शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

शिधा वाटपात अनियमिततेचा आरोप

By admin | Updated: June 17, 2016 02:08 IST

येरंडी-देवी येथील शिधापत्रिका धारकांना धान्यवाटप करताना सावळागोंधळ करीत असल्याची तक्रार शिधाधारकांनी केली आहे.

अर्जुनी-मोरगाव : येरंडी-देवी येथील शिधापत्रिका धारकांना धान्यवाटप करताना सावळागोंधळ करीत असल्याची तक्रार शिधाधारकांनी केली आहे. तालुका प्रशासनाकडे तक्रार करूनही याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचा आरोपही शिधाधारकांनी केला आहे.प्राप्त माहितीनुसार, धनराज दोनोडे, सईबाई थेर, रामदास ब्राम्हणकर यांच्याकडे प्रत्यक्ष कमी लाभधारक असतानाही अधिकचे दर्शविण्यात आले. मात्र त्यांना प्रत्यक्षात कमी धान्य दिले जात असल्याने आरोप केला जात आहे. बोंडकू ब्राम्हणकर, तुकाराम रामटेके, मारुती रामटेके, मनोराम दोनोडे, देविदास हेमणे, इस्तारी तवाडे, महादेव तरोणे, सहादेव ब्राम्हणकर, पोवरा बहेकार, केवळराम दोनोडे तसेच अत्यंत गरीब असलेल्या शिधा धारकांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळत नाही. मृत शिधाधारकांचे धान्य हडप केले जाते. ग्रामपंचायतच्या ठरावांना न जुमानता मर्जितील सधन शेतकऱ्यांची नावे अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. केवळ १ ते २ दिवस अन्नधान्याचे वाटप केले जाते व उर्वरित धान्य हडप केले जाते. धान्य विक्रीची पावती दिली जात नाही. शासकीय दरापेक्षा अधिकचे पैसे घेतले जातात. फलकावर धान्याचे वितरण व दर लिहिले जात नाही. दारिद्र्यरेषेखालील लाभधारकांना कमी धान्य दिले जाते. दर महिन्याला ५५० ते ६०० लिटर केरोसिनचा पुरवठा होतो. मात्र परिपत्रकानुसार वाटप केले जात नाही. गहू, तांदूळ, साखरेचा पुरवठा होऊनही तुमचे धान्य आले नाही असे सांगून परत पाठविले जाते. यात लतेश बहेकार, जनार्धन दोनोडे, किशोर बोरकर, रामेश्वर लोगडे, हेमराज हेमणे, हिवराज कोरे, गोवर्धन बहेकार, उदाराम शिवणकर, शंकर लोगडे, जसवंता दोनोडे, नकटू मेंढे, पांडुरंग बहेकार, श्रीराम बहेकार, आसाराम मेंढे यांना धान्य मिळत नसल्याची तक्रार आहे. अंत्योदय अन्न योजनेसाठी विहीरगाव-बरड्या येथील ५ व येरंडी देवी येथील ६ लाभार्थ्यांची निवड करुन आमसभेत ठराव घेण्यात आला. ही यादी अंमलबजावणीसाठी ११ डिसेंबर २०१३ रोजी तहसील कार्यालयात पाठविण्यात आली. मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. अनेकदा तक्रार करुनही कुठलीच कारवाई केली जात नाही. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी बकाराम ब्राम्हणकर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)