शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

चोरी ३० लाखांची रिकव्हरी ३ लाखांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:59 IST

रेल्वे गाड्यांमध्ये मागील वर्षभरात चोरीच्या १४० घटना घडल्या. यात एकूण ३० लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

ठळक मुद्देरेल्वेगाड्यांत वाढले चोरीचे प्रकार : ७२ टक्के घटना गुलदस्त्यात

आॅनलाईन लोकमतगोंदिया : रेल्वे गाड्यांमध्ये मागील वर्षभरात चोरीच्या १४० घटना घडल्या. यात एकूण ३० लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. मात्र यापैकी केवळ ३६ घटनांचा छडा लावून तीन लाख ६५ हजार रुपयांची रिकव्हरी करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. तर बरीच प्रकरणे अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे चित्र आहे.रेल्वे प्रवास करायचा आहे तर स्वत:च्या सामानांचे स्वत:च संरक्षण करण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. रेल्वे परिसर किंवा रेल्वेगाडीमधून सामानांची चोरी झाली तर पोलीस शोध घेतील, याची अपेक्षासुद्धा करू नये. हे रेल्वे परिसर व गाड्यांमध्ये झालेल्या चोºया व प्रकरणांचा तपास करण्यात आलेल्या पोलिसांना आलेल्या अपयशामुळे म्हणण्याची वेळ आलीे आहे. मागील वर्षभरात गोंदिया रेल्वे पोलिसांना चोरीच्या घटना उघडकीस आणण्यात ७४ टक्के पिछाडीवर. त्यातच चोरीच्या प्रकरणांतील रिकव्हरीतही ८८ टक्के माघारल्याचे चित्र आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान गोंदिया रेल्वे पोलीस ठाणे क्षेत्रात रेल्वे प्रवाशांसह चोरीच्या १४० घटना घडल्या. यात ३० लाख ९६ हजार ३५१ रूपयांच्या सामानांची चोरी झाली.रेल्वे पोलिसांनी केवळ ३६ घटनांचा तपास पूर्ण करून उघडकीस आणल्या. यात तीन लाख ६५ हजार ८२६ रूपयांच्या सामानांची रिकव्हरी पोलिसांनी केली आहे. तर तब्बल १०४ घटना उघडकीस आणण्यात व २७ लाख ३० हजार ५२५ रूपयांच्या सामानांची रिकव्हरी करण्यात अपयशी ठरले आहेत. चोरीच्या घटना उघडकीस आणण्याचा दर २६ टक्के व सामानांच्या रिकव्हरीचा दर केवळ १२ टक्के आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.चोरीच्या मोबाईलचे मालकही बेपत्तारेल्वे प्रवाशांच्या सामानांच्या चोरीच्या घटनांमध्ये सर्वाधिक घटना मोबाईल चोरीच्या घडल्या आहेत. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार सन २०१७ मध्ये मोबाईल चोरीच्या ५० ते ६० घटना नोंद झाल्या आहेत. पोलिसांनी जवळपास दीड महिन्यापूर्वी तीन मोबाईल चोरांना अटक करून त्यांच्याकडून २४ मोबाईल जप्त केले होते. मागील दीड महिन्यात त्यापैकी केवळ एका मोबाईलच्या मालकाचा पत्ता लागू शकला. उर्वरित मोबाईलच्या मालकांचा शोध अद्याप लागू शकला नाही.२६ मृतदेहांची ओळख पटली नाहीमागील वर्षभरात रेल्वे ट्रॅकवर विविध घटनांमध्ये ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २५ मृतदेहांची ओळख पटली असून त्यांच्या कुटुंबातील लोकांनी आपल्या सामाजिक मान्यतेनुसार अंतिम संस्कार केले. तर १४ मृतदेह अनोळखी असल्यामुळे अंतिम संस्कारादरम्यान त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती नव्हती. गोंदिया रेल्वे पोलीस ठाणे क्षेत्रात नैसर्गिक मृत्यूच्या ३२ घटना घडल्या.