शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पाच महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 06:00 IST

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका गोरेगाव तालुक्याला बसला असून या तालुक्यात ११८ घरे आणि २७ गोठ्यांची पडझड झाली. धानपिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुजारीटोला ४ चे तर कालीसरार धरणाचे २ दरवाजे रविवारी सकाळी उघडण्यात आले. मागील सात आठ दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली.

ठळक मुद्देपुजारीटोला, कालीसरार धरणाचे दरवाजे उघडले : गोरेगाव तालुक्यात ११८ घरांची पडझड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात शनिवारी दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने तीन तालुक्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका गोरेगाव तालुक्याला बसला असून या तालुक्यात ११८ घरे आणि २७ गोठ्यांची पडझड झाली. धानपिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुजारीटोला ४ चे तर कालीसरार धरणाचे २ दरवाजे रविवारी सकाळी उघडण्यात आले.मागील सात आठ दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. आमगाव, गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यातील काही गावांना पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले. त्यामुळे या तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून मागील चौवीस तासात १०५९.मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव ११४ मि.मी, कुºहाडी महसूल मंडळात ८३.२० मि.मी.पावसाची नोंद झाली. तर आमगाव तालुक्यातील आमगाव ७८.८० आणि ठाणा महसूल मंडळात ९०.३० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तिरोडा तालुक्यातील एकमेव वडेगाव महसूल मंडळात ६८.८० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद गोरेगाव तालुक्यात झाली असून पावसामुळे ११८ घरे आणि २७ गोठ्यांची पडझड झाली आहे.पावसामुळे धानपिक झोपल्याने पिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे या तालुक्यावर ओला दुष्काळासारखी स्थिती आहे.रविवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे पिकांच्या नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे धान पिकांवरील किडरोगांमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रविवारी सकाळी पुजारीटोला धरणाचे ४ तर कालीसरार धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.त्यामुळे वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठालगतच्या गावातील नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.धानपिकाला सर्वाधिक फटकासध्या धान पिक भरण्याच्या स्थितीत असून आता पावसाची गरज आहे. मात्र शनिवारी झालेल्या जोरदार पावसाचा फटका धानपिकाला बसला. पाऊस आणि वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात धान बांध्यामध्ये झोपून गेले. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

अनेक भागाचा विद्युत पुरवठा खंडीतशनिवारी दुपारपासून पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे गोंदिया शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा रात्रभर खंडीत होता. त्यामुळे अनेकांना मच्छरांच्या सानिध्यात रात्र जागून काढावी लागली. तर शहरातील काही भागात झाडांची सुध्दा पडझड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे.

नुकसानीचे सर्वेक्षण सुरूअतिवृष्टीमुळे आमगाव, तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यात घरे आणि गोठ्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. तर पिकांचे सुध्दा नुकसान झाले.जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार महसूल आणि कृषी विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली आहे.

टॅग्स :agricultureशेती