसून येत असली तरीही सन २०२१ मधील सहा महिन्यांत सहा कारवाया करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, कारवायांत घट असली तरी लाचखोरी मात्र थांबली नसल्याचे दिसत आहे.

-------------------------------

वर्ष लाच प्रकरणे (ग्राफ)

२०१६ २६

२०१७ १६

२०१८ २५

२०१९ २२

२०२० १६

२०२१ (जुलैपर्यंत) ०६

-----------------------------

ग्रामविकास विभाग सर्वांत पुढे

- जिल्ह्यात ग्रामविकास विभाग (जिल्हा परिषद-पंचायत समिती) सन २०१६ मध्ये बघितल्यास विभागाने पाच कारवायांत सहा लाचखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.

- सन २०१८ मध्ये ग्रामविकास विभागात सर्वाधिक आठ कारवाया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केल्या असून, यामध्ये नऊ लाचखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.

- सन २०२१ मध्ये जुलैपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण सहा कारवाया केल्या आहेत. मात्र त्यात एक कारवाई ग्रामविकास विभागात असून एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------

लाच दोनशेपासून दोन लाखांपर्यंत !

घरकुलसाठी २०० रुपयांची लाच

जिल्ह्यात सन २०१८ मध्ये ग्राम रोजगार सेवकाने एकाला घरकुल मंजूर करवून देण्यासाठी २०० रुपयांची मागणी केली होती. ते जिल्ह्यातील सर्वांत कमी रकमेचे लाचेची मागणी करण्याचे प्रकरण आहे.

---------

रेतीघाटांवर धाड न घालण्यासाठी दोन लाखांची लाच

सन २०१६ मध्ये जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याने रेतीघाटांवर कारवाई न करण्यासाठी येथील रेती व्यावसायिकांकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. ही जिल्ह्यातील सर्वांत जास्त रकमेची मागणी होती.

------------------------------------

न घाबरता पुढे या...

काम करून देण्यासाठी सर्वत्र लाचेची मागणी केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. पैशांची मागणी करणे बेकायदेशीर असून, कुणीही पैशांची मागणी केल्यास न घाबरता पुढे यावे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी तत्पर आहे.

- रमाकांत कोकाटे

निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग