शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाऊस परतला, रिमझीम सुरू

By admin | Updated: June 28, 2014 23:37 IST

मागील आठवड्याभरापासून दडी मारून बसलेला पाऊस शनिवारच्या रात्री परतून आला आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी सुद्धा सुखावल्याचे दिसून येत आहे.

गोंदिया : मागील आठवड्याभरापासून दडी मारून बसलेला पाऊस शनिवारच्या रात्री परतून आला आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी सुद्धा सुखावल्याचे दिसून येत आहे. दिवस कडक उन्हात निघाल्यानंतर रात्री अचानकच पावसाच्या सरी बरसल्या. जिल्ह्यात ५०.४ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून यात सालेकसा तालुक्यात सर्वाधीक २६.२ मिमी. पाऊस बरसल्याची नोंद आहे. २० जून रोजी छप्पर फाडके बरसलेल्या पावसाने चांगलीच दडी मारली होती. यंदाच्या पावसाळ््यातील खरा पाऊस शुक्रवारीच बरसल्याचे चित्र असून तशी नोंदही आहे. यास आठवडा होत असून त्यानंतर पावसाने मात्र दडी मारली. त्यामुळे पाऊस बरसणार कधी याची प्रत्येकच वाट बघत होता. पाऊस दडी मारून बसल्याने उष्णतेची लाट परतून आली होती. कडक उन्हामुळे उन्हाळा पुन्हा सुरू झाल्याचे चित्र बघावयास मिळत होते. अशात दिवसभराच्या कडक उन्हानंतर शनिवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. तर या पावसाची दिवसाही रिप-रिप सुरूच होती. अचानकच आलेल्या या पावसाने मात्र वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला व त्यामुळे नागरीक सुखावले. जिल्ह्यात बरसलेल्या या पावसाची आकडेवारी बघितल्यास, गोंदिया तालुक्यात ३.८ मिमी., गोरेगाव व तिरोडा निरंक, अर्जुनी मोरगाव तालुक्यात २.८ मिमी., देवरी तालुक्यात ६ मिमी., आमगाव तालुक्यात ५.४ मिमी., सडक अर्जुनी तालुक्यात ६.२ मिमी. तर सालेकसा तालुक्यात २६.२ मिमी. अशी एकूण ५०.४ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. तर शनिवारच्या या पावसाला धरून आतापर्यंत ७८६.८ मिमी. पाऊस बरसल्याची नोंद आहे. (शहर प्रतिनिधी)