शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पाऊस तळ ठोकून

By admin | Updated: June 22, 2015 00:35 IST

मागील आठ दिवसांपासून पाऊस जिल्ह्यात तळ ठोकून बसला आहे.

शनिवारपासून संततधार : शेतीच्या कामांना आला वेग गोंदिया : मागील आठ दिवसांपासून पाऊस जिल्ह्यात तळ ठोकून बसला आहे. त्यात शनिवारपासून (दि.२०) संततधार बरसत असलेल्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. संततधार पावसामुळे शेतीची कामे जोरात सुरू आहेत. रविवारी (दि.२१) सकाळपर्यंत आमगाव तालुक्यातील तिगाव मंडळात अतिवृष्टीची माहिती आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात ३५३२.२ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. मृगाची सुरूवात कोरडी झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. पाऊस दडी मारणार या भितीने शेतकऱ्यांच्या माथ्यावर चिंतेचे सावट दिसून येत होते. यामुळेच शेतीची कामे बंद पडली होती. मात्र मागील रविवारपासून (दि.१४) पाऊस जिल्ह्यात तळ ठोकून बसला आहे. दिवसभर उघाड राहिल्यानंतर दररोज सायंकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने सर्वच सुखावले आहे. पावसाचे हे सुखावह आगमन होत असल्याने शेतकऱ्यांनी कंबर कसून शेतीच्या कामांत हात घातला आहे. मात्र शनिवारच्या (दि.२०) दुपारपासून संततधार पावसाने हजेरी लावली असून अवघ्या जिल्ह्याला झोडपून काढले आहे. प्राप्त माहितीनुसार, १ ते २१ जून पर्यंत जिल्ह्यात ३५३२.२ मीमी. पाऊस पडला आहे. त्याची सरासरी १७ मीमी. आहे. विशेष म्हणजे आमगाव तालुक्यातील तिगाव मंडळात सर्वाधिक ७६.८ मीमी. एवढी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या संततधार पावसामुळे शेतकरी शेतीच्या कामाला लागला असतानाच मात्र सर्वसामान्यांची कामे अडकल्याचेही दिसून आले. पावसामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता व नागरिकांना घराबाहेर पडणे कठिण झाले. शहरातील झोपडी मोहल्यात तर मोठ्याप्रमाणात पाणी शिरल्याचेही दिसून आले. (शहर प्रतिनिधी)प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांत पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, इटियाडोह प्रकल्पात ९०.४ दलघमी म्हणजेच ८.३० टक्के जलसाठा, सिरपूर प्रकल्पात २१.२२ दलघमी म्हणजेच ६.२० टक्के जलसाठा, पूजारीटोला प्रकल्पात ६.५२ दलघमी व कालीसराड प्रकल्पात १.०६ दलघमी जलसाठा आहे.