शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

शांततेची गंगा वाहणाऱ्या तंटामुक्त गावात होऊ लागली भांडणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST

गोंदिया : गाव शांततेतून समृद्धीकडे जावे यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अमलात आणली. या मोहिमेमुळे ग्रामीण ...

गोंदिया : गाव शांततेतून समृद्धीकडे जावे यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अमलात आणली. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील तंटे मोठ्या प्रमाणात कमी झाले. परंतु गोंदिया जिल्ह्यातील तंटामुक्त गावांचे सर्वेक्षण केल्यावर जिल्ह्यातील ५४७ पैकी २७६ तंटामुक्त गावात भांडण झाल्याचे लक्षात आले.

राज्य शासनाने १५ ऑगस्ट २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या मोहिमेला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे १० लाखावरील तंटे सामोपचाराने मिटविण्यात आले. आता या मोहिमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. या मालिकेत गोंदिया जिल्हा राज्यातील पहिला तंटामुक्त होणारा जिल्हा म्हणून नावारूपास आला. राज्यातील १६ हजार पेक्षा अधिक गावे तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरली. परंतु तंटामुक्त पुरस्काराचे मानकरी ठरलेली गावे खरच तंटामुक्त आहेत का? या गावात तंटे झाले का? याचे सर्वेक्षण राज्यभरात पोलीस विभागातर्फे करण्यात आले. तंटामुक्त सेलला मागितलेल्या सर्वेक्षणात अजूनही जिल्ह्यातील तंटामुक्त गावात तंटे उद्भवत असल्याची माहिती पुढे आली आहे.

............

जिल्ह्यातील तंटामुक्त गावे ५४७

............

तालुका- तंटामुक्त गावे - सन २०१९ मधील तक्रारी - सन २०२० मधील तक्रार

आमगाव -५७- ७-५

अर्जुनी-मोरगाव-७०-२४-३

देवरी-५५- २४- १४

गोंदिया-११०- ५०-३१

गोरेगाव- ५६- ३६- १२

सडक-अर्जुनी-६३-२६-१०

सालेकसा-४१ -२४-६

तिरोडा-९५-४८- २४

एकूण-५४७-२७६ -१२३

..................

कोट

तंटामुक्त अध्यक्षांचे

तंटामुक्त झालेल्या गावांना शासनाने लोकसंख्येच्या आधारावर पुरस्कार वाटले. मात्र त्या गावांना तंटामुक्त गाव झाल्याचा पुरावा म्हणून शासनाने त्या गावांना सन्मानपत्र देण्यात आले नाही. नक्षलग्रस्त गावातही लोकचळवळ समित्यांनी उभी केली. ही गावे सुद्धा तंटामुक्त झाली परंतु ते सन्मानपत्रापासून वंचित आहेत.

भरत भांडारकर, तंटामुक्त अध्यक्ष बोथली.

..........

राज्यातील गावांची सन २०१४-०१५ ते सन २०१८-१९ या पाच वर्षातील तंटामुक्त गावांची यादी प्रकाशित केली नाही. या मोहिमेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी काम करणाऱ्या गावांना पुरस्कार दिले नाही. भाजप सरकारने दुर्लक्ष केले होते. परंतु आता या योजनेकडे राष्ट्रवादीचेही सरकार दुर्लक्ष करीत असल्याने मोहीम राबविणाऱ्यांत नाराजीचा सूर आहे.

- हनिफ शेख, तंटामुक्त अध्यक्ष पदमपूर.

..........कोट

तंटामुक्तीला आता लोक तेवढे महत्व देत नाही. सुरुवातीचा तंटामुक्तीचा असलेला जोर कमी झाल्याने आता वाद गावात न सोडविता सरळ पोलीस ठाण्यात पोहचत आहेत. गावातील वाद गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त माेहीम ही महत्त्वाची ठरत होती. परंतु या मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्याने वाद वाढले.

-जी. आर. नागपुरे, नायब तहसीलदार, तिराेडा

.........

गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने उत्तम कार्य केले. वर्षाकाठी लाखो तंटे सामोपचारातून सुटले. या मोहिमेने गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी गावात लोकचळवळ उभी केली. या मोहिमेने पोलिसांच्या व न्यायालयाच्या डोक्यावरील कामाचा ताण कमी केला. ही मोहीम जाेमाने राबविण्याची गरज आहे.

-महेश बन्सोडे, ठाणेदार गोंदिया शहर.

.....