शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

ग्रामीण व शहरी भागाचा विकास हाच ‘नाबार्ड’चा उद्देश

By admin | Updated: March 2, 2017 00:16 IST

बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागाचा विकास करणे हा नाबार्ड फायनांसचा (नॅब्फीन्स) उद्देश आहे.

 बी.एस.सुरान : आढावा बैठक बचत गटांचे माध्यम गोंदिया : बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागाचा विकास करणे हा नाबार्ड फायनांसचा (नॅब्फीन्स) उद्देश आहे. यासाठी स्वयं सहायता बचत गटांना नाबार्ड कर्ज पुरवठा करीत आहे, असे मार्गदर्शन नाबार्ड फायनांसशियल सर्व्हिसेस लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. बी.एस. सुरान यांनी केले. ते इंडियन वेलफेयर सोसायटी गोंदिया येथे आढावा बैठकीत बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने नाबार्डचे जनरल मॅनेजर ओ.पी. धोंडीयाल, डेप्युटी जनरल मॅनेजर मनोज चालाख, इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर, जिल्हा व्यवस्थापक त्र्यंबक मंगर उपस्थित होते. डॉ. सुरान पुढे म्हणाले, नॅब्फीन्स ही रिझर्व बँक आॅफ इंडिया कायदा १९३४ अन्वये एनबीएफसी एमएफआय म्हणून नोंदणीकृत आहे. नाबार्ड फायानांसचे व्याज दर १५.५० टक्के ते १६.९० टक्के असे असून उर्वरित बाकी रकमेवर असतो. नॅब्फीन्सचा मुख्य उद्देश्य नफा कमविणे हा नसून स्वयं सहायता समुहाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील ज्या गरजू कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळत नाही, अशा लोकांना घरपोच वित्तीय सेवा पुरविणे व भांडवल उपलब्ध करून देणे, हा आहे. मात्र नाबार्ड फायनांसचे कर्ज कोणत्याही प्रकारे सुट व माफ नाही. बचत गटांनी घेतलेले कर्ज परतफेड करावे लागेल. बचत गटांनी घेतलेले कर्ज नियमित मासिक परतफेड केल्यानंतर पुढील कर्ज सहजरित्या मिळते, असे सांगितले. या वेळी अशोक बेलेकर यांनी प्रगती अहवाल सादर केला. एकूण ६८२ बचत गटांना २१ कोटी ४४ लाख रूपये संस्थेच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात आले. नॅब्फीन्सने बचत गटांना दिलेल्या कर्जाच्या माध्यमातून महिलांनी कर्जाचा वापर मुलामुलींच्या शिक्षणासाठी, शौचालय बांधकामासाठी, व्यवसाय करण्यासाठी, घर बांधकामासाठी, शेतात बोअरवेल करण्यासाठी, शेतीकरिता अशा अनेक कामांसाठी करून जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न केला जावू शकतो, असे सांगितले. संचालन जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले यांनी केले. आभार गजेंद्र मेश्राम यांनी मानले. बैठकीला इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)