शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
3
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
4
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
5
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
6
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
9
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
10
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
11
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
12
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
15
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
18
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
19
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
20
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

योजनेच्या लाभाअभावी खचतेय बलात्कार पीडितांचे ‘मनोधैर्य’

By admin | Updated: April 9, 2016 02:01 IST

बलात्कारपीडित महिला, बाल लैंगिक अत्याचार व अ‍ॅसीड हल्लापीडित महिला व तरूणींना बसलेल्या जबर धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी ...

मंजूर २० पीडितांना लाभच नाही३५ पीडितांना मदतीची प्रतीक्षामहिला व बालकल्याण विभागाकडून ४० लाखांचा निधीनरेश रहिले गोंदियाबलात्कारपीडित महिला, बाल लैंगिक अत्याचार व अ‍ॅसीड हल्लापीडित महिला व तरूणींना बसलेल्या जबर धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी महिला व बालकल्याण विभागातर्फे ‘मनोधैर्य योजना’ राबविली जात आहे. मात्र या योजनेची माहिती अनेकांना नाही. ज्यांना या योजनेची माहिती आहे त्यांनी अर्ज केले. परंतु अर्ज करणाऱ्यांपैकी १९ पीडीतांना या योजनेचा लाभच देण्यात आलेला नाही. २ आॅक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१६ अखेरपर्यंत जिल्ह्याच्या १६ पैकी ५ पोलीस ठाण्यातील पाच बलात्कार पीडीतांचे या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्ज आले आहेत. यातील चार प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. या चारपैकी ३ पीडीतांना मदत देण्यात आली. त्याचबरोबर बाल लैंगिक अत्याचाराची ६० प्रकरणे महिला बाल विकास विभागाकडे आली. त्यातील ४४ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. मात्र २५ पीडीतांनाच मदत देण्यात आली. मंजूर असलेल्या प्रस्तावांपैकी बलात्काराच्या एक व बाल लैंगिक अत्याचाराच्या १९ अशा २० प्रकरणातील पीडीतांना लाभ देण्यात आला नाही. ही योजना सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत महिलांचे पाच प्रकरण तर बाल लैंगिक अत्याचाराचे ६० प्रकरण समोर आले, परंतु ३५ प्रकरणांतील पीडीतांना मदत मिळाली नाही. बलात्कारपीडित महिला, बाल लैंगिक अत्याचारग्रस्त महिलांना बसलेल्या जबर धक्क्यातून सावरण्यासाठी ही योजना शासनाने २ आॅक्टोबर २०१३ ला सुरू करण्यात आली आहे. बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात मनोधैर्य योजनेंतर्गत पीडीतांना दोन ते तीन लाख रूपये देण्यात येतात. अ‍ॅसीड हल्ल्यात चेहरा कुरूप झाल्यावर तीन लाख आणि जखमी झाल्यास ५० हजार रूपये देण्यात येतात. पीडीतांच्या मदतीसाठी असलेल्या या योजनेच्या समितीवर जिल्हाधिकारी अध्यक्ष तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सदस्य म्हणून पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सरकारी वकील, महिला व तांत्रिक क्षेत्रात काम करणारे विशेषतज्ज्ञ अशा सहा लोकांचा समावेश आहे. एफआयआर झाल्यानंतर पोलीस एक तासानंतर जिल्हाधिकाऱ्यांना एसएमएस किंवा ईमेल द्वारे माहिती देतात. समिती सात दिवसात बैठक घेऊन १५ दिवसात पिडीतेला मदत दिली जाते. बलात्कार प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यावर ५० टक्के रक्कम व आरोपपत्र दाखल झाल्यावर ५० टक्के निधी देण्यात येतो. पीडीतेला त्या धक्क्यातून सावरण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात येते. पीडीतेच्या कुटुंबीयांना भेटून त्यांना मानसिक आधार देण्याचे काम करीत समुपदेशन करण्यात येते.