शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

दोन महिन्यांत होणार रेकॉर्ड दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:12 IST

७-१२ व खसऱ्यातील चकबंदी नंतर रेकॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात त्रृट्या असल्याने या विषयाला घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेच्या हिवाळी सत्रादरम्यान भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब काळे,.....

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल यांचे निर्देश : उपसंचालक व अधिकाऱ्यांची घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ७-१२ व खसऱ्यातील चकबंदी नंतर रेकॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात त्रृट्या असल्याने या विषयाला घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेच्या हिवाळी सत्रादरम्यान भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब काळे, येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख पवार यांच्यासह संबंधीत अधिकाºयांची बैठक घेऊन फेब्रुवारी पर्यंत रेकॉर्ड दुरूस्तीचे निर्देश दिले. आमदारांच्या निर्देशावरून येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत रेकॉर्ड दुरूस्तीचे कार्य पूर्ण करून देण्याचे आश्वासन उपसंचालक काळे यांनी दिले.गोंदिया तालुक्यात शेत जमिनीची चकबंदी झाल्यानंतरही कित्येक गावांत ७-१२ व खसºयांच्या रेकॉर्डमध्ये त्रुट्या आहेत. या त्रूट्यांमुळे शेतकºयांची जागा जास्त असूनही ७-१२ मध्ये कमी जागा दाखविणे व गट क्रमांकमध्ये गडबड सारख्या त्रुट्या आढळून येत आहेत.परिणामी शासनाकडून पिकांचे नुकसान किंवा कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात असला तरिही ७-१२ मधील चुकांमुळे कित्येक शेतकरी लाभापासून वंचीत राहतात. यावर भूमापक विभागाने ठरवून दिलेले दर जमा केल्यावर जागेची मोजणी करून रेकॉर्ड दुरूस्ती केली जाते. यासाठी मात्र शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असतानाच कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात.गोंदिया विधानसभा क्षेत्रातील नवेगाव धापेवाडा व पिपरटोला येथील बहुतांश ७-१२ ला घेऊन मोठ्या प्रमाणात शासकीय रेकॉर्ड मध्ये त्रुट्या आहेत.या सर्व प्रकारांवर कायम तोडगा निघावा यासाठी आमदार अग्रवाल पुनर्मोजणी करण्यासाठी प्रयत्नरत होते. परिणामी लगतच्या कटंगी, कुडवा,फु लचूर, फुलचूरपेठ, मुर्री, पिंडकेपार आदि गावांत पुनर्मोजणी चे काम सुरू आहे.दरम्यान आमदार अग्रवाल यांनी विधानसभेच्या हिवाळी सत्रादरम्यान भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब काळे, येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख पवार यांच्यासह संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत रेकॉर्ड दुरूस्ती करण्याचे निर्देश दिले.यावर काळे यांनी गोंदिया तालुक्यातील महसूल मंडळातील ग्राम गंगाझरी, रतनारा, खमारी, दासगाव, रावणवाडी व कामठा येथे विशेष शिबिर घेऊन त्रुटीपूर्ण सर्व रेकॉर्ड एकत्रीत केले जात असून त्यांची लगेच दुरूस्ती केली जाणार असल्याचे सांगीतले.पुनर्मोजणी नि:शुल्क करावीरेकॉर्ड मधील त्रुट्यांना महसूल विभाग जबाबदार असून अशा त्रुट्यांच्या दुरूस्तीसाठी शेतकऱ्यांकडून शुल्क आकारणे योग्य नसल्याचे आमदार अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन सांगीतले होते. त्यामुळे ज्या गावात एकूण भूधारकांच्या १० टक्के प्रकरणांत त्रुट्या असतील अशा गावातील पुनर्मोजणी नि:शुल्क करावी अशी मागणी केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्याकडून संपूर्ण माहिती घेत या संदर्भात राज्य शासनाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता हे दुरूस्तीचे कार्य सुरू होणार आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल