शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात २०० हेक्टर क्षेत्रात रब्बी पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:30 IST

यंदा अत्यल्प पाऊस व पिकांवरील रोगामुळे जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अशात यंदा जिल्हा प्रशासनाने रब्बी पीक घेऊ नका असा फतवा काढला.

ठळक मुद्देयंदा भासणार पाणीटंचाई : रब्बी पीक न घेण्याचे आदेश फेटाळले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा अत्यल्प पाऊस व पिकांवरील रोगामुळे जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अशात यंदा जिल्हा प्रशासनाने रब्बी पीक घेऊ नका असा फतवा काढला. परंतु बाघनदी परिसराला लागून असलेल्या गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०० हेक्टरमध्ये रब्बी पीकासाठी नर्सरी टाकल्या आहेत.यंदा ५० टक्केच पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याची पाण्याची पातळी खालावली आहे. लोकांनी २०० मीटरपेक्षा जास्त खोल बोअरवेल खोदू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे. धानाच्या शेतीला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सिमेवरून जाणाऱ्या बाघनदीत पाणी आहे. त्या पाण्याचा वापर मध्यप्रदेशातील शेतकरी करतात. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी त्या बाघनदीच्या पाण्याचा वापर का करू नये, म्हणून तालुक्यातील नदीकाठावर शेती असलेल्या शेतकऱ्यांनी २०० हेक्टर क्षेत्रात रब्बी धानाची लागवड करण्याची तयारी दर्शविली आहे.धापेवाडा, महालगाव, मुर्दाळा, लोधीटोला, नवेगाव, कामठा, छिपीया, बिरसी, खातिया, परसवाडा, चिरामनटोला, वडेगाव, गिरोला, नवेगावगाव या गावातील शेतकऱ्यांनी रब्बी धानासाठी नर्सरी टाकली आहे. तालुक्यात ३ हजार ७०० हेक्टर रब्बी धान पीकाचे क्षेत्र आहे. यापैकी २०० हेक्टर मध्ये रब्बी पीक घेतले जात आहे.जलयुक्त शिवारचा थोडा आधारसन २०१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ७७ गावांची निवड करण्यात आली. त्या गावातील २ हजार ४९० कामे पूर्ण करण्यात आली. त्यावर ३६ कोटी २६ लाख रूपये खर्च करण्यात आले. यातून २० हजार ५४२ दसलक्ष घनमीटर पाणी साठा झाला. त्यामुळे पाण्याची पातळी आणखी खोल न जाण्यास मदत झाली. २०१७-१८ या वर्षात ६३ गावांची निवड करून ४४१ कामे सुरू झाली आहेत. जिल्ह्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी यंदा जलयुक्त शिवारचा काहीसा लाभ होणार आहे.मामा तलाव राहिले रितेसोळाव्या शतकात मालगुजारी तलाव तयार करण्यात आले होते. या तलावातील गाळ काढून शेतकºयांच्या शेतात नेण्याचा माणस शासनाचा होता. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ४१८ मालगुजारी तलावांचा पुनरूज्जीवन कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यापैकी ३४७ तलावांची कामे सुरू केली होती होती. ११५ तलावांतील गाळ काढण्यात आला होता. या तलावांतील ६ लाख ६९ हजार ५८७ घनमीटर गाळ काढण्यात आला. परंतु अल्प पावसामुळे या तलावांमध्ये पाणीच गोळा झाले नाही.प्रशासन हतबलशेतकºयांना धानपीक घेऊ नका असे प्रशासन म्हणून शकत नाही, दुसरीकडे पाण्याची टंचाई आहे.अश्या परिस्थितीत धानपीक लावणाºया शेतकऱ्यांना त्यांच्या पीकासाठी अखेरपर्यंत पाणी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतो. मग प्राशसनाकडून पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी या रबी पिकाला पाणी मिळू नये यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत. शेतकऱ्यांचे फक्त विज कनेक्शन कापल्याशिवाय किंवा मोठे भारनियम हे कारण पुढे केल्याशिवाय प्रशासनाकडे पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.