शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

शिधा वाटपात अनियमिततेचा आरोप

By admin | Updated: June 17, 2016 02:08 IST

येरंडी-देवी येथील शिधापत्रिका धारकांना धान्यवाटप करताना सावळागोंधळ करीत असल्याची तक्रार शिधाधारकांनी केली आहे.

अर्जुनी-मोरगाव : येरंडी-देवी येथील शिधापत्रिका धारकांना धान्यवाटप करताना सावळागोंधळ करीत असल्याची तक्रार शिधाधारकांनी केली आहे. तालुका प्रशासनाकडे तक्रार करूनही याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचा आरोपही शिधाधारकांनी केला आहे.प्राप्त माहितीनुसार, धनराज दोनोडे, सईबाई थेर, रामदास ब्राम्हणकर यांच्याकडे प्रत्यक्ष कमी लाभधारक असतानाही अधिकचे दर्शविण्यात आले. मात्र त्यांना प्रत्यक्षात कमी धान्य दिले जात असल्याने आरोप केला जात आहे. बोंडकू ब्राम्हणकर, तुकाराम रामटेके, मारुती रामटेके, मनोराम दोनोडे, देविदास हेमणे, इस्तारी तवाडे, महादेव तरोणे, सहादेव ब्राम्हणकर, पोवरा बहेकार, केवळराम दोनोडे तसेच अत्यंत गरीब असलेल्या शिधा धारकांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळत नाही. मृत शिधाधारकांचे धान्य हडप केले जाते. ग्रामपंचायतच्या ठरावांना न जुमानता मर्जितील सधन शेतकऱ्यांची नावे अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. केवळ १ ते २ दिवस अन्नधान्याचे वाटप केले जाते व उर्वरित धान्य हडप केले जाते. धान्य विक्रीची पावती दिली जात नाही. शासकीय दरापेक्षा अधिकचे पैसे घेतले जातात. फलकावर धान्याचे वितरण व दर लिहिले जात नाही. दारिद्र्यरेषेखालील लाभधारकांना कमी धान्य दिले जाते. दर महिन्याला ५५० ते ६०० लिटर केरोसिनचा पुरवठा होतो. मात्र परिपत्रकानुसार वाटप केले जात नाही. गहू, तांदूळ, साखरेचा पुरवठा होऊनही तुमचे धान्य आले नाही असे सांगून परत पाठविले जाते. यात लतेश बहेकार, जनार्धन दोनोडे, किशोर बोरकर, रामेश्वर लोगडे, हेमराज हेमणे, हिवराज कोरे, गोवर्धन बहेकार, उदाराम शिवणकर, शंकर लोगडे, जसवंता दोनोडे, नकटू मेंढे, पांडुरंग बहेकार, श्रीराम बहेकार, आसाराम मेंढे यांना धान्य मिळत नसल्याची तक्रार आहे. अंत्योदय अन्न योजनेसाठी विहीरगाव-बरड्या येथील ५ व येरंडी देवी येथील ६ लाभार्थ्यांची निवड करुन आमसभेत ठराव घेण्यात आला. ही यादी अंमलबजावणीसाठी ११ डिसेंबर २०१३ रोजी तहसील कार्यालयात पाठविण्यात आली. मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. अनेकदा तक्रार करुनही कुठलीच कारवाई केली जात नाही. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी बकाराम ब्राम्हणकर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)