शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

गोवारी समाजबांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:50 IST

उच्च न्यायालयाने गोवारी हे आदिवासीच असल्याचा निर्वाळा दिला आहे. मात्र शासन न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करून गोवारी समाजाला न्याय द्यावा.

ठळक मुद्देन्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा : अन्यथा तीव्र आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उच्च न्यायालयाने गोवारी हे आदिवासीच असल्याचा निर्वाळा दिला आहे. मात्र शासन न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करून गोवारी समाजाला न्याय द्यावा. या मागणीसाठी गोवारी समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी (दि.१९) मोर्चा काढला.येथील फुलचूर नाका चौकातून मोर्चाला सुरूवात झाली. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात जिल्हाभरातील गोवारी समाजबांधव सहभागी झाले होते. शासन न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करीत असल्याने मोर्चात सहभागी समाजबांधवांनी या वेळी रोष व्यक्त केला. १९५६ पासून गोवारी समाज अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट आहे.गोवारी जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवता येणार नाही. असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने १४ आॅगस्टला दिला. आदिवासी गोवारी जमातीचा प्रश्न मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक संस्था, संघटनांनी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र शासन गोवारी समाजाला न्याय देण्यास टाळाटाळ करीत आहे. शासनाने न्यायालयाच्या निर्णयाची अंबलबजावणी त्वरीत अंमलबजावणी करावी व गोवारी जमातीला न्याय द्यावा म्हणून हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर मोर्चाचे रुपातंर सभेत झाले. या वेळी सभेला पदाधिकारी मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले. शिष्टमंडळात टेकचंद चौधरी, ज्ञानेश्वर राऊत, गुलाब नेवारे, मोहन सहारे, प्रमिला सोनवाने, शंकर खेकरे यांचा समावेश होता.

टॅग्स :Morchaमोर्चा