शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परसटोलाच्या पडीत जमिनीवर फुलणार शेती

By admin | Updated: October 10, 2016 00:29 IST

महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये निवड करण्यात

जल संधारणातून मिळाले ३७७.२० : जलयुक्त शिवार अभियानातून १२०.०४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्धनरेश रहिले ल्ल गोंदिया महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये निवड करण्यात आलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या परसटोला येथील खडकाळ जमीनीवर भरघोस पिक घेता येणार आहे. या गावातील ९० टक्के पडीत जमीन आहे. या गावात जलसंधारणाने ३७७.२० व जलयुक्त शिवार अभियानातून १२०.०४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाले आहे. अभियानांतर्गत गावात तहसील कार्यालयाच्या माध्यामतून मृदा व जल संधारणाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. यात भात खाचर पुनर्जीवन, नाला खोलीकरण, बोडी दुरूस्ती, सीमेंट नाला बांध, जुने सीमेंटबांध, मामा तलावातील गाळ काढणे हे अनेक जलयुक्त शिवार अभियानात या गावात ३५ काम झाले आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या अतिदुर्गम परसटोला गावाची लोकसंख्या १२८४ आहे. नागरिकांची उपजिविका शेतीवर अवलंबून आहे. खरीप व उन्हाळी धानाची शेती, रबीत कडधान्याची शेती करण्यात येते. गावाच्या भौगोलीक क्षेत्र ११४२.८३ हेक्टर एवढे आहे. यापैकी १८०.२९ हेक्टरमध्ये खरीप पीके घेतली जातात. परंतु आता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वाहून जाणाऱ्या पाण्याला अडविल्याने सिंचन क्षेत्र वाढले आहे. गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषि विभागाने भात खाचर पुनर्जीवन चे १८, नाला खोलीकरणाचे ८, सीमेंट नाला बांध ३, जुने सीमेंट बांध व मामा तलावाचे खोलीकरण५, बोडी दुरूस्ती १ काम झाला आहे. जल संधारणाच्या सीमेंट नाला बांधमधून ५२ टीसीएम, नाला खोलीकरणातून २८ टीसीएम, बोडी दुरूस्तीतून ०.४० टीसीएम, भात खाचर पुनर्जीवनातून ४० टीसीएम पाणी जमा झाले आहे. गावातील म्हशी व नागरिकांना ४०२.९४ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज असते. परंतु जून्या जलसंधारणामुळे ३७७.२० दशलक्ष घनमीटर पाणी जमा झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामामधून १२०.०४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाला आहे. गाव प्रगतीच्या वाटेवर आहे. कोरड्या विहिरींना मिळाले जीवन ४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जमा झालेल्या पाण्यामुळे नाल्याच्या जवळ शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनी नर्सरी लावल्या आहेत. पावसाने दडी मारताच काही शेतकऱ्यांनी धानासाठी नाल्याच्या पाण्याचा वापर केला. जलयुक्त शिवार अभिनामुळे या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे.कोरड्या पडलेल्या विहीरींना पाणी आले आहे. परसटोला गावात १२४.३० हेक्टर मध्ये भात खाचर पुनर्जीवनाचे काम झाले आहे. पाणी जमीनीत मूरविण्याच्या वेळी रोवणी करण्यासाठी या पाण्याचा वापर झाला. तूळ व तिळ क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. ओळखा थेंबभर पाण्याचे महत्त्व ४अवर्षण व अनियमित पावसामुळे जलस्तर खाली जाते. पिकावरही याचा परिणाम होतो. पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. शेतीसाठी भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जातो. परंतु भूजल पुनर्भरणावर लक्ष दिले जात नाही. या स्थितीत जलयुक्त शिवार अभियान जलस्तर वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे.