शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

परसटोलाच्या पडीत जमिनीवर फुलणार शेती

By admin | Updated: October 10, 2016 00:29 IST

महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये निवड करण्यात

जल संधारणातून मिळाले ३७७.२० : जलयुक्त शिवार अभियानातून १२०.०४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्धनरेश रहिले ल्ल गोंदिया महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये निवड करण्यात आलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या परसटोला येथील खडकाळ जमीनीवर भरघोस पिक घेता येणार आहे. या गावातील ९० टक्के पडीत जमीन आहे. या गावात जलसंधारणाने ३७७.२० व जलयुक्त शिवार अभियानातून १२०.०४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाले आहे. अभियानांतर्गत गावात तहसील कार्यालयाच्या माध्यामतून मृदा व जल संधारणाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. यात भात खाचर पुनर्जीवन, नाला खोलीकरण, बोडी दुरूस्ती, सीमेंट नाला बांध, जुने सीमेंटबांध, मामा तलावातील गाळ काढणे हे अनेक जलयुक्त शिवार अभियानात या गावात ३५ काम झाले आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या अतिदुर्गम परसटोला गावाची लोकसंख्या १२८४ आहे. नागरिकांची उपजिविका शेतीवर अवलंबून आहे. खरीप व उन्हाळी धानाची शेती, रबीत कडधान्याची शेती करण्यात येते. गावाच्या भौगोलीक क्षेत्र ११४२.८३ हेक्टर एवढे आहे. यापैकी १८०.२९ हेक्टरमध्ये खरीप पीके घेतली जातात. परंतु आता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वाहून जाणाऱ्या पाण्याला अडविल्याने सिंचन क्षेत्र वाढले आहे. गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषि विभागाने भात खाचर पुनर्जीवन चे १८, नाला खोलीकरणाचे ८, सीमेंट नाला बांध ३, जुने सीमेंट बांध व मामा तलावाचे खोलीकरण५, बोडी दुरूस्ती १ काम झाला आहे. जल संधारणाच्या सीमेंट नाला बांधमधून ५२ टीसीएम, नाला खोलीकरणातून २८ टीसीएम, बोडी दुरूस्तीतून ०.४० टीसीएम, भात खाचर पुनर्जीवनातून ४० टीसीएम पाणी जमा झाले आहे. गावातील म्हशी व नागरिकांना ४०२.९४ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज असते. परंतु जून्या जलसंधारणामुळे ३७७.२० दशलक्ष घनमीटर पाणी जमा झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामामधून १२०.०४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाला आहे. गाव प्रगतीच्या वाटेवर आहे. कोरड्या विहिरींना मिळाले जीवन ४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जमा झालेल्या पाण्यामुळे नाल्याच्या जवळ शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनी नर्सरी लावल्या आहेत. पावसाने दडी मारताच काही शेतकऱ्यांनी धानासाठी नाल्याच्या पाण्याचा वापर केला. जलयुक्त शिवार अभिनामुळे या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे.कोरड्या पडलेल्या विहीरींना पाणी आले आहे. परसटोला गावात १२४.३० हेक्टर मध्ये भात खाचर पुनर्जीवनाचे काम झाले आहे. पाणी जमीनीत मूरविण्याच्या वेळी रोवणी करण्यासाठी या पाण्याचा वापर झाला. तूळ व तिळ क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. ओळखा थेंबभर पाण्याचे महत्त्व ४अवर्षण व अनियमित पावसामुळे जलस्तर खाली जाते. पिकावरही याचा परिणाम होतो. पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. शेतीसाठी भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जातो. परंतु भूजल पुनर्भरणावर लक्ष दिले जात नाही. या स्थितीत जलयुक्त शिवार अभियान जलस्तर वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे.