शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
4
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
5
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
6
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
7
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
8
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
9
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
10
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
11
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
12
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
13
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
14
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
15
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
16
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
17
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
18
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
19
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
20
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?

पावसामुळे अनेक घरे बाधित

By admin | Updated: July 28, 2014 23:37 IST

शेतकऱ्यांचे नुकसान केल्यानंतर पावासाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा काहिसा सुखावला. मात्र गावातील गोरगरीब संकटात सापडले. वादळी पावसामुळे परिसरातील १० गावांत शेकडो घरे अंशत:

काचेवानी : शेतकऱ्यांचे नुकसान केल्यानंतर पावासाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा काहिसा सुखावला. मात्र गावातील गोरगरीब संकटात सापडले. वादळी पावसामुळे परिसरातील १० गावांत शेकडो घरे अंशत: व पूर्णत: पडली. मात्र पडझड झालेल्या घरांच्या सर्वेक्षणात महसूल विभागात उदासीनता दिसून येत आहे.तीन-चार दिवसांच्या वादळासह येणाऱ्या पावसामुळे माती व विटांचे असलेली कच्ची घरे आणि त्यात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांची शुद्धच हरपली होती. पावसामुळे कच्च्या घरांच्या भिंती ओल्या झाल्या. त्या भिंती जोरदार येणाऱ्या वादळामुळे टिकाव धरू शकल्या नाहीत. संततधार पावसामुळे परिसरातील दहा गावांत शेकडो घरांची पडझळ झाल्याची माहिती गावातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.जवळच्या बेरडीपार येथील राधेश्याम ठाकरे, पांडूरंग बिसेन, सायत्रा राऊत, उंदिरवाडे, अरुण राऊत, धनराज पटले, सिदुलाल कोल्हटकर यांच्यासह १५ ते २० जणांची घरे पूर्र्णत: आणि अंशत: पडलेले आहेत. जवळच्या बरबसपुरा येथे दवन कटरे, रमेश बिसेन, यांच्यासह दहा ते बारा घरांची पडझळ झालेली आहे. काचेवानी हद्दितील अनुसया मोटघरे यांच्यासह ५ ते ७ घरांची पडझळ झालेली आहे. डब्बेटोला, गुमाधावडा व लगतच्या अनेक गावांत घरांची पडझड झाली असून ५० पेक्षा अधिक घरे जमीनदोस्त झाली आहेत. पूर्णत: तसेच अंशत: पडझड झालेल्या घरात कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत मिळाले नाही. मात्र परिसराच्या तलाठ्यांकडून माहिती काढली असता गावातील पडझळ झालेल्या घरांची निश्चित संख्या सांगण्यात आली नव्हती. अर्थात पडझड झालेल्या नागरिकांंकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. या विभागाने सर्व कामे बाजूला सारुन पडलेल्या घरांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईबाबत प्रस्ताव तयार करुन सहानुभूती दर्शविणे अपेक्षित होते. मात्र असे करण्यात आले नसल्याने गरिबांचे कोणीही नाही, असा आरोप अनेक पीडितांनी केला आहे. घरांची पडझड झाल्याच्या कारणासंबंधी विचारले असता यावर्षी आलेला पाऊस वादळवाऱ्यासह आल्याने पावसाच्या धारांचे संतुलन बिघडले आणि त्या भिंतीवर पडू लागल्या. त्यामुळे भिंती पावसाच्या पाण्याने भिजल्या व कमजोर होवून पडल्या, असे नागरिकांनी लोकमतजवळ सांगितले आहे. (वार्ताहर)