शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

रेल्वे प्रशासनाला भोवला हलगर्जीपणा

By admin | Updated: August 10, 2015 01:27 IST

प्रवाशांनी केलेल्या आरक्षणाबाबत रेल्वे विभागाने केलेल्या हलगर्जीपणामुळे व सेवेतील त्रुटीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

ग्राहक मंचचा न्यायनिवाडा : दोन प्रकरणांत प्रत्येकी १५ हजार नुकसानभरपाईगोंदिया : प्रवाशांनी केलेल्या आरक्षणाबाबत रेल्वे विभागाने केलेल्या हलगर्जीपणामुळे व सेवेतील त्रुटीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. मात्र त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतल्याने रेल्वेला हलगर्जीपणा करणे महागात पडले. दोन्ही प्रकरणात रेल्वेला भुर्दंड सहन करावा लागला.पहिल्या प्रकरणातील तक्रारकर्ते अ‍ॅड. प्रमोदकुमार अग्रवाल रा.गोंदिया यांनी त्यांची मुलगी रशा हिच्यासाठी १७ आॅगस्ट २०१४ रोजी वैनगंगा एक्सप्रेसचे तिकीट गोंदिया ते सिकंदराबादकरिता १५ आॅगस्ट २०१४ रोजी तत्काळ आरक्षण सुविधेअंतर्गत इंटरनेटद्वारे बुकींग केले होते. त्यावेळी आरक्षणाची स्लिपरची ३० तिकिटे शिल्लक होती. अग्रवाल यांनी इंटरनेट बँकिंग सेवेतून आपल्या खात्यातून ४७६.२४ रूपये रेल्वेला जमा केले. मात्र इंटरनेट बँकिंग सेवेतून प्रयत्न अयशस्वी झाल्याने तसा त्यांना संदेश आला. पुन्हा त्यांनी नव्याने प्रयत्न केल्यावर त्यांना वेटिंग लिस्टचे तिकिट मिळाले. इंटरनेटद्वारे बुकिंग सेवेचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे रेल्वेने अग्रवाल यांच्या बँक खात्यात त्यांची रक्कम १९ आॅगस्ट २०१४ रोजी जमा केली. सदर घटनेत रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा व सेवेतील त्रुटीमुळे अ‍ॅड. अग्रवाल यांची मुलगी वैनगंगा एक्सप्रेसने गोंदिया ते सिकंदराबाद प्रवास करू शकली नाही. त्यामुळे त्यांनी ग्राहक न्यायमंचात धाव घेतली.दुसऱ्या प्रकरणात तक्रारकर्ते प्रतिक सुधीर राठोड रा. गोंदिया यांनी रायगड ते पुणे प्रवासासाठी दोन व्यक्तींकरिता आझाद हिंद एक्सप्रेसचे वातानूकुलित प्रवासाचे तिकीट १८ नोव्हेंबर २०१२ रोजी इंटरनेटवरून काढले. सदर गाडीने ते रायगडवरून प्रवास करणार होते. मात्र ५ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांना वैयक्तिक कारणामुळे रायगडऐवजी गोंदिया येथून प्रवास करावयाचा होता. तसा अर्जसुद्धा त्यांनी गोंदिया रेल्वे कार्यालयात दिला. यानंतर त्यांनी इंटरनेटवर तिकिटाची तपासणी केली असता रायगड ते पुणे अशाच प्रवासाचा उल्लेख आढळला. त्यांनी त्वरित गोंदिया रेल्वेच्या कार्यालयात संपर्क केला. यावर रेल्वे विभागाने चूक मान्य करून रायपूर व बिलासपूर येथील रेल्वे विभागाला कळविले.मात्र प्रवासाच्या दिवशी १८ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांनी गोंदियावरून प्रवासाला सुरूवात केल्यावर टी.सी.ने त्यांनी रायगड येथून प्रवासाला सुरूवात केली नसल्याने त्यांचा बुक झालेला बर्थ दुसऱ्याच प्रवाशाला दिल्याचे समजले. त्यामुळे झालेल्या मानसिक त्रासाने प्रतिक राठोड यांनी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली.जिल्हा ग्राहक मंचाने दोन्ही प्रकरणातील युक्तीवाद ऐकला. त्यात रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा व सेवेतील त्रुटी मान्य केली. तसेच दोन्ही प्रकरणातील दोन्ही तक्रारकर्त्यांना नुकसान भरपाई म्हणून रेल्वेने प्रत्येकी १५ हजार रूपये व तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी पाच हजार रूपये ३० दिवसात द्यावे, असा आदेश न्यायमंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांनी दिला. रेल्वे प्रवासात अडचणी निर्माण झाल्यास त्या प्रकाराला रेल्वे विभाग दोषी असताग हे प्रवाश्यांच्या लक्षात येत असल्याने ते ग्राहक न्यायालयात धाव घेतात. (प्रतिनिधी)