शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
4
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
5
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
6
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
7
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
8
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
9
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
10
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
11
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
12
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
13
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
15
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
16
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
17
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
18
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
19
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
20
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान

गरजूंपर्यंत योजना पोहोचवा!

By admin | Updated: September 29, 2016 00:19 IST

तळागाळातील शोषित, पीडित, वंचितांना न्याय मिळवून देवून समाजात अंतिम घटकावरील व्यक्तीचा

विनोद अग्रवाल : पं. दीनदयाल उपाध्याय जयंती कार्यक्रमगोंदिया : तळागाळातील शोषित, पीडित, वंचितांना न्याय मिळवून देवून समाजात अंतिम घटकावरील व्यक्तीचा विकास करुन त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य पं.दिनदयाल यांच्या प्रेरणेने पक्ष करीत आहे. कार्यकर्त्यांनी समाजातील गरजूपर्यंत योजना पोहोचवून गरिबांचे अश्रू पुसण्याचे कार्य करावे, असे आवाहन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले. ते भाजपा जिल्हा कार्यालयात पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सोमवारी बोलत होते. शहर अध्यक्ष सुनील केलनका यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत प्रामुख्याने नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर, जि.प. सभापती छाया दसरे, न.प. गटनेता दिनेश दादरीवाल, संपर्क प्रमुख संजय कुळकर्णी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, भरत क्षत्रिय, दीपक कदम, जयंत शुक्ला, मनोहर आसवानी, महेश आहुजा, विनोद किराड, अशोक हरिणखेडे उपस्थित होते. सर्वप्रथम पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. अग्रवाल पुढे म्हणाले, एकात्म मानववाद व अंत्योदयचे प्रणेते पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या तत्व व आदर्शावर चालून भारतीय जनता पार्टी कार्य करीत आहे. पं. दिनदयाल उपाध्याय हे मोठे अर्थशास्त्री, समाजशास्त्री, साहित्यिक, वक्ता, लेखक व पत्रकार होते. ते एक महान विचारवंत व कुशल संघटक होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी दिले असून त्यांनी आपल्या विचाराने देशाला नवी दिशा दिली. हे वर्ष त्यांच्या शंभराव्या जयंतीचे वर्ष आहे.माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी एकात्म मानववाद व अंत्योदयाच्या सिद्धांतावर चालून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, अंत्योदय अन्न योजना, सर्व शिक्षा योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना व अनेक जनकल्याणकारी योजना सुरू करुन देश्विकासाला चालना दिली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना, मुद्रा योजना, आवास योजना, कौशल्य विकास योजना, उज्वला योजना, जीवनज्योती योजना, स्वच्छ भारत अभियान, दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना व अंत्योदय योजना यासारख्या अनेक योजनांतून समाजातील शेवटच्या घटकाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सर्वांगिण प्रगती साधण्याकरिता वेगाने वाटचाल सुरू झाली असल्याचे ते म्हणाले.नगराध्यक्ष जायस्वाल यांनी सांगितले की आज शासनाने सुरू केलेल्या योजनांमुळे निश्चितच सर्वसामान्यांना न्याय मिळू लागले आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी कार्य केले जात असल्याचेही ते बोलले. या वेळी तालुक्यातील लोहारा येथील ए.टी. मेश्राम यांनी पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी केले. याप्रसंगी छत्रपाल तुरकर, दिनेश दादरीवाल, भरत क्षत्रिय, संजय कुलकर्णी, जयंत शुक्ला यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन पंकज रहांगडाले यांनी केले. बैठकीस प्रामुख्याने शहर महामंत्री बाबा बिसेन, अशोक जयसिंघानिया, चंद्रभान तरोणे, धमेंद्र डोहरे, कुशल अग्रवाल, संजय मुरकुटे, अमित झा, पंकज सोनवाने, अहमद मणियार, अजित मेश्राम, मैथिली पुरोहित, धनंजय रिनायत, परसराम हुमे, रतन वासनिक, टिटूलाल लिल्हारे, एजाज शेख, अजय लौंगानी, सुभान रहांगडाले, राकेश लांजेवार, विनोद बन्सोडे, बबलू रहांगडाले, वजीर बिसेन, मिलिंद बागडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)