शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पर्जन्यमानात गोंदिया जिल्हा ‘रेड झोन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:29 IST

गोंदिया : विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असली तरी जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. पावसाचा मुख्य ...

गोंदिया : विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असली तरी जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. पावसाचा मुख्य कालावधीत निघून जात असला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने पर्जन्यमानात गोंदिया जिल्ह्याचा रेडझाेनमध्ये समावेश झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्यास खरिप पिकांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विदर्भात दमदार पाऊस पडत असला तरी, अनेक जिल्ह्यांमधील पावसाची स्थिती चिंताजनक आहे. विदर्भातील अकरापैकी तब्बल सात जिल्ह्यांमध्ये पावसाने अद्याप सरासरी गाठली नाही तर चार जिल्हे रेडझोनमध्ये आहेत. सप्टेंबर महिन्यात पुरेसा पाऊस न आल्यास खरिपासोबतच रब्बी पिकांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदा हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, आतापर्यंत वरुणराजाने निराशाच केली आहे. जिल्ह्यात १ जून ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १२२० मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत २ सप्टेंबरपर्यंत ८०६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारी ६६.११ टक्के आहे. १ जून ते २ सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसापेक्षा आतापर्यंत २५ टक्के पाऊस कमी पडला आहे तर या महिन्यात दमदार पाऊस न झाल्यास बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भात गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा आणि अमरावती हे चार जिल्हे सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने रेडझोनमध्ये गेले आहे.

..................

१ लाख ८१ हजार हेक्टरमधील पिकांवर संकट

गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरिप हंगामात एकूण १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. धान पिकाला भरपूर पाणी लागते. मात्र, यंदा सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने धानपीक संकटात आले आहे. पावसाअभावी उष्ण दमट वातावरणामुळे धानपिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे तर पावसाने पुन्हा ओढ दिल्यास २५ ते ३० टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.

............

सिंचन प्रकल्पात अपुरा साठा

सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली तरी यंदा अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. मोठ्या सिंचन प्रकल्पात ३५ टक्के तर मध्यम आणि लघू सिंचन प्रकल्पात १८ टक्के पाणीसाठा आहे तर काही धरणांमध्ये राखीव पाणीसाठ्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

...............