शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रामपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ५ दिवसापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST

बाराभाटी : रामपुरी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पंप नादुरुस्त झाल्याने ही योजना मागील ५ दिवसांपासून बंद पडून आहे. सुमारे ...

बाराभाटी : रामपुरी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पंप नादुरुस्त झाल्याने ही योजना मागील ५ दिवसांपासून बंद पडून आहे. सुमारे ७ गावांना पाणीपुरवठा करणारी ही योजना बंद पडल्याने गावकऱ्यांना दूरवर शेतातून पाणी आणण्याची वेळ आली आहे. पंपाची लवकर दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी नियमित व भरपूर मिळावे या उद्देशातून माजी खासदार महादेवराव शिवणकर यांनी रामपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना स्थापन केली होती. या योजनेअंतर्गत गोठणगाव तलावातील पाण्याची उचल करून एरंडी दर्रे गावात फिल्टरद्वारे स्वच्छ करून ते रामपुरी, येलोडी, जांभळी, धाबेटेकडी, धाबेपवनी, जबरखेडा, एरंडी दर्रे या गावांना नियमित पुरविले जाते. परंतु मागील काही काळात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे ही योजना महिन्यातून ५ दिवस चालू व २५ दिवस बंद राहण्याचे दिवस आले आहेत.

नेमक्या होळीच्या सणातच या योजनेच्या मोटार जळाल्या म्हणून मागील ५ दिवसांपासून ही योजना बंद आहे. पाणीपुरवठा बंद असल्यामुळे समाविष्ट सर्व गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. या योजनेत समाविष्ट गाव धाबेटेकडी येथील शेतातून नागरिकांना पाणी आणावे लागत होते. ही समस्या गावातील सामाजिक कार्यकर्ते संदीप राहिले यांनी यशवंत गणवीर यांना सांगितले असता त्यांनी ताबडतोब आपल्या खर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला.

ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने नागरिकांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे व ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग अभियंता गुटखे यांच्याप्रति चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही पाणीपुरवठा योजनेला एक पंप सुरू असूनही एक पंप जास्तीचा लावलेला असतो. परंतु येथील दोन्ही पंप बंद पडूनसुद्धा प्रशासन झोपेत आहे. त्यामुळे या आदिवासी परिसरातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

--------------------------

त्वरित पाणीपुरवठा सुरू करा

उन्हाळा आता आपल्या रंगात येत असून आता खाण्यापेक्षा पाण्याची जास्त गरज भासत आहे. अशातच योजना बंद पडल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. यामुळे नागरिक चांगलेच नाराज आहेत. पंपांची त्वरित दुरुस्ती करून योजना लवकरात लवकर सुरू करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.