शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

परसटोलाच्या पडीत जमिनीवर फुलणार शेती

By admin | Updated: October 10, 2016 00:29 IST

महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये निवड करण्यात

जल संधारणातून मिळाले ३७७.२० : जलयुक्त शिवार अभियानातून १२०.०४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्धनरेश रहिले ल्ल गोंदिया महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये निवड करण्यात आलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या परसटोला येथील खडकाळ जमीनीवर भरघोस पिक घेता येणार आहे. या गावातील ९० टक्के पडीत जमीन आहे. या गावात जलसंधारणाने ३७७.२० व जलयुक्त शिवार अभियानातून १२०.०४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाले आहे. अभियानांतर्गत गावात तहसील कार्यालयाच्या माध्यामतून मृदा व जल संधारणाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. यात भात खाचर पुनर्जीवन, नाला खोलीकरण, बोडी दुरूस्ती, सीमेंट नाला बांध, जुने सीमेंटबांध, मामा तलावातील गाळ काढणे हे अनेक जलयुक्त शिवार अभियानात या गावात ३५ काम झाले आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या अतिदुर्गम परसटोला गावाची लोकसंख्या १२८४ आहे. नागरिकांची उपजिविका शेतीवर अवलंबून आहे. खरीप व उन्हाळी धानाची शेती, रबीत कडधान्याची शेती करण्यात येते. गावाच्या भौगोलीक क्षेत्र ११४२.८३ हेक्टर एवढे आहे. यापैकी १८०.२९ हेक्टरमध्ये खरीप पीके घेतली जातात. परंतु आता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वाहून जाणाऱ्या पाण्याला अडविल्याने सिंचन क्षेत्र वाढले आहे. गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषि विभागाने भात खाचर पुनर्जीवन चे १८, नाला खोलीकरणाचे ८, सीमेंट नाला बांध ३, जुने सीमेंट बांध व मामा तलावाचे खोलीकरण५, बोडी दुरूस्ती १ काम झाला आहे. जल संधारणाच्या सीमेंट नाला बांधमधून ५२ टीसीएम, नाला खोलीकरणातून २८ टीसीएम, बोडी दुरूस्तीतून ०.४० टीसीएम, भात खाचर पुनर्जीवनातून ४० टीसीएम पाणी जमा झाले आहे. गावातील म्हशी व नागरिकांना ४०२.९४ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज असते. परंतु जून्या जलसंधारणामुळे ३७७.२० दशलक्ष घनमीटर पाणी जमा झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामामधून १२०.०४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाला आहे. गाव प्रगतीच्या वाटेवर आहे. कोरड्या विहिरींना मिळाले जीवन ४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जमा झालेल्या पाण्यामुळे नाल्याच्या जवळ शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनी नर्सरी लावल्या आहेत. पावसाने दडी मारताच काही शेतकऱ्यांनी धानासाठी नाल्याच्या पाण्याचा वापर केला. जलयुक्त शिवार अभिनामुळे या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे.कोरड्या पडलेल्या विहीरींना पाणी आले आहे. परसटोला गावात १२४.३० हेक्टर मध्ये भात खाचर पुनर्जीवनाचे काम झाले आहे. पाणी जमीनीत मूरविण्याच्या वेळी रोवणी करण्यासाठी या पाण्याचा वापर झाला. तूळ व तिळ क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. ओळखा थेंबभर पाण्याचे महत्त्व ४अवर्षण व अनियमित पावसामुळे जलस्तर खाली जाते. पिकावरही याचा परिणाम होतो. पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. शेतीसाठी भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जातो. परंतु भूजल पुनर्भरणावर लक्ष दिले जात नाही. या स्थितीत जलयुक्त शिवार अभियान जलस्तर वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे.