शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान कमी, दिलासा जास्त

By admin | Updated: September 13, 2016 00:29 IST

तब्बल तीन आठवड्यापर्यंत दडी मारलेल्या पावसाने शनिवारी जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. शनिवार,

सलग तिसऱ्या दिवशी पाऊस : पुन्हा चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंदगोंदिया : तब्बल तीन आठवड्यापर्यंत दडी मारलेल्या पावसाने शनिवारी जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. शनिवार, रविवार आणि सोमवारीही पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागात जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या धानपिकांना यामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र सालेकसा, देवरी तालुक्यात पावसाने कहर केल्यामुळे काही प्रमाणात नुकसानही झाले. या पावसामुळे पिकांना कोणतेही नुकसान झाले नसून भारी जातीच्या धानपिकास लाभच झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. जिल्ह्यात रोवणीची कामे आटोपल्यानंतर आता निंदणाची कामे सुरु आहेत. पिकातील केरकचरा, गवत आदी काढून धानपीक मोकळे करण्याची कामे जोमात सुरू आहेत. परंतु सध्या धानपीक गर्भावस्थेत असून फुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भारी जातीच्या धानपिकाला पाण्याची तर गरज होतीच, पण हलक्या जातीच्या धानाला एका पावसाची गरज होती. ही गरज सध्याच्या आलेल्या पावसाने पूर्ण केल्याने शेतकरी सुखावले आहेत. विशेष म्हणजे या पावसाने धानावरील कीड नष्ट झाल्याचे दिसून येते. तीन दिवसांत देवरी व सालेकसा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. या दोन्ही तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. यासोबतच आमगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यात रविवारी ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. अतिवृष्टीचा फटका काही भागातील रहदारीला झाला. नाल्यांना पूर आल्याने आणि पुलावरून पाणी वाहात असल्याने काही मार्ग बंद पडले. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १,०५८.९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. (प्रतिनिधी) पिकांना फायदाच होणार सध्याच्या पावसाबाबत कृषी विभागाकडे संपर्क साधला असता, धानपीक गर्भावस्थेत असून फुटण्याच्या मार्गावर आहे. आलेला पाऊस पिकांच्या वाढीसाठी पोषक आहे. ज्या ठिकाणी जास्त पाऊस आला, तेथील शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये. ते पाणी जमिनीत मुरले असून पिकांसाठी लाभदायकच ठरले. जिल्ह्यात धानपीक असल्यामुळे या पाण्याचा लाभच होईल. जिल्ह्यात सोयाबिन पीक असते तर सोयाबिनला काही प्रमाणात नुकसान झाले असते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी ए.एस. भोंगाडे यांनी सांगितले. पाच तालुक्यांत नुकसान रविवारी (दि.११) आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी घरांची पडझड होवून लाखोंचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत. काही ठिकाणी पंचनामे होवून नुकसानाची अंदाजे रक्कम काढण्यात आली आहे, तर काही ठिकाणचे पंचनामे होणे बाकी असल्याने नुकसानाची अंदाजे रक्कम मिळू शकली नाही. गोरेगाव तालुक्यात १६ घरे अंशत: बाधित झाली असून एक लाखाचे नुकसान झाले आहे. सोनी येथील एका शेळीचा मृत्यू झाला. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३० घरे अंशत: बाधित झाले असून ९० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. देवरी तालुक्यातील २५ घरे व सहा गोठे बाधित झाले आहेत. आमगाव तालुक्यात १११ घरे व ३२ गोठे अंशत: बाधित झाले. तसेच एका शेळीचा मृत्यू झाला. यात अंदाजे आठ लाख ३२ हजार १०० रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. सालेकसा तालुक्यात १०१ घरे व ४९ गोठे अंशत: बाधित तर तीन घरे पूर्णत: कोसळल्याचे वृत्त आहे. गोंदिया व सडक-अर्जुनी तालुक्यात तूर्त नुकसान नाही. सिरपूर जलाशयाचे पाच दरवाजे उघडले सिरपूरबांध : दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे सिरपूर जलाशयातील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. सोमवारी जलाशयाचे ५ दरवाजे चार-चार फुटांनी उघडून त्यातून १६३२० क्युसेक पाणी सोडण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने बाघनदी काठाजवळील गावांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नदी काठावरील लोकांनी सावध राहावे म्हणून पाटबंधारे विभागाने संबंधित विभागाला माहिती दिल्याचे शाखा अभियंता यांनी सांगितले. पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पर्यटकांनीही सोमवारी येथे हजेरी लावल्याचे दिसून आले. तालुकानिहाय पडलेला पाऊस (मि.मी.मध्ये) तालुका २४ तासात आतापर्यंत गोंदिया ४०.० ९२८.० तिरोडा ३.४ १०५७.४ गोरेगाव ६०.० १०४४.५ आमगाव १५८.० १०५७.० सालेकसा १९५.४ १३६८.४ देवरी १०५.० १०१६.० सडक अर्जुनी ६५.४ १०९८.२ अर्जुनी मोरगाव ५७.० ९०१.९ एकूण सरासरी ८५.५ १०५८.९