शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

चोरी ३० लाखांची रिकव्हरी ३ लाखांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:59 IST

रेल्वे गाड्यांमध्ये मागील वर्षभरात चोरीच्या १४० घटना घडल्या. यात एकूण ३० लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

ठळक मुद्देरेल्वेगाड्यांत वाढले चोरीचे प्रकार : ७२ टक्के घटना गुलदस्त्यात

आॅनलाईन लोकमतगोंदिया : रेल्वे गाड्यांमध्ये मागील वर्षभरात चोरीच्या १४० घटना घडल्या. यात एकूण ३० लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. मात्र यापैकी केवळ ३६ घटनांचा छडा लावून तीन लाख ६५ हजार रुपयांची रिकव्हरी करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. तर बरीच प्रकरणे अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे चित्र आहे.रेल्वे प्रवास करायचा आहे तर स्वत:च्या सामानांचे स्वत:च संरक्षण करण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. रेल्वे परिसर किंवा रेल्वेगाडीमधून सामानांची चोरी झाली तर पोलीस शोध घेतील, याची अपेक्षासुद्धा करू नये. हे रेल्वे परिसर व गाड्यांमध्ये झालेल्या चोºया व प्रकरणांचा तपास करण्यात आलेल्या पोलिसांना आलेल्या अपयशामुळे म्हणण्याची वेळ आलीे आहे. मागील वर्षभरात गोंदिया रेल्वे पोलिसांना चोरीच्या घटना उघडकीस आणण्यात ७४ टक्के पिछाडीवर. त्यातच चोरीच्या प्रकरणांतील रिकव्हरीतही ८८ टक्के माघारल्याचे चित्र आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान गोंदिया रेल्वे पोलीस ठाणे क्षेत्रात रेल्वे प्रवाशांसह चोरीच्या १४० घटना घडल्या. यात ३० लाख ९६ हजार ३५१ रूपयांच्या सामानांची चोरी झाली.रेल्वे पोलिसांनी केवळ ३६ घटनांचा तपास पूर्ण करून उघडकीस आणल्या. यात तीन लाख ६५ हजार ८२६ रूपयांच्या सामानांची रिकव्हरी पोलिसांनी केली आहे. तर तब्बल १०४ घटना उघडकीस आणण्यात व २७ लाख ३० हजार ५२५ रूपयांच्या सामानांची रिकव्हरी करण्यात अपयशी ठरले आहेत. चोरीच्या घटना उघडकीस आणण्याचा दर २६ टक्के व सामानांच्या रिकव्हरीचा दर केवळ १२ टक्के आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.चोरीच्या मोबाईलचे मालकही बेपत्तारेल्वे प्रवाशांच्या सामानांच्या चोरीच्या घटनांमध्ये सर्वाधिक घटना मोबाईल चोरीच्या घडल्या आहेत. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार सन २०१७ मध्ये मोबाईल चोरीच्या ५० ते ६० घटना नोंद झाल्या आहेत. पोलिसांनी जवळपास दीड महिन्यापूर्वी तीन मोबाईल चोरांना अटक करून त्यांच्याकडून २४ मोबाईल जप्त केले होते. मागील दीड महिन्यात त्यापैकी केवळ एका मोबाईलच्या मालकाचा पत्ता लागू शकला. उर्वरित मोबाईलच्या मालकांचा शोध अद्याप लागू शकला नाही.२६ मृतदेहांची ओळख पटली नाहीमागील वर्षभरात रेल्वे ट्रॅकवर विविध घटनांमध्ये ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २५ मृतदेहांची ओळख पटली असून त्यांच्या कुटुंबातील लोकांनी आपल्या सामाजिक मान्यतेनुसार अंतिम संस्कार केले. तर १४ मृतदेह अनोळखी असल्यामुळे अंतिम संस्कारादरम्यान त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती नव्हती. गोंदिया रेल्वे पोलीस ठाणे क्षेत्रात नैसर्गिक मृत्यूच्या ३२ घटना घडल्या.