शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पर्जन्यमानात गोंदिया जिल्हा ‘रेड झोन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:29 IST

गोंदिया : विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असली तरी जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. पावसाचा मुख्य ...

गोंदिया : विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असली तरी जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. पावसाचा मुख्य कालावधीत निघून जात असला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने पर्जन्यमानात गोंदिया जिल्ह्याचा रेडझाेनमध्ये समावेश झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्यास खरिप पिकांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विदर्भात दमदार पाऊस पडत असला तरी, अनेक जिल्ह्यांमधील पावसाची स्थिती चिंताजनक आहे. विदर्भातील अकरापैकी तब्बल सात जिल्ह्यांमध्ये पावसाने अद्याप सरासरी गाठली नाही तर चार जिल्हे रेडझोनमध्ये आहेत. सप्टेंबर महिन्यात पुरेसा पाऊस न आल्यास खरिपासोबतच रब्बी पिकांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदा हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, आतापर्यंत वरुणराजाने निराशाच केली आहे. जिल्ह्यात १ जून ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १२२० मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत २ सप्टेंबरपर्यंत ८०६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारी ६६.११ टक्के आहे. १ जून ते २ सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसापेक्षा आतापर्यंत २५ टक्के पाऊस कमी पडला आहे तर या महिन्यात दमदार पाऊस न झाल्यास बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भात गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा आणि अमरावती हे चार जिल्हे सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने रेडझोनमध्ये गेले आहे.

..................

१ लाख ८१ हजार हेक्टरमधील पिकांवर संकट

गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरिप हंगामात एकूण १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. धान पिकाला भरपूर पाणी लागते. मात्र, यंदा सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने धानपीक संकटात आले आहे. पावसाअभावी उष्ण दमट वातावरणामुळे धानपिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे तर पावसाने पुन्हा ओढ दिल्यास २५ ते ३० टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.

............

सिंचन प्रकल्पात अपुरा साठा

सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली तरी यंदा अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. मोठ्या सिंचन प्रकल्पात ३५ टक्के तर मध्यम आणि लघू सिंचन प्रकल्पात १८ टक्के पाणीसाठा आहे तर काही धरणांमध्ये राखीव पाणीसाठ्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

...............