शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी फोडली समाजातील समस्यांना वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 21:55 IST

आपल्या बाजुला दररोज विविध घटना घडतात. बºयाच समस्या आपल्या लक्षात येवून त्या आपल्याला मांडता येत नाही.

ठळक मुद्देलेखणीतून मांडली मते : लोकमतचा उपक्रमबालकदिन विशेष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपल्या बाजुला दररोज विविध घटना घडतात. बºयाच समस्या आपल्या लक्षात येवून त्या आपल्याला मांडता येत नाही. यासर्व घडामोंडीविषयी विद्यार्थ्यांना सुध्दा अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांवर व्यक्त होण्याची व त्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्याचा त्यांचा मानस असतो. मात्र त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळत नाही. लोकमतने बालक दिनाचे औचित्त्य साधून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची व स्वत:च्या लेखणीनतून मते मांडण्याची संधी उपलब्ध करुन दिली. यावेळी शारदा कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि.१३) लोकमत जिल्हा कार्यालयाला भेट देऊन तिथे चालणाºया कामकाजाची माहिती घेतली. तसेच स्वत: बातमीदाराची भूमिका पार पाडून काही बातम्या संपादित केल्या. बालकदिनाच्या पूर्व संध्येला लोकमतने उपलब्ध करुन दिलेल्या या संधीबद्दल विद्यार्थ्यांनी लोकमतचे आभार मानले. यावेळी शारदा कॉन्व्हेंटचे चित्रेश भेलावे, वलय बिसेन, जय लांजेवार, नेहा चव्हाण, श्वेता कोंटागले, भूमिका लारोकर, आशुतोष अवस्थी, वेदी बिसेन व शिक्षक पी.ए.फुंडे व व्ही.ए.खोब्रागडे उपस्थित होते.वृक्षारोपण करुन करा पर्यावरणाचे संवर्धन-वेदी बिसेनवाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे जंगलाचे प्रमाण कमी होत आहे. शहरातील हिरवळ देखील नष्ट होत चालली आहे. त्याचे गंभीर परिणाम पर्यावरण होत आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सर्वांनी वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. झाडांमुळे आपल्या प्राणवायु मिळतो. शिवाय कार्बन डायआॅक्साइड व कार्बन मोनआॅक्साइडचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. पर्यावरणाच्या ºहासामुळे दिल्लीत प्रदूषणाची समस्या बिकट झाली आहे. तेथील लोकांना मास्क लावून फिरण्याची वेळ आली आहे. ही वेळ गोंदियातील नागरिकांवर येऊ नये, यासाठी सर्वांनी आत्तापासूनच काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकांनी किमान एक झाड लावण्याचा संकल्प करावा. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज आहे.अंधश्रद्धेला नका घालू खतपाणी -नेहा चव्हाणआपली आधुनिकतेकडे वाटचाल सुरू असली तरी अजूनही समाजात मोठ्या प्रमाणात अनिष्ठ रुढी पंरपरा कायम आहेत. यामुळे अनेकदा समाजात तेढ निर्माण होतो. त्यामुळे वैज्ञानिक युगात अंधश्रध्देला खतपाणी न घालता लोकांमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प बालकदिनी विद्यार्थ्यांनी करावा. अंधश्रध्देला खत पाणी न मिळाल्यास समाजात एकोपा वाढविण्यास मदत होईल. रस्त्यावर भटकंती करणारे व बालमजुरी करणाºया मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा विकास साधवा. या बालकदिनी विद्यार्थ्यांनी समाजातून अनिष्ठ रूढी पंरपरा नष्ट करुन एका समृध्द समाजाची निर्मिती करावी.विद्यार्थ्यांना मिळावे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन- भूमिका लारोकरआजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. युवकांना पुढे जाण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. मात्र नेमका याच गोष्टीचा सध्या अभाव आहे. त्यामुळे आजच्या युवा पिढीला योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी शहर आणि ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेविषयक मार्गदर्शन केंद्र उघडण्यात यावे. विद्याथी व युवकांना चालू घडामोंडीची माहिती देऊन त्यांनी कुठल्या क्षेत्राची व अभ्यासक्रमाची निवड करावी, तसेच कुठल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. यादृष्टीने मार्गदर्शन मिळाल्यास आदर्श समाजाची निर्मिती करण्यास मदत होईल.वाढत्या अपघातांना लावा प्रतिबंध- आशुतोष अवस्थीअलीकडे अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यापैकी बरेच अपघात हे वाहतुकीच्या नियमांची माहिती नसल्याने घडलेले आहेत. वाढत्या अपघातांच्या घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी वेळीच उपाय योजना राबविण्याची गरज आहे. बालकदिनी विद्यार्थ्यांनी लोकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचा संकल्प करावा. तसेच अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये असे आवाहन पालकांना करावे.