शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पावसाचे वाकुल्या दाखविणे सुरूच

By admin | Updated: August 4, 2015 01:26 IST

पावसाळा लागून दोन महिन्याचा काळ लोटला. परंतु तलाव २५ टक्केही भरले नाहीत. पावसाच्या प्रतीक्षेत ६० टक्के

गोंदिया : पावसाळा लागून दोन महिन्याचा काळ लोटला. परंतु तलाव २५ टक्केही भरले नाहीत. पावसाच्या प्रतीक्षेत ६० टक्के शेतकऱ्यांच्या रोवण्या खोळंबल्या असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. रविवारच्या दुपारपासून काही भागात पावसाने हजेरी लावली. मात्र हा पाऊस बऱ्यापैकी झाला तर अनेक ठिकाणी शिरवाही आला नाही. त्यामुळे पावसाच्या या वाकुल्या दाखविण्याने शेतकऱ्यांचा जीव कासाविस होत आहे.जून महिना दुष्काळी स्थितीत गेला. यानंतर जुलै महिन्याच्या सुरूवातीला पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी रोपवाटिकेच्या कार्य सुरू केले. परंतु नंतर पावसाने धोका दिला. जवळपास १०-१२ दिवस वातावरण कोरडे राहिले. त्यानंतर पुन्हा पाऊस आल्याने रोपवाटिकेला जीवदान मिळाले होते. परंतु नंतर पुन्हा वातावरण कोरडे झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले. जिल्ह्यात आतापर्यंत ४७ हेक्टरमध्ये रोपवाटिका व आवत्या घालण्यात आल्या. ग्रामीण भागातील मजूर व महिलांद्वारे धापपीक रोवण्याचे कार्य केले जाते. मात्र पाऊस बरसत नसल्यामुळे लोकांनी घरी बसूून रहावे लागत आहे.कृषी विभागानुसार, जिल्ह्यात १८ हजार ५८१ हेक्टरमध्ये रोपवाटिका लावण्यात आली आहे. तर ३४ हजार ६५२ हेक्टरमध्ये रोवणी करण्यात आली आहे. तसेच १२ हजार ९३५ हेक्टरमध्ये आवत्या घालण्यात आल्या आहेत. मागील पाच-सहा दिवसांनंतर रविवारी दुपारी अडीच वाजता अचानक आकाशात ढग जमा झाले. जोरदार मेघगर्जना झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दमदार पावसाची आशा होती. परंतु २ आॅगस्टच्या रात्री व ३ आॅगस्टच्या सकाळी रिमझिमच पाऊस पडला. तो सुद्धा काही भागातच झाला. आकाश अजूनही ढगाळलेलेच आहे. (प्रतिनिधी)पीक वाचविण्यासाठी प्रयत्नजिल्ह्यातील चार प्रमुख जलाशयांपैकी इटियाडोह १५.०३, सिरपूर येथे १६.२१, पूजारीटोला येथे ४०.९३ व कालीसरार येथे १५.३० टक्के पाणीसाठा आहे. इटियाडोहामधून एक हजार क्यूसेक पाणी २६ जुलैपासून सतत सिंचनासाठी सोडले जात आहे. सिरपूर जलाशयाचे पाणी पूजारीटोला जलाशयासाठी चार दिवसपर्यंत सोडण्यात आल्याची माहिती आहे. आठवडाभर पाऊस न आल्यास परिस्थिती गंभीरजिल्ह्यात आकाशात केवळ ढग पसरलेले दिसत आहेत व रिमझिम पाऊस पडत आहे. चांगल्या दमदार पावसाची शेतकऱ्यांना गरज आहे. आठवडाभरात दमदार पाऊस न आल्यास जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाग बियाणे खरेदी करून रोपवाटिका घालणारे व रोवणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर सद्यस्थितीत आर्थिक संकट ओढवण्याचे वातावरण दिसू लागले आहेत.