शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

पावसाने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:07 IST

शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरात तसेच जवळपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देग्राहकांची फजिती : शनिवारी दुपारी मुसळधार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरात तसेच जवळपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले.शनिवारी सकाळपासून ऊन निघाली होती. त्यामुळे पाऊस येणार नाही, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र दुपारी २ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. जवळपास एक तास पाऊस पडला. दिवाळीनिमित्त शहरातील दुकानांमध्ये गर्दी असल्याने काही सामान दुकानदारांनी बाहेर ठेवला होता. अचानक आलेल्या पावसामुळे दुकानदारांची चांगलीच धांदल उडाली. जवळपास १ तास पावसाने झोडपले. नाल्या ओव्हरफ्लो होऊन पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना पावसाच्या पाण्यातूनच वाट काढावी लागत होती.भाऊबिजेचा सण असल्याने अनेक महिला भावाच्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. गडचिरोली शहरातील बसस्थानकासह बसथांब्यावर महिला प्रवाशांची मोठी गर्दी दिसत होती. दुपारपर्यंत ऊन असल्याने पावसापासून सुरक्षितता मिळविण्यासाठी कोणतेही साहित्य सोबत घेतले नव्हते. अचानक झालेल्या पावसामुळे महिला प्रवाशांचीही चांगलीच फजिती झाली. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही दमदार पाऊस झाला. भामरागड तालुक्यातही जोरदार पाऊस पडला.जड धान निसवत आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतातील धानाला पाण्याची गरज होती. शनिवारच्या पावसाने ही गरज पूर्ण झाली. मात्र हलक्या धानाची कापणी सुरू असून परतीच्या पावसाचा मोठा फटका हलक्या धानाला बसला आहे.हलक्या धानासह मध्यम कालावधीच्या धानालाही फटकाआठ दिवस उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. मध्यंतरीच्या कालावधीत हलक्या धानाची कापणी करण्यात आली. आता मध्यम कालावधीच्या धानाची कापणी सुरू आहे. अशातच पावसाने आणखी जोर धरला आहे. कापलेल्या धानाच्या कळपांमध्ये पाणी शिरले असल्याने शेतकºयांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे जड धानावर मावा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जड धान निसवत असतानाच मावा, तुडतुडा लागल्याने धानाच्या उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हजारो रूपयांची कीटकनाशके फवारूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.