शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

जातीधर्माच्या वर उठून आत्मिक भाव ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 00:58 IST

ईश्वराने आता कलयुगाच्या शेवटी पृथ्वीवर अवतरित होवून राजयोगाची शिक्षेने सर्वांना पावन करीत आहे.

बी.के. रूख्मिणी : गोंदियात बह्मकुमारींचे सर्वधर्म संमेलन उत्साहातगोंदिया : ईश्वराने आता कलयुगाच्या शेवटी पृथ्वीवर अवतरित होवून राजयोगाची शिक्षेने सर्वांना पावन करीत आहे. शस्त्रांच्या सांगण्यानुसार सतयुगात एक धर्म एक भाषा एक राज्य होते, तेच पुन्हा होत आहे. आपण सर्वांनी मिळून एक होवून त्या निराकार ज्योतिस्वरूपाचे ज्ञान धारण करून आता भारताला पुन्हा स्वर्ग बनवायचे आहे. धर्म जातीच्या वर उठून आत्मिक भाव ठेवण्याचे व मिळून प्रेम, एकता, सद्भावना समाजात पसरवावे, असे राजयोगिणी बी.के. रूख्मिणी म्हणाल्या. विश्व शांती व धार्मिक एकतेसाठी ब्रह्मकुमारीजद्वारे सर्वधर्म संमेलन पवार सांस्कृतिक भवन कन्हारटोली येथे पार पडले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होत्या. उद्घाटन नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून सर्व नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.यात सर्व धर्मांचे प्रतिनिधी सहभागी झाले. यात मौलाना शब्बीर अहमद अशरफी, फादर एच. हॅरी, ज्ञानी किरणपालसिंह, गायत्री परिवाराचे गोविंद येडे, विनोद जैन, बौद्धाचार्य एन.एल. मेश्राम उपस्थित होते. तसेच बह्मकुमारीजकडून राजयोगी बी.के. नारायणभाई, राजयोगिनी बी.के. रूख्मिनी दीदी, राजयोगिनी बी.के. रत्नमाला दीदी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात राजयोगी बी.के. नारायणभाई म्हणाले, संबंधात संतुलन व उत्कृष्टता यांचा आधार मनुष्यास आत्मासह परमात्माबरोबर मनबुद्धीने स्रेहयुक्त संबंधाचा संयोग, यालाचा राजयोग म्हणतात. राजयोगाच्या नियमित अभ्यासाने आपले चिंतन, चरित्र, संस्कार व आचरण पवित्र, सभ्य, श्रेष्ठ व दैवी बनतो. शिवाय सकारात्मक परिवर्तनाच्या आधारावर सर्व समाज, पर्यावरण, प्रकृती, संस्कृती व सत्यतासुद्धा दैवी, सतोगुणी, सुखदाई व सतयुगी बनते, असे सांगितले.ईश्वराचा मार्ग शांती, सद्भावना, एकता, प्रेम या तत्वांनी राहण्यातच आहे. हेच सर्व धर्मांचे सार आहे व राजयोगामुळे आपण सहजतेने ईश्वरासी संबंध जोडू शकतो. कार्यक्रमात सर्व धर्म स्थापकांना एका झाकीच्या माध्यमातून दाखविण्यात आले. सर्वांनी एकासोबत नृत्य करून सर्वांना भावविभोर करून सोडले. शेवटी नारायण भाई यांनी आपसी मेलमिलाप ठेवण्याची प्रतिज्ञा वदवून घेतली. संचालन बी.के. विनोद हरिणखेडे, त्रिरत्न बग्गा, शर्मिला पाल यांनी केले. आभार बी.के. वीणा यांनी मानले. (प्रतिनिधी)