शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यासह संविधानाचे वाचन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:15 IST

आपल्या संविधानानेही अधिकार दिले आहेत, सत्ता दिली आहे तसेच कर्तव्यही सांगितले. मात्र सध्याचे सत्ताधारी सत्ता मिळाल्यानंतर मात्र संविधानाने सांगितलेल्या कर्तव्याला विसरले आहे. ओबीसी समाजाला संविधान समजण्यासाठी साहित्याच्या वाचनासह संविधानाचे वाचनही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन समता प्रकाशनाचे संपादक प्रदीप गायकवाड यांनी केले.

ठळक मुद्देराज्यस्तरीय ओबीसी साहित्य संमेलन : विविध मान्यवरांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपल्या संविधानानेही अधिकार दिले आहेत, सत्ता दिली आहे तसेच कर्तव्यही सांगितले. मात्र सध्याचे सत्ताधारी सत्ता मिळाल्यानंतर मात्र संविधानाने सांगितलेल्या कर्तव्याला विसरले आहे. ओबीसी समाजाला संविधान समजण्यासाठी साहित्याच्या वाचनासह संविधानाचे वाचनही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन समता प्रकाशनाचे संपादक प्रदीप गायकवाड यांनी केले.ओबीसी सेवा संघाच्यावतीने सवैंधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानांतर्गत सहावे राज्यस्तरीय ओबीसी साहित्य संमेलन आमगाव तालुक्यातील तिगाव येथे रविवारी आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.ओबीसी सेवा संघाचे संस्थापक इंजि.प्रदीप ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.या वेळी कवियत्री अंजनाबाई खुने,मार्गदर्शक म्हणून साहित्यिक व कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर,ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, राष्टÑीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, पं.स. सदस्य अशोक पटले,ओबीसी महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा खोटेले,सेवा संघाचे अध्यक्ष भय्याजी लांबट, कन्हैया बोपचे, स्वागताध्यक्ष व तिगावंचे सरपंच नरेंद्र शिवणकर, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमरकर, ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे, माजी कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे, उदय टेकाडे, हरीश कोहळे, कैलास भेलावे, दिनेश हुकरे, लीलाधर गिरेपुंजे, रवींद्र शहारे उपस्थित होते. साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथदिंडीने करण्यात आली.संविधानाच्या जयघोषासह जय ओबीसीच्या घोषणेने परिसर दुमदुमला होता. संमेलनाचे उद्घाटन सविंधान व महापुरु षांच्या ग्रंथाचे पूजन करण्यात आले. गायकवाड म्हणाले,ओबीसी साहित्य संमेलनातून ओबीसी साहित्यिकांची ओळख जनतेला व्हायला हवी आजही आमच्या ओबीसी बहुजन साहित्यिंकाना दुय्यम लेखले जात असल्याचे सांगत महाराष्ट्रातील पहिले कादंबरीकार कुणी असतील तर ते बहुजन समाजातील बाबा पदमनजी आहेत.परंतु इतिहासात बाबा पदमनजी यांचे नावच सांगितले गेले नाही. कारण आपल्या समाजाला आधी शिक्षणाचा अधिकार नव्हता, शिक्षण नव्हते त्यामुळे आपण लिखाणही करू शकत नव्हते. अशा परिस्थितीत महात्मा फुलेंनी आमच्यासाठी खुला केलेला मार्ग प्रत्येक ओबीसी व बहुजनांनी स्वीकारून त्यास जिवंत ठेवण्यासाठी अशा संमेलनाची गरज आहे.महात्मा फुल्यांचे साहित्य हे आधुनिक काळात ओबीसी समाजासाठी खरे मार्गदर्शक ठरणारे आहे. ओबीसी बहुजन संतांची मोठी परंपरा असून ओबीसी साहित्याच्या क्षेत्रात संत नामदेवांचा उल्लेख केल्याशिवाय संत साहित्य पूर्ण होऊ शकत नाही. संत चोखामेळा ते तुकारामापर्यंतची संत परंपरा ही कुळ, जाती व धर्माच्या बेड्या तोडणारी होती. त्याचप्रमाणे भारतीय संविधान हे सर्वधर्मसमभाव जपणारे असल्यानेच सर्वांना समानसंधी प्राप्त होत असल्याचे ते म्हणाले.या वेळी विदर्भाच्या बहिणाबाई अंजनाबाई खुने यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना मला पुरस्काराची काहीही गरज नाही मात्र समाजात शांतता व सर्वधर्मभावना रु जविण्याची गरज असून शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. नेत्यांनी सत्तेत आल्यावर जनतेला विसरता कामा नये, जनतेचा पैसा खाऊ नये, न्याय देताना अन्याय करू नये अन्यथा तुमचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याला सन्मान द्या तो देशाची शान असल्याचे सांगितले.