शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे अनेक घरे बाधित

By admin | Updated: July 28, 2014 23:37 IST

शेतकऱ्यांचे नुकसान केल्यानंतर पावासाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा काहिसा सुखावला. मात्र गावातील गोरगरीब संकटात सापडले. वादळी पावसामुळे परिसरातील १० गावांत शेकडो घरे अंशत:

काचेवानी : शेतकऱ्यांचे नुकसान केल्यानंतर पावासाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा काहिसा सुखावला. मात्र गावातील गोरगरीब संकटात सापडले. वादळी पावसामुळे परिसरातील १० गावांत शेकडो घरे अंशत: व पूर्णत: पडली. मात्र पडझड झालेल्या घरांच्या सर्वेक्षणात महसूल विभागात उदासीनता दिसून येत आहे.तीन-चार दिवसांच्या वादळासह येणाऱ्या पावसामुळे माती व विटांचे असलेली कच्ची घरे आणि त्यात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांची शुद्धच हरपली होती. पावसामुळे कच्च्या घरांच्या भिंती ओल्या झाल्या. त्या भिंती जोरदार येणाऱ्या वादळामुळे टिकाव धरू शकल्या नाहीत. संततधार पावसामुळे परिसरातील दहा गावांत शेकडो घरांची पडझळ झाल्याची माहिती गावातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.जवळच्या बेरडीपार येथील राधेश्याम ठाकरे, पांडूरंग बिसेन, सायत्रा राऊत, उंदिरवाडे, अरुण राऊत, धनराज पटले, सिदुलाल कोल्हटकर यांच्यासह १५ ते २० जणांची घरे पूर्र्णत: आणि अंशत: पडलेले आहेत. जवळच्या बरबसपुरा येथे दवन कटरे, रमेश बिसेन, यांच्यासह दहा ते बारा घरांची पडझळ झालेली आहे. काचेवानी हद्दितील अनुसया मोटघरे यांच्यासह ५ ते ७ घरांची पडझळ झालेली आहे. डब्बेटोला, गुमाधावडा व लगतच्या अनेक गावांत घरांची पडझड झाली असून ५० पेक्षा अधिक घरे जमीनदोस्त झाली आहेत. पूर्णत: तसेच अंशत: पडझड झालेल्या घरात कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत मिळाले नाही. मात्र परिसराच्या तलाठ्यांकडून माहिती काढली असता गावातील पडझळ झालेल्या घरांची निश्चित संख्या सांगण्यात आली नव्हती. अर्थात पडझड झालेल्या नागरिकांंकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. या विभागाने सर्व कामे बाजूला सारुन पडलेल्या घरांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईबाबत प्रस्ताव तयार करुन सहानुभूती दर्शविणे अपेक्षित होते. मात्र असे करण्यात आले नसल्याने गरिबांचे कोणीही नाही, असा आरोप अनेक पीडितांनी केला आहे. घरांची पडझड झाल्याच्या कारणासंबंधी विचारले असता यावर्षी आलेला पाऊस वादळवाऱ्यासह आल्याने पावसाच्या धारांचे संतुलन बिघडले आणि त्या भिंतीवर पडू लागल्या. त्यामुळे भिंती पावसाच्या पाण्याने भिजल्या व कमजोर होवून पडल्या, असे नागरिकांनी लोकमतजवळ सांगितले आहे. (वार्ताहर)