शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शांततेची गंगा वाहणाऱ्या तंटामुक्त गावात होऊ लागली भांडणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST

गोंदिया : गाव शांततेतून समृद्धीकडे जावे यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अमलात आणली. या मोहिमेमुळे ग्रामीण ...

गोंदिया : गाव शांततेतून समृद्धीकडे जावे यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अमलात आणली. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील तंटे मोठ्या प्रमाणात कमी झाले. परंतु गोंदिया जिल्ह्यातील तंटामुक्त गावांचे सर्वेक्षण केल्यावर जिल्ह्यातील ५४७ पैकी २७६ तंटामुक्त गावात भांडण झाल्याचे लक्षात आले.

राज्य शासनाने १५ ऑगस्ट २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या मोहिमेला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे १० लाखावरील तंटे सामोपचाराने मिटविण्यात आले. आता या मोहिमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. या मालिकेत गोंदिया जिल्हा राज्यातील पहिला तंटामुक्त होणारा जिल्हा म्हणून नावारूपास आला. राज्यातील १६ हजार पेक्षा अधिक गावे तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरली. परंतु तंटामुक्त पुरस्काराचे मानकरी ठरलेली गावे खरच तंटामुक्त आहेत का? या गावात तंटे झाले का? याचे सर्वेक्षण राज्यभरात पोलीस विभागातर्फे करण्यात आले. तंटामुक्त सेलला मागितलेल्या सर्वेक्षणात अजूनही जिल्ह्यातील तंटामुक्त गावात तंटे उद्भवत असल्याची माहिती पुढे आली आहे.

............

जिल्ह्यातील तंटामुक्त गावे ५४७

............

तालुका- तंटामुक्त गावे - सन २०१९ मधील तक्रारी - सन २०२० मधील तक्रार

आमगाव -५७- ७-५

अर्जुनी-मोरगाव-७०-२४-३

देवरी-५५- २४- १४

गोंदिया-११०- ५०-३१

गोरेगाव- ५६- ३६- १२

सडक-अर्जुनी-६३-२६-१०

सालेकसा-४१ -२४-६

तिरोडा-९५-४८- २४

एकूण-५४७-२७६ -१२३

..................

कोट

तंटामुक्त अध्यक्षांचे

तंटामुक्त झालेल्या गावांना शासनाने लोकसंख्येच्या आधारावर पुरस्कार वाटले. मात्र त्या गावांना तंटामुक्त गाव झाल्याचा पुरावा म्हणून शासनाने त्या गावांना सन्मानपत्र देण्यात आले नाही. नक्षलग्रस्त गावातही लोकचळवळ समित्यांनी उभी केली. ही गावे सुद्धा तंटामुक्त झाली परंतु ते सन्मानपत्रापासून वंचित आहेत.

भरत भांडारकर, तंटामुक्त अध्यक्ष बोथली.

..........

राज्यातील गावांची सन २०१४-०१५ ते सन २०१८-१९ या पाच वर्षातील तंटामुक्त गावांची यादी प्रकाशित केली नाही. या मोहिमेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी काम करणाऱ्या गावांना पुरस्कार दिले नाही. भाजप सरकारने दुर्लक्ष केले होते. परंतु आता या योजनेकडे राष्ट्रवादीचेही सरकार दुर्लक्ष करीत असल्याने मोहीम राबविणाऱ्यांत नाराजीचा सूर आहे.

- हनिफ शेख, तंटामुक्त अध्यक्ष पदमपूर.

..........कोट

तंटामुक्तीला आता लोक तेवढे महत्व देत नाही. सुरुवातीचा तंटामुक्तीचा असलेला जोर कमी झाल्याने आता वाद गावात न सोडविता सरळ पोलीस ठाण्यात पोहचत आहेत. गावातील वाद गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त माेहीम ही महत्त्वाची ठरत होती. परंतु या मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्याने वाद वाढले.

-जी. आर. नागपुरे, नायब तहसीलदार, तिराेडा

.........

गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने उत्तम कार्य केले. वर्षाकाठी लाखो तंटे सामोपचारातून सुटले. या मोहिमेने गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी गावात लोकचळवळ उभी केली. या मोहिमेने पोलिसांच्या व न्यायालयाच्या डोक्यावरील कामाचा ताण कमी केला. ही मोहीम जाेमाने राबविण्याची गरज आहे.

-महेश बन्सोडे, ठाणेदार गोंदिया शहर.

.....