शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

दररोज होत आहे बाधितांच्या संख्येचा ‘रेकॉर्डब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:30 IST

गोंदिया : कोरोना कहर दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालला असून, परिस्थिती आता हाताबाहेर जाताना दिसत आहे. अशीच काहीशी स्थिती ...

गोंदिया : कोरोना कहर दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालला असून, परिस्थिती आता हाताबाहेर जाताना दिसत आहे. अशीच काहीशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली असून, वाढत्या रुग्ण संख्येमुळे धडकी भरू लागली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षापेक्षा यंदाची आकडेवारी जास्त असून, त्यात दररोज भर पडत आहे. यामुळेच यंदा बाधितांच्या संख्येमुळे दररोज ‘रेकॉर्डब्रेक’ होत आहेत.

मागील वर्षीपासून कोरोनाने कहर केला असून, मध्यंतरी काही महिन्यांत स्थिती नियंत्रणात आल्याचे दिसत होते. मात्र, नववर्षात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून, कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. देशात सर्वात गंभीर स्थिती महाराष्ट्राची असून, त्याचे पडसाद आता जिल्ह्यातही दिसून येत आहेत. मागील वर्षी नव्हती तेवढी रूग्ण संख्या यंदा नोंदली जात आहे. यामुळेच आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. मागील वर्षी बाधितांची संख्या ४०० पर्यंत नोंदविली गेली होती. यंदा मात्र,१५ ते २० दिवसांतच बाधितांची संख्या तब्बल ५०० वर गेली आहे. विशेष म्हणजे, बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून, त्यात दररोज वाढ होतानाच दिसत आहे. हेच कारण आहे की, बाधितांची संख्या आता १८२२० वर गेली आहे. एकंदर जिल्ह्याची स्थिती बघता दररोज बाधितांची संख्या वाढत असल्याचे दररोज ‘रेकॉर्ड ब्रेक’ होत असून, एक नवा ‘रेकॉर्ड’ तयार होताना दिसत आहे.

-------------------------------------

प्रथमच तब्बल ६ रूग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत चालली असतानाच मृतांची संख्याही सोबतच वाढत आहे. मात्र, ७ एप्रिल हा दिवस जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरला असून, या दिवशी तब्बल ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षीही एकाच दिवसात एवढ्या मृत्यूची नोंद घेण्यात आली नव्हती. म्हणजेच, बाधितांच्या संख्येपाठोपाठ मृतांचे आकडेही नवनवे ‘रेकॉर्ड’ तयार करीत असताना दिसत आहे.

------------------------------

आतातरी गांभीर्याने घेण्याची गरज

जिल्ह्यातील बाधितांची आकेडवारी आता ५०० वर जात असून, त्यात वाढ होतच आहे. शिवाय मृतांची संख्याही वाढत असताना नागरिकांत काहीच गांभीर्य दिसून येत नाही. ही मात्र शोकांतिका आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांच्या कितीतरी पट जास्त रूग्ण व मृत्यू गोंदिया तालुक्यातील आहेत. यात शहराचीच आकडेवारी सर्वाधिक असूनही शहरवासीयांना काहीच फरक पडलेला दिसत नाही. मात्र, आताची स्थिती बघता नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.