शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

पावसाचे वाकुल्या दाखविणे सुरूच

By admin | Updated: August 4, 2015 01:26 IST

पावसाळा लागून दोन महिन्याचा काळ लोटला. परंतु तलाव २५ टक्केही भरले नाहीत. पावसाच्या प्रतीक्षेत ६० टक्के

गोंदिया : पावसाळा लागून दोन महिन्याचा काळ लोटला. परंतु तलाव २५ टक्केही भरले नाहीत. पावसाच्या प्रतीक्षेत ६० टक्के शेतकऱ्यांच्या रोवण्या खोळंबल्या असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. रविवारच्या दुपारपासून काही भागात पावसाने हजेरी लावली. मात्र हा पाऊस बऱ्यापैकी झाला तर अनेक ठिकाणी शिरवाही आला नाही. त्यामुळे पावसाच्या या वाकुल्या दाखविण्याने शेतकऱ्यांचा जीव कासाविस होत आहे.जून महिना दुष्काळी स्थितीत गेला. यानंतर जुलै महिन्याच्या सुरूवातीला पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी रोपवाटिकेच्या कार्य सुरू केले. परंतु नंतर पावसाने धोका दिला. जवळपास १०-१२ दिवस वातावरण कोरडे राहिले. त्यानंतर पुन्हा पाऊस आल्याने रोपवाटिकेला जीवदान मिळाले होते. परंतु नंतर पुन्हा वातावरण कोरडे झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले. जिल्ह्यात आतापर्यंत ४७ हेक्टरमध्ये रोपवाटिका व आवत्या घालण्यात आल्या. ग्रामीण भागातील मजूर व महिलांद्वारे धापपीक रोवण्याचे कार्य केले जाते. मात्र पाऊस बरसत नसल्यामुळे लोकांनी घरी बसूून रहावे लागत आहे.कृषी विभागानुसार, जिल्ह्यात १८ हजार ५८१ हेक्टरमध्ये रोपवाटिका लावण्यात आली आहे. तर ३४ हजार ६५२ हेक्टरमध्ये रोवणी करण्यात आली आहे. तसेच १२ हजार ९३५ हेक्टरमध्ये आवत्या घालण्यात आल्या आहेत. मागील पाच-सहा दिवसांनंतर रविवारी दुपारी अडीच वाजता अचानक आकाशात ढग जमा झाले. जोरदार मेघगर्जना झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दमदार पावसाची आशा होती. परंतु २ आॅगस्टच्या रात्री व ३ आॅगस्टच्या सकाळी रिमझिमच पाऊस पडला. तो सुद्धा काही भागातच झाला. आकाश अजूनही ढगाळलेलेच आहे. (प्रतिनिधी)पीक वाचविण्यासाठी प्रयत्नजिल्ह्यातील चार प्रमुख जलाशयांपैकी इटियाडोह १५.०३, सिरपूर येथे १६.२१, पूजारीटोला येथे ४०.९३ व कालीसरार येथे १५.३० टक्के पाणीसाठा आहे. इटियाडोहामधून एक हजार क्यूसेक पाणी २६ जुलैपासून सतत सिंचनासाठी सोडले जात आहे. सिरपूर जलाशयाचे पाणी पूजारीटोला जलाशयासाठी चार दिवसपर्यंत सोडण्यात आल्याची माहिती आहे. आठवडाभर पाऊस न आल्यास परिस्थिती गंभीरजिल्ह्यात आकाशात केवळ ढग पसरलेले दिसत आहेत व रिमझिम पाऊस पडत आहे. चांगल्या दमदार पावसाची शेतकऱ्यांना गरज आहे. आठवडाभरात दमदार पाऊस न आल्यास जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाग बियाणे खरेदी करून रोपवाटिका घालणारे व रोवणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर सद्यस्थितीत आर्थिक संकट ओढवण्याचे वातावरण दिसू लागले आहेत.