शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

रामपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ५ दिवसापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST

बाराभाटी : रामपुरी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पंप नादुरुस्त झाल्याने ही योजना मागील ५ दिवसांपासून बंद पडून आहे. सुमारे ...

बाराभाटी : रामपुरी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पंप नादुरुस्त झाल्याने ही योजना मागील ५ दिवसांपासून बंद पडून आहे. सुमारे ७ गावांना पाणीपुरवठा करणारी ही योजना बंद पडल्याने गावकऱ्यांना दूरवर शेतातून पाणी आणण्याची वेळ आली आहे. पंपाची लवकर दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी नियमित व भरपूर मिळावे या उद्देशातून माजी खासदार महादेवराव शिवणकर यांनी रामपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना स्थापन केली होती. या योजनेअंतर्गत गोठणगाव तलावातील पाण्याची उचल करून एरंडी दर्रे गावात फिल्टरद्वारे स्वच्छ करून ते रामपुरी, येलोडी, जांभळी, धाबेटेकडी, धाबेपवनी, जबरखेडा, एरंडी दर्रे या गावांना नियमित पुरविले जाते. परंतु मागील काही काळात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे ही योजना महिन्यातून ५ दिवस चालू व २५ दिवस बंद राहण्याचे दिवस आले आहेत.

नेमक्या होळीच्या सणातच या योजनेच्या मोटार जळाल्या म्हणून मागील ५ दिवसांपासून ही योजना बंद आहे. पाणीपुरवठा बंद असल्यामुळे समाविष्ट सर्व गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. या योजनेत समाविष्ट गाव धाबेटेकडी येथील शेतातून नागरिकांना पाणी आणावे लागत होते. ही समस्या गावातील सामाजिक कार्यकर्ते संदीप राहिले यांनी यशवंत गणवीर यांना सांगितले असता त्यांनी ताबडतोब आपल्या खर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला.

ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने नागरिकांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे व ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग अभियंता गुटखे यांच्याप्रति चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही पाणीपुरवठा योजनेला एक पंप सुरू असूनही एक पंप जास्तीचा लावलेला असतो. परंतु येथील दोन्ही पंप बंद पडूनसुद्धा प्रशासन झोपेत आहे. त्यामुळे या आदिवासी परिसरातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

--------------------------

त्वरित पाणीपुरवठा सुरू करा

उन्हाळा आता आपल्या रंगात येत असून आता खाण्यापेक्षा पाण्याची जास्त गरज भासत आहे. अशातच योजना बंद पडल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. यामुळे नागरिक चांगलेच नाराज आहेत. पंपांची त्वरित दुरुस्ती करून योजना लवकरात लवकर सुरू करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.