शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण व शहरी भागाचा विकास हाच ‘नाबार्ड’चा उद्देश

By admin | Updated: March 2, 2017 00:16 IST

बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागाचा विकास करणे हा नाबार्ड फायनांसचा (नॅब्फीन्स) उद्देश आहे.

 बी.एस.सुरान : आढावा बैठक बचत गटांचे माध्यम गोंदिया : बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागाचा विकास करणे हा नाबार्ड फायनांसचा (नॅब्फीन्स) उद्देश आहे. यासाठी स्वयं सहायता बचत गटांना नाबार्ड कर्ज पुरवठा करीत आहे, असे मार्गदर्शन नाबार्ड फायनांसशियल सर्व्हिसेस लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. बी.एस. सुरान यांनी केले. ते इंडियन वेलफेयर सोसायटी गोंदिया येथे आढावा बैठकीत बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने नाबार्डचे जनरल मॅनेजर ओ.पी. धोंडीयाल, डेप्युटी जनरल मॅनेजर मनोज चालाख, इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर, जिल्हा व्यवस्थापक त्र्यंबक मंगर उपस्थित होते. डॉ. सुरान पुढे म्हणाले, नॅब्फीन्स ही रिझर्व बँक आॅफ इंडिया कायदा १९३४ अन्वये एनबीएफसी एमएफआय म्हणून नोंदणीकृत आहे. नाबार्ड फायानांसचे व्याज दर १५.५० टक्के ते १६.९० टक्के असे असून उर्वरित बाकी रकमेवर असतो. नॅब्फीन्सचा मुख्य उद्देश्य नफा कमविणे हा नसून स्वयं सहायता समुहाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील ज्या गरजू कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळत नाही, अशा लोकांना घरपोच वित्तीय सेवा पुरविणे व भांडवल उपलब्ध करून देणे, हा आहे. मात्र नाबार्ड फायनांसचे कर्ज कोणत्याही प्रकारे सुट व माफ नाही. बचत गटांनी घेतलेले कर्ज परतफेड करावे लागेल. बचत गटांनी घेतलेले कर्ज नियमित मासिक परतफेड केल्यानंतर पुढील कर्ज सहजरित्या मिळते, असे सांगितले. या वेळी अशोक बेलेकर यांनी प्रगती अहवाल सादर केला. एकूण ६८२ बचत गटांना २१ कोटी ४४ लाख रूपये संस्थेच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात आले. नॅब्फीन्सने बचत गटांना दिलेल्या कर्जाच्या माध्यमातून महिलांनी कर्जाचा वापर मुलामुलींच्या शिक्षणासाठी, शौचालय बांधकामासाठी, व्यवसाय करण्यासाठी, घर बांधकामासाठी, शेतात बोअरवेल करण्यासाठी, शेतीकरिता अशा अनेक कामांसाठी करून जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न केला जावू शकतो, असे सांगितले. संचालन जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले यांनी केले. आभार गजेंद्र मेश्राम यांनी मानले. बैठकीला इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)