शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी मोडणार मागील १८ वर्षांचा रेकार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 13:10 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. मात्र यंदा सुरूवातीपासूनच या दोन्ही केंद्रावर मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.

ठळक मुद्देआत्तापर्यंत सहा क्विंटल खरेदीउचल करणाऱ्यांवर सर्व गणित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. मात्र यंदा सुरूवातीपासूनच या दोन्ही केंद्रावर मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर आत्तापर्यंत सहा क्विंटल धान खरेदी झाली असून या हंगामात १५ लाख क्विंटल धान खरेदी होण्याची शक्यता असून मागील १८ वर्षांचा रेकार्ड मोडला जाण्याची शक्यता आहे.गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ७५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी केली जाते. यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे ५७ तर आदिवासी विकास महामंडळाचे ४३ असे एकूण १०० खरेदी केंद्र उघडण्यात आले आहे. १५ डिसेंबरपर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या ५७ केंद्रावरुन एकूण ६ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी संपूर्ण खरीप हंगामात ६ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. तर यंदा केंद्र सुरू झाल्यानंतर महिनाभरातच ६ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. मार्केटिंग फेडरेशनतर्फे मार्च महिन्यापर्यंत धान खरेदी केली जाते. तर अद्याप जिल्ह्यातील ६० टक्के शेतकऱ्यांची धानाची मळणी होणे शिल्लक आहे. त्यामुळे यंदा १५ लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी होण्याची शक्यता आहे. मागील १७ वर्षांत सर्वाधिक धान खरेदी २०१५-१६ मध्ये १२ लाख १९ हजार क्विंटल करण्यात होती. ही आत्तापर्यंतची सर्वाधिक खरेदी असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र यंदा हा रेकार्ड सुध्दा मोडण्याची शक्यता आहे.

धानाची उचल न झाल्यास गोदामांची समस्याजिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर खरेदी केंद्रावर खरेदी केलेला धानाची उचल राईसमिल संचालकाकडून भरडाईसाठी केली जाते. नुकताच यासाठी जिल्हा प्रशासनाने १५३ राईसमिल संचालकांशी करार केला आहे. मात्र धानाची उचल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. ही प्रक्रिया लवकरात लवकर झाल्यास धान ठेवण्याची समस्या निर्माण होणार नाही. मात्र उशीर झाल्यास गोदामांची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :agricultureशेती